शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

चंद्रपूरमधील इरई व झरपट नद्या वेकोलिमुळे प्रदूषित होताहेत का?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 10, 2024 18:16 IST

हायकोर्टाचा सवाल : सरकार व जिल्हाधिकाऱ्यांना मागितले पुरावे

नागपूर : चंद्रपूरचे वैशिष्ट्य असलेल्या इरई व झरपट या दोन्ही नद्या वेकोलिमुळे प्रदूषित होत आहेत का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे आणि यावर येत्या १२ जूनपर्यंत सबळ पुराव्यानिशी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

या नद्यांच्या संवर्धनासाठी माजी खासदार नरेश पुगलिया व इतरांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, जल संसाधन विभागाने १ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. वेकोलि या नद्यांमध्ये कचरा फेकते. त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे व नद्यांचे आकारमान कमी होत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परंतु, वेकोलिने हा आरोप फेटाळून लावला. वेकोलि या नद्यांमध्ये केवळ प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडते. या नद्यांमधील पाणी प्रदूषित करीत नाही किंवा कचराही टाकत नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने हे परस्परविरोधी मुद्दे लक्षात घेता सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर, महानगरपालिकेतर्फे ॲड. महेश धात्रक तर, पाटबंधारे विभागातर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी कामकाज पाहिले.

असे आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणेदोन्ही नद्या नागरी वस्त्यांमधील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीमधील रसायनेयुक्त पाणी, कचरा साठवणूक, चंद्रपूर वीज प्रकल्पातील फ्लाय ॲश इत्यादीमुळे प्रदूषित झाल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोठमोठी झाडे वाढली आहेत. संजयनगर, कृष्णानगर, इंदिरानगर, अंचलेश्वर वॉर्ड, पठाणपुरा इत्यादी वस्त्यांतील नागरिकांसाठी नदीपात्रे शौचालय झाले आहे. दोन्ही नद्या वाचविण्याकरिता या समस्या दूर करण्यात याव्या, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरnagpurनागपूर