शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

राज्यात मनरेगाच्या ३५ हजार कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 21:51 IST

शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामीण नागरिकांना रोजगाराचा दिलासा : जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची उपाययोजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या या घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपाच्या एकूण ३५ हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यात नागपूर विभागातील ५,२५८ कामांचा समावेश आहे.केंद्र शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशाचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहिरी ,पशुंसाठी गोठ्यांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरूपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए. एस. आर नायक यांनी दिली.खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामाच्या जलसंधारणाची तसेच सिंचन विहिरींची कामे प्राधान्याने सुरू करावी यासाठी जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांनी गावनिहाय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार तालुका व ग्रामीण स्तरावर प्रत्यक्ष काम सुरू होईल या दृष्टीने नियोजन करावे यासाठी लाभार्थ्यांशी व्यक्तीश: संपर्क साधावा अशा सूचना मनरेगा आयुक्त नायक यांनी दिल्या आहेत.कृषीसंलग्न वैयक्तिक कामांना प्राधान्यग्रामीण भागात मनरेगा अंतर्गत कामे सुरू करताना कृषीसंलग्न अशा वैयक्तिक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये ४,२०८ सिंचन विहिरी, ५,३०४ पशुगोठे, ८,३६६शोकपीट तसेच शेततळी, विहीर पुनर्भरण आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.नागपूर विभागातील मंजूर जिल्हानिहाय कामांची संख्याचंद्रपूर ६३६गडचिरोली १,६३८गोंदिया १,६५८नागपूर ६०५वर्धा ६६५भंडारा २,०५६

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र