शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हयात नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शिक्षकांच्या नियुक्त्या ?

By गणेश हुड | Updated: June 18, 2024 21:32 IST

शिक्षण विभागाचा अजब कारभार : बोगस नियुक्त्यांना शालार्थ आयडी

नागपूर:  खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रत्यक्षात शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिले नसतानाही  हयात नसलेल्या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीचे खोटे आदेश काढून  जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या बोगस नेमणुकांचे आदेश देण्यात आले. नियुक्ती मान्यतांना शालार्थ आयडी देण्याचा प्रकार  मागील आठ वर्षापासून शिक्षण विभागात सुरूअसून यात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. 

शिक्षणाधिकारी सोमेश्वर नेताम आठ वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला.  परंतु आजही त्यांच्या सहीचे बोगस आदेश काढणारे रॅकेट  शिक्षण विभागात सक्रीय आहे. संस्थाचालक आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची माहिती आहे. बोगस नियुक्त्यातील भ्रष्टाचार उघडेकीस येऊ नये, साठी संबंधित प्रकरणाच्या नस्ती शिक्षणाधिकारी कार्यालयातून नष्ट किंवा गहाळ करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या या बनावट आदेशाद्वारे जिल्ह्यातील अनेक शाळांवर शिक्षक, कर्मचारी काम करत असून, गेली काही वर्षे अनुदानित पगार घेत आहेत. नियुक्तीसाठी प्रत्येकाने लाखो रुपये संबंधित रॅकेटमधील अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच नवीन नियुक्त्यासोबतच विना अनुदानित शाळांतून अनुदानित शाळांवर बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मोठ्याप्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. यावर बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

माजी आमदारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी नागपूरसह  वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यात बोगस व बनावट नियुक्ती आणि बदलीची शेकडो प्रकारणे झाली असल्याच्या तक्रारी आहेत. नियुक्तीमधील  भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी माजी आमदार नागो गाणार यांनी शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे.

चौकशी समिती नियुक्त करणार का? शासन निर्णय २ मे २०१२ अन्वये शिक्षक भरतीस निर्बंध असताना शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे बोगस आदेश काढण्यात आले. संस्था चालक व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने  मोठ्या प्रमाणात बोगस व बनावट नियुक्त्या केल्या. तसेच विना अनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत मोठ्या प्रमाणात बोगस व बनावट बदल्या करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी   या प्रकरणाच्या चौकशीसाठी साहित्य घोटाळ्याच्या धर्तीवर चौकशी समिती नियुक्त करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर