शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 20:11 IST

महानगरपालिकेचा कर्मचारी असो की नगर परिषदेचा कर्मचारी असो त्यांची जी कामे आहे तीच कामे ग्रामपंचायत कर्मचारी करतो, असे असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनपासून वंचित ठेवले जाते. गेल्या १५ वर्षांपासून याचा पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नाही. ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेवर ठाम राहून मोठ्या संख्येत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी घोषणांचा पाऊस पाडत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देराज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची मागणी : मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेचा कर्मचारी असो की नगर परिषदेचा कर्मचारी असो त्यांची जी कामे आहे तीच कामे ग्रामपंचायत कर्मचारी करतो, असे असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनपासून वंचित ठेवले जाते. गेल्या १५ वर्षांपासून याचा पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नाही. ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेवर ठाम राहून मोठ्या संख्येत आलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी घोषणांचा पाऊस पाडत मोर्चाचा परिसर दणाणून सोडला.‘महाराष्ट्र  राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन’च्यावतीने मंगळवारी विधिमंडळावर राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जोरदार धडक दिली. राज्यभरातून मोठ्या संख्येत कर्मचारी सहभागी झाल्याने मोर्चात जोश दिसून येत होता, तर पोलिसांनी सुरक्षेला घेऊन कडेकोट बंदोबस्त लावला होता. ‘लोकमत’शी बोलताना संघटनेचे सरचिटणीस गिरीश दाभाडकर म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत १० टक्के आरक्षण, १०० टक्के वेतन अनुदान आदी मागण्या मंजूर झाल्या. परंतु कर्मचाऱ्यांना पेन्शन व वेतनश्रेणी देण्याची मागणी मंजूर झालेली नाही. विशेष म्हणजे, या दोन मागण्यांसाठी समिती नियुक्त केली. परंतु या समितीची मुदत संपूनही अहवाल सादर झालेला नाही. परिणामी, राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारे किमान वेतन मानधनही अनेक ठिकाणी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.मागण्यांना घेऊन १५ दिवसांत बैठकमागण्यांचे निवेदन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांना दिल्याशिवाय मोर्चा सोडायचा नाही, असा निर्धार संघटनेने केला होता. परंतु दोन्ही मंत्री उपलब्ध होत नसल्याचे पोलिसांकडून सूचना येताच मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या, अशी मोर्चेकरांनी अट टाकली. अखेर मुख्यमंत्र्यांकडून ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भुसे यांनी शिष्टमंडळाची बैठक घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. यात पेन्शन आणि वेतनश्रेणीच्या मागणीला घेऊन अधिवेशन संपल्यावर १५ दिवसांत वित्त व ग्रामविकास विभाग मंत्री यांच्याशी बैठक लावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.खापरी ते नागपूर पायी दिंडीग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खापरी ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आली. याचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार व सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी केले. दिंडीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मोठ्या संख्येत कर्मचारी यात सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथे दिंडीचे रूपांतर मोर्चात झाले. विशेष म्हणजे, या दिंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.या मोर्चाचे नेतृत्व विलास कुमरवार, गिरीश दाभाडकर, काझी अल्लाउद्दीन, धनराज आंबटकर, दिलीप जाधव, भाऊसाहेब ढोके, सपना गावंडे, अब्दुल पटवेकर, संपता तांबे, रामेश्वर गायकी, नारायण होंडे, अशोक कुथे, संजय शिंदे आदींनी केले.दीपक म्हैसेकर समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व उपदान द्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करा,मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ६१ मध्ये सुधारणा करा, किमान वेतन अनुदानाची परिणामकारक अंमलबजावणी करा, आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा