शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पार्सलवर कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक सील लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:54 IST

रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देसुरक्षा आयुक्तांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेतून जाणाऱ्या पार्सलवर सध्या कागदाचे सील ठोकून त्यावर पेनने लिहिले जाते. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ते चुकीचे असून कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक मशीनने सील लावल्यास ते सोईचे होणार असल्याच्या गंभीर बाबीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. ३० जानेवारी रोजी दिल्ली येथे देशभरातील आरपीएफच्या सुरक्षा आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी नागपूर विभागातील वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतिजा यांनी इलेक्ट्रॉनिक सीलचा गंभीर विषय रेल्वे मंत्र्यांपुढे मांडला. रेल्वेस्थानकावर भिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामुळे प्रवासी त्रस्त होतात. प्रवाशांचा त्रास दूर करण्यासाठी भिकाऱ्यांना रेल्वेगाड्या, स्टेशनबाहेर घालवून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली. नागपूरसह देशभरातील आरपीएफ बॅरेकची सध्याची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सुविधा या मुद्यांकडे त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. बॅरेकचा विषय रेल्वेमंत्र्यांनी गंभीरतेने घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नागपूरसह देशभरातील बॅरेक सुसज्ज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर विभागात नागपूर आणि अजनी येथे आरपीएफ बॅरेक आहे. नागपुरात २० तर अजनी येथे ३० खाटांची संख्या आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे