शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

मनपाचे आवाहन : नागरिक हो पाणी जरा जपून वापरा, नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:50 IST

उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, वाहने धुवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.दररोज नळाला येणाऱ्या पाण्याने वाहने धुण्याची, ते पाणी कुलरमध्ये, उद्यानातील झाडांवर टाकण्याची किंवा वाया घालविण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये असते. एवढेच नाही तर नळ आल्यानंतर आदल्या दिवशीचे वाचलेले पाणी नालीत किंवा बाहेर फेकण्याचा प्रकारही दिसून येतो. मनपाचे जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू कंपनीने अशाप्रकारे पाणी वाया न घालविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिवाय अशाप्रकारे कुणी पाणी वाया घालविताना आढळल्यास त्यांना तसे करण्यापासून थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात होणारे जलसंकट टाळण्यासाठी नागरिकांनी सजग होणे आवश्यक आहे. आज आपण पाणी वाचविले तर असंख्य तहानलेल्यांना ते देता येईल, अशी भावनिक साद घातली आहे. नळाद्वारे येणारे पाणी पूर्णपणे ट्रीट केलेले असते व त्या पाण्याचा उपयोग दोन-तीन दिवस केला जाऊ शकतो. पिण्याचे पाणी कधीही शिळे होत नाही, ही गोष्ट नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे.शहरात दररोज ६५० मिलियन लिटर (एमएलडी) पाणी आयात केले जाते. पेंच आणि कन्हान नदीमधून पाणी आणल्यानंतर ते योग्यप्रकारे ट्रीट केले जाते. नवेगाव खैरी (पेंच) मधून पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य नागपुरात तर पूर्व, उत्तर, दक्षिण नागपुरात कन्हान नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पेंचच्या तोतलाडोह जलाशयात सध्या २२.०६ दहा लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या केवळ २.१७ टक्के एवढेच आहे. कामठीच्या नवेगाव खैरी जलाशयात ४५.१५ लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या ३१.८ टक्के आहे. मागील वर्षाशी तुलना केल्यास तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशयात गेल्या वर्षी १८ एप्रिलपर्यंत अनुक्रमे १२.४२ टक्के आणि ३९.२९ टक्के पाणी शिल्लक होते.वर्तमान परिस्थिती पाहता मनपा प्रशासन पिण्याच्या पाण्याबाबत आणि दुरुपयोगाबाबत अधिक सजगतेने पावले उचलताना दिसत आहे. वाहने व कपडे धुण्यासाठी, कुलरमध्ये भरण्यासाठी व उद्यानामध्ये टाकण्यासाठी नळाऐवजी विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याची सूचना मनपा प्रशासनाने केली आहे. खर्च करून ट्रीटमेंट केलेले पाणी वाया जाण्यापेक्षा गरजवंतांना जावे, असे भावनिक आवाहन मनपाने केले आहे.लिकेज आढळल्यास तक्रार द्याजलवाहिनीच्या लिकेजबाबत आणि एखाद्या ठिकाणी वाया जात असेल तेव्हा नागरिकांनी तत्काळ ओसीडब्लूच्या १८००२६६९८९९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घरातील नळाच्या तोट्या लिकेज असल्यास दुरुस्त करण्याचे व पाणी वाया न घालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी