शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे आवाहन : नागरिक हो पाणी जरा जपून वापरा, नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:50 IST

उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.

ठळक मुद्देपिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, वाहने धुवू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्याचे पुढचे दोन महिने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याप्रति शहरवासी सजग झाले नाही थेंबे-थेंबे पाण्यासाठी नागरिकांना कठीण जाणार आहे. अशावेळी दररोज घरच्या नळाला येणारे पिण्याचे पाणी कुलरमध्ये भरू नका, त्या पाण्याने वाहने धुवू नका, उद्यानात टाकू नका किंवा वाया घालवू नका, असे आवाहन महापालिका तसेच पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूने केले आहे.दररोज नळाला येणाऱ्या पाण्याने वाहने धुण्याची, ते पाणी कुलरमध्ये, उद्यानातील झाडांवर टाकण्याची किंवा वाया घालविण्याची प्रवृत्ती नागरिकांमध्ये असते. एवढेच नाही तर नळ आल्यानंतर आदल्या दिवशीचे वाचलेले पाणी नालीत किंवा बाहेर फेकण्याचा प्रकारही दिसून येतो. मनपाचे जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू कंपनीने अशाप्रकारे पाणी वाया न घालविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शिवाय अशाप्रकारे कुणी पाणी वाया घालविताना आढळल्यास त्यांना तसे करण्यापासून थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात होणारे जलसंकट टाळण्यासाठी नागरिकांनी सजग होणे आवश्यक आहे. आज आपण पाणी वाचविले तर असंख्य तहानलेल्यांना ते देता येईल, अशी भावनिक साद घातली आहे. नळाद्वारे येणारे पाणी पूर्णपणे ट्रीट केलेले असते व त्या पाण्याचा उपयोग दोन-तीन दिवस केला जाऊ शकतो. पिण्याचे पाणी कधीही शिळे होत नाही, ही गोष्ट नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे.शहरात दररोज ६५० मिलियन लिटर (एमएलडी) पाणी आयात केले जाते. पेंच आणि कन्हान नदीमधून पाणी आणल्यानंतर ते योग्यप्रकारे ट्रीट केले जाते. नवेगाव खैरी (पेंच) मधून पश्चिम, दक्षिण-पश्चिम, मध्य नागपुरात तर पूर्व, उत्तर, दक्षिण नागपुरात कन्हान नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पेंचच्या तोतलाडोह जलाशयात सध्या २२.०६ दहा लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या केवळ २.१७ टक्के एवढेच आहे. कामठीच्या नवेगाव खैरी जलाशयात ४५.१५ लाख घनमीटर पाणी शिल्लक आहे, जे एकूण क्षमतेच्या ३१.८ टक्के आहे. मागील वर्षाशी तुलना केल्यास तोतलाडोह आणि नवेगाव खैरी जलाशयात गेल्या वर्षी १८ एप्रिलपर्यंत अनुक्रमे १२.४२ टक्के आणि ३९.२९ टक्के पाणी शिल्लक होते.वर्तमान परिस्थिती पाहता मनपा प्रशासन पिण्याच्या पाण्याबाबत आणि दुरुपयोगाबाबत अधिक सजगतेने पावले उचलताना दिसत आहे. वाहने व कपडे धुण्यासाठी, कुलरमध्ये भरण्यासाठी व उद्यानामध्ये टाकण्यासाठी नळाऐवजी विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याची सूचना मनपा प्रशासनाने केली आहे. खर्च करून ट्रीटमेंट केलेले पाणी वाया जाण्यापेक्षा गरजवंतांना जावे, असे भावनिक आवाहन मनपाने केले आहे.लिकेज आढळल्यास तक्रार द्याजलवाहिनीच्या लिकेजबाबत आणि एखाद्या ठिकाणी वाया जात असेल तेव्हा नागरिकांनी तत्काळ ओसीडब्लूच्या १८००२६६९८९९ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय घरातील नळाच्या तोट्या लिकेज असल्यास दुरुस्त करण्याचे व पाणी वाया न घालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी