शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅप’मुळे पाच दिवसानी ‘पॉझिटिव्ह’ची कळाली माहिती : मनपाचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:07 IST

‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले.

ठळक मुद्देपरत चाचणीत भाजप महिला अध्यक्षांचा मुलगा निघाला ‘निगेटिव्ह’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना मनपाकडून होत असलेल्या हलगर्जीचीदेखील अनेक प्रकरणे समोर येत आहेत. १३ ऑगस्ट रोजी चाचणी केलेल्या एका व्यापाऱ्याला ‘आरोग्यसेतू’ या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून पाच दिवसानी तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे कळाले. यानंतर चाचणी केली असताना तो ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती हा भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्ष किर्तीदा अजमेरा यांचा मुलगा असून या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरदेखील २९ ऑगस्टपर्यंत त्याला ‘होम क्वारंटाईन’ करण्याचे मनपाने निर्देश दिले आहेत.मनपाने व्यापाऱ्यांसाठी ‘कोरोना’ची चाचणी अनिवार्य केली. त्यामुळे सिद्धार्थ अजमेरा यांनी प्रकृती एकदम ठणठणीत असतानादेखील अमरावती मार्गावरील विद्यार्थी वसतिगृहातील केंद्रातून १३ ऑगस्ट रोजी चाचणी केली. जर अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला तर सायंकाळी फोनवरुन कळविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना कुठलाही फोन आला नाही. त्यामुळे ते निश्चिंत झाले. यादरम्यान किर्तीदा अजमेरा यांनी १८ आॅगस्ट रोजी सहजपणे ‘आरोग्यसेतू’ हे ‘अ‍ॅप’ पाहिले. यात सिद्धार्थ ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. सर्व सदस्यांनी तात्काळ जवळच्या खासगी प्रयोगशाळेत जाऊन चाचणी केली. सर्वांचा अहवाल दुसऱ्या दिवशी ‘निगेटिव्ह’ आला. हा अहवाल घेऊन किर्तीदा अजमेरा मनपाच्या केंद्रात पोहोचल्या. तेथे मनपाच्या डॉक्टरांनी सिद्धार्थला काही औषधे देऊन एक ‘स्टीकर’ दिले व २९ ऑगस्टपर्यंत ‘क्वारंटाईन’ राहण्याचा आदेश दिला. नागरिकांना अशा पद्धतीने मनस्ताप का दिला जात आहे, असा प्रश्न किर्तीदा अजमेरा यांनी उपस्थित केला आहे.अहवाल येईपर्यंत ‘क्वारंटाईन’ का नाही ?अहवालाची माहिती देण्यात विलंब का करण्यात आला व अहवाल येईपर्यंत ‘होम क्वारंटाईन’ राहण्यास का सांगण्यात आले नाही असा प्रश्न किर्तीदा अजमेरा यांनी उपस्थित केला आहे. सिद्धार्थला आता ‘कोरोना’चा संसर्ग नाही तरीदेखील घरावर ‘क्वारंटाईन’चे ‘स्टीकर’ लागलेले आहे. अनेकदा रुग्ण आपोआपच ठीक होतो असे उत्तर ‘कोव्हीड’ केंद्रात देण्यात आले. अहवालाची माहिती का कळविण्यात आली नाही याबाबत मनपाचा कुठलाही अधिकारी उत्तर देण्यास तयार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या