शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

२८९ फेऱ्या सोडूनही ३० गावे एसटीपासून वंचित

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावरून ही बाब उघड झाली आहे. दुर्गम भागात रस्त्याचीच सोय नसल्याने तेथे एसटीची सोय उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे परिवहन खात्याने स्पष्ट केले आहे.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एकूण ९७ गावे आहेत. त्यापैकी ६७ गावांपर्यंतच एसटीची सेवा उपलब्ध आहे. ३० गावात एसटी पोहोचू शकली नाही. या गावातील नागरिकांना आणि विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या दोन-तीन किलोमीटर परिघातील गावात जाऊन एसटी पकडावी लागते. अशा वेळी त्यांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय उरत नाही. ग्रामीण भागात खाजगी प्रवासी वाहनांची अवस्था दयनीय आहे. जनावरे कोंबावीत असे प्रवासी त्यात कोंबले जातात. त्यातून अनेक वेळा अपघातही झाले आहेत.कळमेश्वर तालुक्यासाठी नागपूरमधील गणेशपेठ, सावनेर, काटोल या आगाराद्वारे एसटी बसेस सोडल्या जातात. नागपूर येथून १२९, सावनेर येथून ५६, काटोल येथून १०४ फेऱ्या सोडल्या जातात. ज्या गावात एसटीजात नाही त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या बसथांब्याद्वारे सवलतीच्या दरातील पासेस उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)