शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

२८९ फेऱ्या सोडूनही ३० गावे एसटीपासून वंचित

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावरून ही बाब उघड झाली आहे. दुर्गम भागात रस्त्याचीच सोय नसल्याने तेथे एसटीची सोय उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे परिवहन खात्याने स्पष्ट केले आहे.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एकूण ९७ गावे आहेत. त्यापैकी ६७ गावांपर्यंतच एसटीची सेवा उपलब्ध आहे. ३० गावात एसटी पोहोचू शकली नाही. या गावातील नागरिकांना आणि विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या दोन-तीन किलोमीटर परिघातील गावात जाऊन एसटी पकडावी लागते. अशा वेळी त्यांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय उरत नाही. ग्रामीण भागात खाजगी प्रवासी वाहनांची अवस्था दयनीय आहे. जनावरे कोंबावीत असे प्रवासी त्यात कोंबले जातात. त्यातून अनेक वेळा अपघातही झाले आहेत.कळमेश्वर तालुक्यासाठी नागपूरमधील गणेशपेठ, सावनेर, काटोल या आगाराद्वारे एसटी बसेस सोडल्या जातात. नागपूर येथून १२९, सावनेर येथून ५६, काटोल येथून १०४ फेऱ्या सोडल्या जातात. ज्या गावात एसटीजात नाही त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या बसथांब्याद्वारे सवलतीच्या दरातील पासेस उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)