शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

२८९ फेऱ्या सोडूनही ३० गावे एसटीपासून वंचित

By admin | Updated: December 14, 2014 00:40 IST

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यासाठी विविध ठिकाणांहून दर दिवशी एसटीच्या २८९ फेऱ्यांची वाहतूक होत असली तरीही तालुक्यातील ३० गावात अद्याप एसटी पोहोचू शकली नाही.विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावरून ही बाब उघड झाली आहे. दुर्गम भागात रस्त्याचीच सोय नसल्याने तेथे एसटीची सोय उपलब्ध करून देणे अवघड असल्याचे परिवहन खात्याने स्पष्ट केले आहे.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात एकूण ९७ गावे आहेत. त्यापैकी ६७ गावांपर्यंतच एसटीची सेवा उपलब्ध आहे. ३० गावात एसटी पोहोचू शकली नाही. या गावातील नागरिकांना आणि विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या दोन-तीन किलोमीटर परिघातील गावात जाऊन एसटी पकडावी लागते. अशा वेळी त्यांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय उरत नाही. ग्रामीण भागात खाजगी प्रवासी वाहनांची अवस्था दयनीय आहे. जनावरे कोंबावीत असे प्रवासी त्यात कोंबले जातात. त्यातून अनेक वेळा अपघातही झाले आहेत.कळमेश्वर तालुक्यासाठी नागपूरमधील गणेशपेठ, सावनेर, काटोल या आगाराद्वारे एसटी बसेस सोडल्या जातात. नागपूर येथून १२९, सावनेर येथून ५६, काटोल येथून १०४ फेऱ्या सोडल्या जातात. ज्या गावात एसटीजात नाही त्या भागातील शालेय विद्यार्थ्यांना नजीकच्या बसथांब्याद्वारे सवलतीच्या दरातील पासेस उपलब्ध करून देण्यात आल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)