शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी शहांवर नाराज

By admin | Updated: May 28, 2015 02:16 IST

‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कुणाला दिला नव्हता, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी करून विदर्भवाद्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

भाजपविरोधी सूर : गडकरी, फडणवीस यांनी द्यावे स्पष्टीकरणनागपूर : ‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कुणाला दिला नव्हता, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी करून विदर्भवाद्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा ठराव घेणाऱ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशी भूमिका कशी काय घेऊ शकतो, यावर आश्चर्य व्यक्त करीत स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.शहांना विदर्भाची आंदोलने माहीत नाहीत का?भाजपने १९९७ मध्ये विदर्भ राज्य व्हावा, असा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर केला. तो ठराव त्यांना बंधनकारक आहे. भाजपने स्वत: लहान राज्ये निर्माण केली आहेत. अशा परिस्थितीत शहा यांनी असे वक्तव्य करणे हे भाजपच्या ठरावाकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. ते अक्षम्य आहे. कोल्हापूरच्या राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ राज्य निर्मितीचा उल्लेख केला. तेथे अमित शहा उपस्थित होते. गडकरी व फडणवीस यांनी विदर्भाचा पुरस्कार केला, आंदोलने केली. हे सर्व शहा यांना माहीत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. विदर्भात सार्वमत घेतले असता ९६ टक्के नागरिकांनी विदर्भाच्या बाजूने कौल दिला. एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष जनमताचा आदर करीत नसेल तर हे दुर्दैवी आहे. भाजपला समर्थन देणाऱ्या वैदर्भीय मंचांनी शहा यांच्या या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा. - डॉ. श्रीनिवास खांदेवाले , अर्थतज्ज्ञगडकरी- फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी अमित शहा यांनी विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन दिलेच नाही, असे सांगून विदर्भातील जनतेची फसवणूक केली आहे. आजवर विदर्भासाठी झालेल्या आंदोलनांचा हा अपमान आहे. भाजपच्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत करण्यात आला होता. तेव्हा अमित शहा कुठे होते हे माहीत नाही, पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भाबाबत घूमजाव करून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही कोंडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या विदर्भासाठी रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत. आपल्याला महाराष्ट्रापेक्षा विदर्भाचा मुख्यमंत्री होणे आवडेल, अशी वक्तव्ये केली आहेत. शहा यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. - राम नेवले, विदर्भ राज्य आंदोलन समिती शहांच्या वक्तव्याचे आश्चर्य शहा यांनी मांडलेली विदर्भाबाबतची भूमिका ही भाजपची असू शकत नाही. भाजपने विदर्भासाठी जागर यात्रा काढली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही भाजपने वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केला होता. आता शहा यांनी भूमिका बदलली याचे आश्चर्य वाटते. शहा यांची बदलती भूमिका भाजपसाठी नुकसानकारक ठरेल. -अ‍ॅड. नंदा पराते,अध्यक्ष, आदिम