शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

धर्मांतरणविरोधी कायदा हवा; संघस्थानावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: June 5, 2025 22:11 IST

राजकीय भाषण न करता आदिवासींच्या समस्या मांडल्या : आदिवासींसाठी धर्मकोड हवा

योगेश पांडे नागपूर : इंदिरा गांधी व पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले माजी कॉंग्रेस नेते अरविंद नेताम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेताम यांनी यावेळी राजकीय भाषण टाळले. मात्र त्यांनी आदिवासी समाजासमोरील समस्या संघस्थानावरून संघ धुरिणांसमोर मांडल्या. धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. मात्र आता धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे. संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरले. नेताम यांनी त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाचेच मुद्दे मांडले. देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे. धर्मांतरणासोबतच आदिवासींचे विस्थापन हीदेखील मोठी समस्या आहे. विकासाच्या नावावर केंद्र शासनाकडून उद्योगपतींना मदत होत आहे. संघाने सर्वांना समान भागीदारी मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासींच्या जमिनी नेहमीसाठी अधिग्रहित न करता लीजवर घ्याव्या. काम झाल्यावर संबंधित जागा आदिवासींना परत कराव्या. छत्तीसगडमध्ये मागील अनेक वर्षात पैसा कायद्याचे पालन झाले नाही. संघाने हा विषय गंभीरतेने घ्यावा, असे नेताम म्हणाले. डिलिस्टिंग धर्मातरण रोखण्यासाठी मोठे अस्त्र ठरू शकते. त्याच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हवा, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

नक्षलवाद डोके काढणार नाही असे धोरण हवेछत्तीसगडमध्ये नक्षलवादाला ठेचण्याचे काम सुरू आहे. मात्र नक्षलवादाची विचारधारा अनेकांमध्ये कायम आहे. भविष्यात नक्षलवादी परत डोके वर काढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने धोरण तयार झाले पाहिजे, अशी मागणी नेताम यांनी यावेळी केली.

आदिवासींसाठी हवा धर्म कोडआम्हालादेखील धर्म कोड मिळावा अशी आदिवासींची मागणी समोर येत आहे. आम्हाला नविन सामाजिक विचारधारा तयार करायची नाही. मात्र आदिवासींनादेखील मान्यता मिळायला हवी. देशात आदिवासी समाजाची ओळख हळूहळू संपत आहे. धर्म कोड असला तर पुढील पिढ्यांना भूतकाळ व ओळख कळेल, असे नेताम म्हणाले.

संघावर स्तुतिसुमनेयावेळी नेताम यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली. संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही. आदिवासींच्या विकासासाठी संघच पुढाकार घेऊ शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस