शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

धर्मांतरणविरोधी कायदा हवा; संघस्थानावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: June 5, 2025 22:11 IST

राजकीय भाषण न करता आदिवासींच्या समस्या मांडल्या : आदिवासींसाठी धर्मकोड हवा

योगेश पांडे नागपूर : इंदिरा गांधी व पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले माजी कॉंग्रेस नेते अरविंद नेताम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेताम यांनी यावेळी राजकीय भाषण टाळले. मात्र त्यांनी आदिवासी समाजासमोरील समस्या संघस्थानावरून संघ धुरिणांसमोर मांडल्या. धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. मात्र आता धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे. संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरले. नेताम यांनी त्यांच्या भाषणात आदिवासी समाजाचेच मुद्दे मांडले. देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे. धर्मांतरणासोबतच आदिवासींचे विस्थापन हीदेखील मोठी समस्या आहे. विकासाच्या नावावर केंद्र शासनाकडून उद्योगपतींना मदत होत आहे. संघाने सर्वांना समान भागीदारी मिळेल यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासींच्या जमिनी नेहमीसाठी अधिग्रहित न करता लीजवर घ्याव्या. काम झाल्यावर संबंधित जागा आदिवासींना परत कराव्या. छत्तीसगडमध्ये मागील अनेक वर्षात पैसा कायद्याचे पालन झाले नाही. संघाने हा विषय गंभीरतेने घ्यावा, असे नेताम म्हणाले. डिलिस्टिंग धर्मातरण रोखण्यासाठी मोठे अस्त्र ठरू शकते. त्याच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हवा, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

नक्षलवाद डोके काढणार नाही असे धोरण हवेछत्तीसगडमध्ये नक्षलवादाला ठेचण्याचे काम सुरू आहे. मात्र नक्षलवादाची विचारधारा अनेकांमध्ये कायम आहे. भविष्यात नक्षलवादी परत डोके वर काढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने धोरण तयार झाले पाहिजे, अशी मागणी नेताम यांनी यावेळी केली.

आदिवासींसाठी हवा धर्म कोडआम्हालादेखील धर्म कोड मिळावा अशी आदिवासींची मागणी समोर येत आहे. आम्हाला नविन सामाजिक विचारधारा तयार करायची नाही. मात्र आदिवासींनादेखील मान्यता मिळायला हवी. देशात आदिवासी समाजाची ओळख हळूहळू संपत आहे. धर्म कोड असला तर पुढील पिढ्यांना भूतकाळ व ओळख कळेल, असे नेताम म्हणाले.

संघावर स्तुतिसुमनेयावेळी नेताम यांनी संघावर स्तुतिसुमने उधळली. संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही. आदिवासींच्या विकासासाठी संघच पुढाकार घेऊ शकतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेस