शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

अंत्ययात्रा पोलीस ठाण्यावर

By admin | Updated: March 5, 2016 03:05 IST

आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला.

आकाश शेंडे अपहरण आणि हत्या : प्रतापनगरात प्रचंड तणावनागपूर : आकाश प्रल्हाद शेंडे (वय २०) या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करणारांना अटक करा, ही मागणी करीत शोकसंतप्त नातेवाईकांनी अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सुभाषनगरात सायकल स्टोर्स चालवणाऱ्या आकाशचा काही तरुणांसोबत उधारीच्या पैशातून वाद सुरू होता. त्यामुळे ४ फेब्रुवारीला आरोपींनी त्याला दुकानात येऊन मारहाण केली होती. यावेळी कुटुंबीयांनी आरोपींची समजूत काढून १ मार्चला पैसे देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, तत्पूर्वीच २९ फेब्रुवारीला दुपारी शेंदरे, ढवळे आणि आणखी पाच-सात आरोपी आकाशच्या दुकानात आले आणि पैशाची मागणी करू लागले. पैसे काही दिवसात देतो, असे सांगणाऱ्या आकाशला आरोपींनी दुकानातून उचलून नेले. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याच्या अपहरणाची तक्रार घेऊन गेलेल्या कुटुंबीयांना प्रतापनगर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. गुरुवारी प्रतापनगर पोलिसांना अंबाझरी तलावात आकाश शेंडेचा मृतदेह सापडला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मेडिकलमध्ये बोलावून पोलिसांनी शेंडे कुुटुंबीयांना मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले. मात्र, आकाशचे अपहरण करून त्याची हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी संतप्त शेंडे कुटुंबीयांनी केली अन् आरोपींना अटक केल्याशिवाय आकाश शेंडेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे सांगितले. त्यावेळी शेंडे कुटुंबीयांची पोलिसांनी कशीबशी समजूत घातली. मात्र, पोलिसांवरच प्रकरण दडपण्याचा संशय घेऊन शोकसंतप्त शेंडे कुटुंबीय नातेवाईक, मित्र तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी आकाश शेंडेची अंत्ययात्रा प्रतापनगर ठाण्यावर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावग्रस्त झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देऊन पोलिसांनी समजूत काढली.(प्रतिनिधी)