शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

संविधानात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

By admin | Updated: October 24, 2015 03:11 IST

बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला,

दीक्षाभूमीचा विकास जागतिक दर्जानुसार : मुख्यमंत्री नागपूर : बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या भूमीचा सुपुत्र मुख्यमंत्री झाला, याचा मला अति आनंद होत असल्याची कृतज्ञता व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील स्मारक मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर भव्य स्वरूपात होईल. तसेच लंडनमधील ज्या घरात त्यांचे शिक्षणासाठी वास्तव्य होते. ते घर शासनाने विकत घेतले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने अर्थशास्त्र संशोधनाचा अभ्यासक्रम सुरु करू जेणेकरून लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमी येथे भारतातील विद्यार्थी शिक्षण घेतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला दिले. त्या संविधानात भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नमूद करून ठेवले आहे. गरिबातल्या गरीब माणसाला संविधानाने सन्मान दिला आहे. बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो धर्म सर्व विश्वावर राज्य करीत आहे. आज चीन, जपान यासारखे प्रगत राष्ट्र गौतम बुद्धाच्या पंचशीलाच्या स्वीकार करून प्रगती करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राजकुमार बडोले यांनी बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीसाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दलित मागासवर्गीय समाजातील मुले नागरी सेवेत यावी यासाठी ५० मुलांना नवी दिल्लीच्या आयएएस कोचिंग वर्गात प्रवेश दिला आहे. त्यांचा सर्व खर्च शासन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौर प्रवीण दटके यांनी आपल्या भाषणात दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेत हा आराखडा २०० कोटी रुपयांचा वर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाजीराव मोघे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी लाखो अनुयायांना रक्ताचा एक थेंबही न सांडता बुद्ध धर्माची दीक्षा दिली. जगात असे एकही उदाहरण नाही. भारताची एकात्मता अबाधित राखण्यासाठी बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले, त्याला तोड नाही. जगातील अनेक देशांमध्ये जीवघेणा संघर्ष सुरू आहे. परंतु भारतात विविध जाती धर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. हे सर्व बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. गोरगरिबांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यसनमुक्त धोरण शासनाने प्रभावीपणे राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी आपल्या प्रास्ताविकेत दीक्षाभूमीच्या विकासासाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न उपस्थित केला तसेच आरोग्य विभागाची किंवा दीक्षाभूमी परिसरातील मोकळी जागा स्मारक समितीला देण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मारक समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत रा.सू. गवई यांना आदरांजली वाहण्यात आली. भुवनेश्वरी मेहरे व अर्चना मेश्राम यांनी संचालन केले. स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी आभार मानले. याप्रसंगी न्यायमूर्ती भूषण गवई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.पुरण मेश्राम, उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, स्मारक समितीचे सदस्य अ‍ॅड. मा.म. येवले, विजय चिकाटे, पुरुषोत्तम भागवत, अ‍ॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, प्रो. डी.जी. दाभाडे आदी व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)८०० किमीचे बुद्ध सर्किट- गडकरी तथागत गौतम बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले. ती स्थळे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. परंतु रस्त्यांच्या सुविधांअभावी पर्यटकांना मोठी अडचण होते. त्यामुळे लुंबिनी (नेपाळ) ते सारनाथ या बुद्ध सर्किट असलेल्या ८०० किलोमीटरचा रस्ता सिमेंटीकरण करून जगभरातील पर्यटकांसाठी खुला करून देण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली. चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होणार असून येत्या दोन महिन्याच्या आत कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.