शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:03 IST

डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला.

ठळक मुद्देचालीरीतीला छेद...साधले समाजहित! 

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही समाजात जुन्या चालीरीती आणि परंपरेची वीण घट्ट रोवली आहे. त्याला बळी पडून गरज नसलेल्यांवर अनाठायी खर्च करण्यात येत आहे. समाजभान जपणारे काही सुशिक्षित कुटुंब चालीरीती परंपरेची ही वीण उसवून समाजहिताचे कार्य करीत आहे. नागपुरातील चांदे कुटुंबीयांनी असाच एक आदर्श घडविला आहे जो समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला. जिव्हाळा परिवार गेल्या काही वर्षापासून विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. ज्या गरजू मुलांना शिक्षणाची आवड आहे, परंतु परिस्थितीअभावी जे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्या पालनपोषणापासून शिक्षणाचा भार जिव्हाळा परिवार सांभाळत आहे. जिव्हाळा परिवार हे सर्व कार्य दान आणि रद्दी संकलनाच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे समाजभान जपणारी अनेक मंडळी जिव्हाळ्याशी जुळलेली आहे. त्यातीलच विनोद जोशी हे सुद्धा आहेत. विनोद जोशी हे डॉ. चांदे यांचे परिचित आहे. जोशी यांनी डॉ. चांदे यांना जिव्हाळा परिवाराचा उद्देश सांगितला, त्यांची भेट घडवून दिली. तेव्हा डॉ. चांदे यांनी आपल्या वडिलांचा श्राद्धाचा कार्यक्रम साजरा न करता, श्राद्धासाठी खर्च होणारा ८० हजार रुपयांचा निधी जिव्हाळा परिवारातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट दिला. चांदे कुटुंबीयांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा दिला आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील अशा अनेक कुटुंबीयांना प्रेरणा दिली आहे. जिव्हाळा परिवारात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्याला चांदे आणि धोडपकर कुटुंबीयांसोबत उपाध्यक्ष विनया फडणवीस, सचिव नागेश पाटील, मीना पाटील, विलास देशपांडे उपस्थित होते.

दान सत्कारणी लागले पाहिजेज्यांना भूक लागली त्यांना खाऊ घालण्यात अर्थ आहे. चालीरीतीच्या नावावर मोठमोठे सोहळे करून पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात काहीच अर्थ नाही. जिव्हाळ्याला भेट देऊन आमचे दान सत्कारणी लागले आहे. समाजातून अशी वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जिव्हाळ्यासारख्या संस्था अनेक निराधारांचा, गरजूंचा आधार बनू शकेल.- डॉ. अनिल चांदे

टॅग्स :Socialसामाजिक