शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:03 IST

डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला.

ठळक मुद्देचालीरीतीला छेद...साधले समाजहित! 

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही समाजात जुन्या चालीरीती आणि परंपरेची वीण घट्ट रोवली आहे. त्याला बळी पडून गरज नसलेल्यांवर अनाठायी खर्च करण्यात येत आहे. समाजभान जपणारे काही सुशिक्षित कुटुंब चालीरीती परंपरेची ही वीण उसवून समाजहिताचे कार्य करीत आहे. नागपुरातील चांदे कुटुंबीयांनी असाच एक आदर्श घडविला आहे जो समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला. जिव्हाळा परिवार गेल्या काही वर्षापासून विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. ज्या गरजू मुलांना शिक्षणाची आवड आहे, परंतु परिस्थितीअभावी जे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्या पालनपोषणापासून शिक्षणाचा भार जिव्हाळा परिवार सांभाळत आहे. जिव्हाळा परिवार हे सर्व कार्य दान आणि रद्दी संकलनाच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे समाजभान जपणारी अनेक मंडळी जिव्हाळ्याशी जुळलेली आहे. त्यातीलच विनोद जोशी हे सुद्धा आहेत. विनोद जोशी हे डॉ. चांदे यांचे परिचित आहे. जोशी यांनी डॉ. चांदे यांना जिव्हाळा परिवाराचा उद्देश सांगितला, त्यांची भेट घडवून दिली. तेव्हा डॉ. चांदे यांनी आपल्या वडिलांचा श्राद्धाचा कार्यक्रम साजरा न करता, श्राद्धासाठी खर्च होणारा ८० हजार रुपयांचा निधी जिव्हाळा परिवारातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट दिला. चांदे कुटुंबीयांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा दिला आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील अशा अनेक कुटुंबीयांना प्रेरणा दिली आहे. जिव्हाळा परिवारात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्याला चांदे आणि धोडपकर कुटुंबीयांसोबत उपाध्यक्ष विनया फडणवीस, सचिव नागेश पाटील, मीना पाटील, विलास देशपांडे उपस्थित होते.

दान सत्कारणी लागले पाहिजेज्यांना भूक लागली त्यांना खाऊ घालण्यात अर्थ आहे. चालीरीतीच्या नावावर मोठमोठे सोहळे करून पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात काहीच अर्थ नाही. जिव्हाळ्याला भेट देऊन आमचे दान सत्कारणी लागले आहे. समाजातून अशी वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जिव्हाळ्यासारख्या संस्था अनेक निराधारांचा, गरजूंचा आधार बनू शकेल.- डॉ. अनिल चांदे

टॅग्स :Socialसामाजिक