शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षश्राद्धाच्या खर्चाची रक्कम दिली शिक्षणासाठी : चांदे कुटुंबीयांचा जिव्हाळा परिवाराला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 11:03 IST

डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला.

ठळक मुद्देचालीरीतीला छेद...साधले समाजहित! 

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही समाजात जुन्या चालीरीती आणि परंपरेची वीण घट्ट रोवली आहे. त्याला बळी पडून गरज नसलेल्यांवर अनाठायी खर्च करण्यात येत आहे. समाजभान जपणारे काही सुशिक्षित कुटुंब चालीरीती परंपरेची ही वीण उसवून समाजहिताचे कार्य करीत आहे. नागपुरातील चांदे कुटुंबीयांनी असाच एक आदर्श घडविला आहे जो समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.डॉ. अनिल चांदे यांचे वडील मोहन चांदे यांचे गेल्यावर्षी निधन झाले होते. यावर्षी त्यांचे वर्षश्राद्ध होते. परंतु चांदे कुटुंबीयांनी त्यांचे वर्षश्राद्ध न करता, या श्राद्धावर होणाऱ्या खर्चाचा निधी त्यांनी जिव्हाळा कुटुंबातील निराधार आणि गरजू मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट स्वरूपात दिला. जिव्हाळा परिवार गेल्या काही वर्षापासून विदर्भ आणि अरुणाचल प्रदेशातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे. ज्या गरजू मुलांना शिक्षणाची आवड आहे, परंतु परिस्थितीअभावी जे शिक्षण घेऊ शकत नाही त्यांच्या पालनपोषणापासून शिक्षणाचा भार जिव्हाळा परिवार सांभाळत आहे. जिव्हाळा परिवार हे सर्व कार्य दान आणि रद्दी संकलनाच्या माध्यमातून करीत आहे. त्यामुळे समाजभान जपणारी अनेक मंडळी जिव्हाळ्याशी जुळलेली आहे. त्यातीलच विनोद जोशी हे सुद्धा आहेत. विनोद जोशी हे डॉ. चांदे यांचे परिचित आहे. जोशी यांनी डॉ. चांदे यांना जिव्हाळा परिवाराचा उद्देश सांगितला, त्यांची भेट घडवून दिली. तेव्हा डॉ. चांदे यांनी आपल्या वडिलांचा श्राद्धाचा कार्यक्रम साजरा न करता, श्राद्धासाठी खर्च होणारा ८० हजार रुपयांचा निधी जिव्हाळा परिवारातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी भेट दिला. चांदे कुटुंबीयांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला फाटा दिला आहे. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील अशा अनेक कुटुंबीयांना प्रेरणा दिली आहे. जिव्हाळा परिवारात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्याला चांदे आणि धोडपकर कुटुंबीयांसोबत उपाध्यक्ष विनया फडणवीस, सचिव नागेश पाटील, मीना पाटील, विलास देशपांडे उपस्थित होते.

दान सत्कारणी लागले पाहिजेज्यांना भूक लागली त्यांना खाऊ घालण्यात अर्थ आहे. चालीरीतीच्या नावावर मोठमोठे सोहळे करून पोट भरलेल्यांना खाऊ घालण्यात काहीच अर्थ नाही. जिव्हाळ्याला भेट देऊन आमचे दान सत्कारणी लागले आहे. समाजातून अशी वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे. जेणेकरून जिव्हाळ्यासारख्या संस्था अनेक निराधारांचा, गरजूंचा आधार बनू शकेल.- डॉ. अनिल चांदे

टॅग्स :Socialसामाजिक