शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘अब की बार किसान सरकार’, बीआरएस ऐवजी आता महाराष्ट्र राष्ट्र समिती उतरणार रिंगणात

By श्रीनिवास भोसले | Updated: August 20, 2024 17:21 IST

विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती.

नांदेड : ‘अब की बार किसान सरकार’, अशी घोषणा देत तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यभर धुराळा उडवून देणाऱ्या बीआरएसने महाराष्ट्रात पक्ष विस्तार गुंडाळला आहे. गेल्या एक ते दीड वर्षात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील बीआरएसच्या नेत्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. हा पक्ष परिवर्तन आघाडीतील घटक पक्ष राहणार असून, आगामी निवडणुका ताकदीने लढणार असल्याचेही धोंडगे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. लोकसभेला महाराष्ट्रातील बीआरएस नेत्यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे निवडणुका लढविण्याबाबत अनेकवेळा संपर्क साधला होता. परंतु बीआरएस राज्यात लोकसभेला तटस्थ राहिली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानेही बीआरएसकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे बीआरएसच्या राज्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. 

बीआरएसचा अब की बार किसान सरकार हा नारा घेऊनच एमआरएस रिंगणात उतरणार आहे. तसेच परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. त्यासाठी येत्या ५ सप्टेंबरला परिवर्तन आघाडीचा राज्याचा मेळावा नांदेडात होणार आहे, असेही माजी आमदार धोंडगे म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती