शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘अब की बार किसान सरकार’, बीआरएस ऐवजी आता महाराष्ट्र राष्ट्र समिती उतरणार रिंगणात

By श्रीनिवास भोसले | Updated: August 20, 2024 17:21 IST

विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती.

नांदेड : ‘अब की बार किसान सरकार’, अशी घोषणा देत तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यभर धुराळा उडवून देणाऱ्या बीआरएसने महाराष्ट्रात पक्ष विस्तार गुंडाळला आहे. गेल्या एक ते दीड वर्षात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्यातील बीआरएसच्या नेत्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. हा पक्ष परिवर्तन आघाडीतील घटक पक्ष राहणार असून, आगामी निवडणुका ताकदीने लढणार असल्याचेही धोंडगे म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव झाला. तेव्हापासूनच बीआरएसने महाराष्ट्रातील आपला गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली होती. लोकसभेला महाराष्ट्रातील बीआरएस नेत्यांनी माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे निवडणुका लढविण्याबाबत अनेकवेळा संपर्क साधला होता. परंतु बीआरएस राज्यात लोकसभेला तटस्थ राहिली. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भानेही बीआरएसकडून कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे बीआरएसच्या राज्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र राष्ट्र समिती या नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. 

बीआरएसचा अब की बार किसान सरकार हा नारा घेऊनच एमआरएस रिंगणात उतरणार आहे. तसेच परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहणार आहे. त्यासाठी येत्या ५ सप्टेंबरला परिवर्तन आघाडीचा राज्याचा मेळावा नांदेडात होणार आहे, असेही माजी आमदार धोंडगे म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024BRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती