शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

 नागपुरात  अनिरुद्ध-रसिकाने रसिकांना जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:16 IST

सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते.

ठळक मुद्देस्वरवेधची प्रस्तुती : नव्या सुरांनी दिली नव्या ध्यासाची प्रेरणा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सारेगमप स्पर्धेचा महाविजेता व नागपूरकरांचा आवडता गायक अनिरुद्ध जोशी याच्या पुढील प्रवासासाठी रसिकांचे आशीर्वाद व शुभेच्छांचे पाठबळ लाभावे, याकरिता मंगळवारी सायंटिफिक सभागृहात अनिरुद्धचे लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. एकूण १६ गाण्यांच्या या सुरेल प्रवासात अनिरुद्ध जोशी व रसिका चाटी यांच्या मधूर आवाजाने रसिकांना जिंकले. अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्वरवेधने सादर केलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ गुणीबाळ असा...या रसिकाच्या गीताने झाला. यानंतर अनिरुद्धने यमन बंदिश अतिशय तन्मयतेने सादर केली. माझे माहेर पंढरी...हे त्याच्या आवाजातील भजन ऐकताना श्रोत्यांची जणू ब्रह्मानंदी टाळी लागली. शुक्रतारा मंदवारा...हे युगल गीतही छान जमून आले. खंडेरायाच्या लग्नाला....या अनिरुद्धच्या खड्या आवाजातील गाण्याने माहोल केला. सर्वात्मका सर्वेश्वरा...या गीताने या मैफिलीचा समारोप झाला. मुकुंद देशपांडे यांनी अनिरुद्ध व रसिकाला त्यांच्या सांगितिक प्रवासाबद्दल बोलते केले. या दोन्ही गायकांना सचिन बक्षी, अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, आनंद मास्टे, नरेंद्र कडबे, प्रसन्न वानखेडे, पंकज यादव, सुभाष वानखेडे, विक्रम जोशी व अभिषेक दहीकर यांनी वाद्यांवर सुरेल सहसंगत केली.ढिसाळ नियोजनाने गुदमरला श्वासस्वरवेध ही संस्था नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी ओळखली जाते. कुठल्याही औपचारिकतेशिवाय ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू करण्याचा या संस्थेचा शिरस्ताही रसिकांना फार भावतो. परंतु अनिरुद्धच्या लाईव्ह इन कॉन्सर्टमध्ये नियोजनाचा पार बोजवारा उडाला. कार्यक्रम नि:शुल्क असल्याने श्रोत्यांची गर्दी अपेक्षितच होती. परंतु तरीही हा कार्यक्रम सायंटिफिकसारख्या छोट्या सभागृहात घेण्यात आला. परिणामी श्रोत्यांना बसायला तर सोडा उभे राहायलाही जागा नव्हती. गर्दीत श्वास गुदमरत असल्याने अनेकांनी थेट घरचा रस्ता धरला, तर जे बाहेर उभे होते त्यांना शेवटपर्यंत केवळ श्रवणावरच समाधान मानावे लागले. काही श्रोत्यांमध्ये तर जागेवरून वादही झालेत. या कार्यक्रमातून बोध घेऊन पुढच्या वेळी रसिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी स्वरवेधने घ्यावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत कार्यक्रम न बघताच अनेकांनी सभागृह सोडले.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर