शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपुरात अचानक वाढले जनावरांच्या खाद्याचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:02 IST

लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

ठळक मुद्देरेडिमेड खाद्यात ५०० ते ७०० रुपयांची वाढ : जनावर मालकांच्या खिशाला कात्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन लागले तेव्हा किराणा, औषधी व भाज्या वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. आता त्यात शिथिलता आणत इतरही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. बंद असल्याने दुकानातील माल जशाचा तसा असेल पण दुकानदार स्टॉक नसल्याचे कारण देत चढ्या दारात विकत आहेत. जनावरांचे खाद्य विकणाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा घेणे सुरू केले आहे. श्वानांचे शेल्टर होम चालविणाऱ्या स्मिता मिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्वानांच्या रेडिमेड खाद्याची बॅग १५०० ते १६०० रुपयांना मिळायची. ती बॅग आता २२०० ते २५०० रुपयांना विकली जात आहे. म्हणजे जवळपास ७०० रुपयांचा फरक पडला. लॉकडाऊनच्या काळात ही किंमत ३००० पर्यंत गेल्याचे त्या सांगतात. त्यांच्याकडे १५० च्या वर श्वान आहेत. त्यांना महिन्याला २०० किलो खाद्य म्हणजे १० बॅग लागतात. याचा अर्थ महिन्याला ७००० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.दुधाचे दरही लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढले असल्याचे दिसून येते. केवळ तांदूळ आहेत त्या दराने मिळत असल्याचे दिसते.शहरात ३० ते ४० टक्के घरांमध्ये श्वान पाळले जातात. याशिवाय गाई, म्हशी आदी जनावरे पाळणाºयांची संख्या खूप आहे. या महागाईचा फटका या जनावर मालकांनाही पडत आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर