शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भद्रोहींना आता जनताच धडा शिकविणार; सुबाेध माेहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 13:11 IST

वेदांतापाठोपाठ एअरबस प्रकल्प पळविल्याने नागरिकांमध्ये संताप

नागपूर : महाराष्ट्रातून वेदांतापाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गेला. दोन्ही उद्योग शेजारच्या गुजरातने पळविले. या दोन उद्योगांनी दोन लाखांवर तरुणांची निराशा झाली आहे. एअर बस प्रकल्प विदर्भात हाेणार हाेता. मिहानमध्ये हाेणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला. सव्वा लाख बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र विदर्भाच्या तोंडात आलेला घास हिरावला. आता विदर्भद्राेह्यांना येथील जनताच धडा शिकविणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांनी व्यक्त केले.

टाटा एअर बस प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा होता. हा भांडवली उद्योग होता, असे उद्योग स्थायी असतात. कोट्यवधींची यंत्रसामग्री लावली जाते. सातत्याने उत्पादन प्रक्रिया चालते. स्थायी रोजगार निर्मिती होते. त्यातून त्या भागाचा झपाट्याने विकास होतो, असे सांगत माेहिते यांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट करीत याबाबत विस्तृतपणे विचार व्यक्त केले. भांडवली उद्योग आणण्यास अनेक वर्ष लागतात. सहजासहजी असे मोठे उद्योग येत नाही. तो मिहानमध्ये येणार हाेता, या माध्यमातून मिहानचा कायापालट होणार होता.

लाखो तरुणांना राेजगार मिळून तेवढ्याच कुटुंबाचे नशीब बदलणार होते. मात्र त्यास राजकारण्यांची नजर लागली. हे राजकारणी एजंट विकासाच्या गप्पा मारतात. तेच विदर्भाच्या जीवावर उठतात. साधा विरोध करीत नाहीत. हा प्रकल्प विदर्भातून जाणे हा खूप माेठा धक्का आहे. अगोदर वेदांता प्रकल्प पळविला तो प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. तेव्हा लवकरच महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प देऊ असे सांगण्यात आले हाेते. मात्र तसे न करता आता त्यापाठाेपाठ एअरबस प्रकल्पही पळविला. मागासलेल्या विदर्भातील उद्योग पळविणे हा भागातील जनतेवर दुहेरी अन्याय आहे. यासाठी वैदर्भीय जनता असे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही माेहिते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSubodh Mohiteसुबोध मोहिते