शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

विदर्भद्रोहींना आता जनताच धडा शिकविणार; सुबाेध माेहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 13:11 IST

वेदांतापाठोपाठ एअरबस प्रकल्प पळविल्याने नागरिकांमध्ये संताप

नागपूर : महाराष्ट्रातून वेदांतापाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गेला. दोन्ही उद्योग शेजारच्या गुजरातने पळविले. या दोन उद्योगांनी दोन लाखांवर तरुणांची निराशा झाली आहे. एअर बस प्रकल्प विदर्भात हाेणार हाेता. मिहानमध्ये हाेणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला. सव्वा लाख बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र विदर्भाच्या तोंडात आलेला घास हिरावला. आता विदर्भद्राेह्यांना येथील जनताच धडा शिकविणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांनी व्यक्त केले.

टाटा एअर बस प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा होता. हा भांडवली उद्योग होता, असे उद्योग स्थायी असतात. कोट्यवधींची यंत्रसामग्री लावली जाते. सातत्याने उत्पादन प्रक्रिया चालते. स्थायी रोजगार निर्मिती होते. त्यातून त्या भागाचा झपाट्याने विकास होतो, असे सांगत माेहिते यांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट करीत याबाबत विस्तृतपणे विचार व्यक्त केले. भांडवली उद्योग आणण्यास अनेक वर्ष लागतात. सहजासहजी असे मोठे उद्योग येत नाही. तो मिहानमध्ये येणार हाेता, या माध्यमातून मिहानचा कायापालट होणार होता.

लाखो तरुणांना राेजगार मिळून तेवढ्याच कुटुंबाचे नशीब बदलणार होते. मात्र त्यास राजकारण्यांची नजर लागली. हे राजकारणी एजंट विकासाच्या गप्पा मारतात. तेच विदर्भाच्या जीवावर उठतात. साधा विरोध करीत नाहीत. हा प्रकल्प विदर्भातून जाणे हा खूप माेठा धक्का आहे. अगोदर वेदांता प्रकल्प पळविला तो प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. तेव्हा लवकरच महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प देऊ असे सांगण्यात आले हाेते. मात्र तसे न करता आता त्यापाठाेपाठ एअरबस प्रकल्पही पळविला. मागासलेल्या विदर्भातील उद्योग पळविणे हा भागातील जनतेवर दुहेरी अन्याय आहे. यासाठी वैदर्भीय जनता असे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही माेहिते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSubodh Mohiteसुबोध मोहिते