शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

विदर्भद्रोहींना आता जनताच धडा शिकविणार; सुबाेध माेहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 13:11 IST

वेदांतापाठोपाठ एअरबस प्रकल्प पळविल्याने नागरिकांमध्ये संताप

नागपूर : महाराष्ट्रातून वेदांतापाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गेला. दोन्ही उद्योग शेजारच्या गुजरातने पळविले. या दोन उद्योगांनी दोन लाखांवर तरुणांची निराशा झाली आहे. एअर बस प्रकल्प विदर्भात हाेणार हाेता. मिहानमध्ये हाेणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला. सव्वा लाख बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र विदर्भाच्या तोंडात आलेला घास हिरावला. आता विदर्भद्राेह्यांना येथील जनताच धडा शिकविणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांनी व्यक्त केले.

टाटा एअर बस प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा होता. हा भांडवली उद्योग होता, असे उद्योग स्थायी असतात. कोट्यवधींची यंत्रसामग्री लावली जाते. सातत्याने उत्पादन प्रक्रिया चालते. स्थायी रोजगार निर्मिती होते. त्यातून त्या भागाचा झपाट्याने विकास होतो, असे सांगत माेहिते यांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट करीत याबाबत विस्तृतपणे विचार व्यक्त केले. भांडवली उद्योग आणण्यास अनेक वर्ष लागतात. सहजासहजी असे मोठे उद्योग येत नाही. तो मिहानमध्ये येणार हाेता, या माध्यमातून मिहानचा कायापालट होणार होता.

लाखो तरुणांना राेजगार मिळून तेवढ्याच कुटुंबाचे नशीब बदलणार होते. मात्र त्यास राजकारण्यांची नजर लागली. हे राजकारणी एजंट विकासाच्या गप्पा मारतात. तेच विदर्भाच्या जीवावर उठतात. साधा विरोध करीत नाहीत. हा प्रकल्प विदर्भातून जाणे हा खूप माेठा धक्का आहे. अगोदर वेदांता प्रकल्प पळविला तो प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. तेव्हा लवकरच महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प देऊ असे सांगण्यात आले हाेते. मात्र तसे न करता आता त्यापाठाेपाठ एअरबस प्रकल्पही पळविला. मागासलेल्या विदर्भातील उद्योग पळविणे हा भागातील जनतेवर दुहेरी अन्याय आहे. यासाठी वैदर्भीय जनता असे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही माेहिते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSubodh Mohiteसुबोध मोहिते