शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

विदर्भद्रोहींना आता जनताच धडा शिकविणार; सुबाेध माेहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2022 13:11 IST

वेदांतापाठोपाठ एअरबस प्रकल्प पळविल्याने नागरिकांमध्ये संताप

नागपूर : महाराष्ट्रातून वेदांतापाठोपाठ टाटा एअर बस प्रकल्प गेला. दोन्ही उद्योग शेजारच्या गुजरातने पळविले. या दोन उद्योगांनी दोन लाखांवर तरुणांची निराशा झाली आहे. एअर बस प्रकल्प विदर्भात हाेणार हाेता. मिहानमध्ये हाेणार असल्याचा गाजावाजाही करण्यात आला. सव्वा लाख बेरोजगारांना काम मिळणार होते. मात्र विदर्भाच्या तोंडात आलेला घास हिरावला. आता विदर्भद्राेह्यांना येथील जनताच धडा शिकविणार, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांनी व्यक्त केले.

टाटा एअर बस प्रकल्प २२ हजार कोटी रुपयांचा होता. हा भांडवली उद्योग होता, असे उद्योग स्थायी असतात. कोट्यवधींची यंत्रसामग्री लावली जाते. सातत्याने उत्पादन प्रक्रिया चालते. स्थायी रोजगार निर्मिती होते. त्यातून त्या भागाचा झपाट्याने विकास होतो, असे सांगत माेहिते यांनी उद्योग क्षेत्राशी त्यांचा घनिष्ट संबंध असल्याचे स्पष्ट करीत याबाबत विस्तृतपणे विचार व्यक्त केले. भांडवली उद्योग आणण्यास अनेक वर्ष लागतात. सहजासहजी असे मोठे उद्योग येत नाही. तो मिहानमध्ये येणार हाेता, या माध्यमातून मिहानचा कायापालट होणार होता.

लाखो तरुणांना राेजगार मिळून तेवढ्याच कुटुंबाचे नशीब बदलणार होते. मात्र त्यास राजकारण्यांची नजर लागली. हे राजकारणी एजंट विकासाच्या गप्पा मारतात. तेच विदर्भाच्या जीवावर उठतात. साधा विरोध करीत नाहीत. हा प्रकल्प विदर्भातून जाणे हा खूप माेठा धक्का आहे. अगोदर वेदांता प्रकल्प पळविला तो प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. तेव्हा लवकरच महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प देऊ असे सांगण्यात आले हाेते. मात्र तसे न करता आता त्यापाठाेपाठ एअरबस प्रकल्पही पळविला. मागासलेल्या विदर्भातील उद्योग पळविणे हा भागातील जनतेवर दुहेरी अन्याय आहे. यासाठी वैदर्भीय जनता असे कृत्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, असेही माेहिते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSubodh Mohiteसुबोध मोहिते