शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरीमुळे आंध्र, केरळ आणि प. बंगालची स्थिती चिंताजनक : विहिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 22:53 IST

शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजिहादी कारवाया वाढल्या : हितचिंतक अभियानातून करणार जनजागरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी सुरू आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे देशातील लोकसंख्येच्या असंतुलनाचा धोका निर्माण झाला असून जिहादी कारवायाही वाढल्याची चिंता विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलींद परांडे यांनी व्यक्त केली.विहिपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आंध्र व केरळमध्ये जिहादी कारवाया जोरात सुरू असून तिथे चार हजारांवर मुली बेपत्ता आहेत. घुसखोरांच्या माध्यमातून तिथे ह्युमन ट्राफिक सुरू आहे.ममता बॅनर्जी या संवैधानिक पदावर असतानाही एक प्रकारे घुसखोरांची पाठराखण करीत आहे. आपले ओळखपत्र हरविल्याची तक्रार पोलिसात करा, असा सल्ला त्या देत आहेत. यामुळ्य देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोहचू शकतो. योग्य प्रक्रिया पार पाडून शेजारच्या राष्ट्रातून भारतात शरण येणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेसाठी आणि सहकार्यासाठी भारत सरकारने सहकार्य करावे, अशी विहिपची मागणी आहे. या संदर्भात विहिपची भूमिका सांगताना ते म्हणाले, बांगलादेश व म्यानमारमधून भारतामध्ये येणारे प्रताडित हिंदू शरणार्थी असून रक्षणयोग्य आहेत. मात्र तिथून येणारे मुस्लिम घुसखोर आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवावे, अशी आमची भूमिका आहे.तिरूपती मंदिरासह अन्य हिंदू मंदिरांमध्ये गैरहिंदूनांना नोकऱ्या देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. तेथील सेव्हन हिल्समधून धर्मांतराचे काम सुरु आहे. हे काम संविधान विरोधातील आहेत. त्याविरूद्ध आम्ही न्यायलयाकडे दाद मागू.१७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळामध्ये देशभर ‘हितचिंतक अभियान’ राबविले जाणार आहे. या माध्यमातून ५१ लाखांपेक्षा अधिक हिंदूंना जागृत करून विहिपसोबत जोडले जाईल. विदर्भ प्रांतामध्ये दोन लाख लोकांना या अभियानात सहभागी केले जाणार आहे. मागील अभियानातून ३२ लाखांवर अधिक नागरिकांना जोडण्यात आले होते. आमचे संघटन कोणाही विरूद्ध नाही. त्रीशुळ हे आमचे धार्मिक प्रतिक असून ते वाटणे अयोग्य नाही. आजवर अनेकदा आम्ही त्रीशुळ वाटले आहेत, अशा शब्दात त्यांनी त्रीशुळ वाटपे समर्थन केले. यावेळी विहिपचे प्रांतमंत्री गोविंद शेंडे आणि नागपूर महानगर मंत्री प्रशांत चित्रे उपस्थित होते.जगमोहन रेड्डी सरकारची हिंदूविरोधी पावलेआंध्र प्रदेशात निवडून आलेल्या जगनमोहन रेड्डी सरकारने हिंदूविरोधी पावले उचलल्याचा आरोप करून परांडे म्हणाले, समाजातील वंचितांना घरे बांधण्यासाठी मंदिरांची जमीन देण्याची घोषणा या सरकारने केली आहे. या निर्णयाला विरोध नाही. मात्र केवळ हिंदू मंदिरांचीच जमीन का द्यावी. अनेक चर्चला मिळालेल्या लीजवरील जमिनींची ९९ वर्षांची मुदत १९९४ मध्येच संपली आहे. वक्फ बोर्डाच्या कितीतरी जमिनी रिकाम्या पडून आहेत. त्यासुद्धा द्याव्यात. हिंदू मंदिरांना दानात मिळालेल्या या जमिनी आहेत. मंदिराच्या विकासाचे आणि व्यवस्थापनाचे काम त्यातून चालावे, हा त्यामागील हेतू होता. याला विहिंपचा विरोध राहील.

टॅग्स :HinduहिंदूMediaमाध्यमे