शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

... अन् म्हणून प्रवासी करतो ‘वंदे भारत’ला नमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 23:08 IST

प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे.

नागपूर : मध्य भारतातील नागपूर ते बिलासपूर या मार्गावर सुरू झालेल्या हाय स्पिड वंदे भारत ट्रेनमध्ये ईतक्या सोयी, इतक्या सुविधा आहेत. तिचे इतके वैशिष्ट्ये आणि धक्का न लागू देता ती प्रवाशांना त्यांच्या ईच्छित स्थानकावर सोडते. म्हणूनच प्रवासी वंदे भारतला नमन केल्याशिवाय राहत नाही.

११२८ प्रवासी आणि चालकांसह चार कर्मचारी अशी एकूण ११३२ ची क्षमता असलेली वंदे भारत फेब्रुवारी २०१९ ला सर्वप्रथम दिल्ली वाराणसी, नंतर दिल्ली कटरा, नंतर मुंबई गांधीनगर कॅपिटल, दिल्ली अम्ब अंदोरा, चेन्नई म्हैसूर आणि आता आजपासून सुरू झालेली नागपूर बिलासपूर ही देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस आहे. हिची बनावट पूर्णत: स्वदेशी आहे. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टम (पीआयएस) आणि स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे आहेत. 

प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे. हिच्यात इमर्जन्सी अलार्म बटण आणि इमर्जन्सी टॉक बॅक युनिट्ससुद्धा आहे. त्यामुळे प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही देण्यात आले आहेत. यात प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे देखील आहेत. ज्यात डब्याच्या बाहेर रीअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे.

ही सुद्धा आहेत वैशिष्ट्ये...- इतर प्रवासी माध्यमांच्या तुलनेत नागपूर ते बिलासपूर दरम्यान रेल्वे प्रवासाचा वेळ वाचेल.- सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न.- गँगवेचे बाह्य फेअरिंग अशा प्रकारे डिझाइन केले गेले की ते हवेचा भार कमी करेल.-गरमागरम जेवण, शितपेय, वायफाय ऑन डिमांड

असे आहे एक्झिकेटिव्ह भाडेनागपूर - गोंदिया : ९३५ रुपयेनागपूर - राजनांदगाव : १३०५ रुपये

नागपूर - दुर्ग : १४२० रुपयेनागपूर - रायपूर : १५४० रुपये

नागपूर - बिलासपूर : १८९० रुपये

सर्वसाधारण भाडे

नागपूर - गोंदिया : ४८० रुपयेनागपूर - राजनांदगाव : ६६० रुपयेनागपूर - दुर्ग : ७२० रुपयेनागपूर - रायपूर : ७७५ रुपयेनागपूर - बिलासपूर : ९५५ रुपये

आठवड्यातून सहा दिवसही रेल्वेगाडी आठवड्यातून ६ दिवस चालणार आहे. नागपूरहून ती रोज (शनिवार वगळता) दुपारी २.०५ वाजता सुटेल आणि रात्री ७.३५ वाजता बिलासपूरला पोहचेल. तर, बिलासपूरहूनसकाळी६.४५ वाजता सुटेल आणि नागपुरात दुपारी १२.१५ वाजता पोहचेल. रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकावर हिचे थांबे राहणार आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस