शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

.. आणि झाले 'अमृतांजन पूल' असे नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:53 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे.

ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील १९० वर्षांचा पूल झाला भुईसपाट

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणूस वर्तमानात जगत असला तरी तो अनेक प्राचिन, ऐतिहासिक वस्तू, गोष्टी सोबत घेऊन चालतो. प्राचिन आणि ऐतिहासिक काळातील अनेक बांधकामे आजही टिकून आहेत. त्यातील काही बांधकामे जिर्ण झाल्याने ती स्वत:च पडतात किंवा काहींना पाडून त्या जागी नवे निर्माण करावे लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा-लोणावळा दरम्यान असलेला एक असाच पूल ५ एप्रिल रोजी शासनाने भुईसपाट केला. हा पूल 'अमृतांजन पूल' या नावाने ओळखला जात होता. मात्र, या पुलाचे हे नामकरण कसे झाले आणि त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे, ते जाणून घेणे रंजक आहे.ज्या व्यक्तीमुळे या पुलाचे नामकरण अमृतांजन पुल असे झाले ते पेन्टर एम.एच. तिवारी यांचे पुत्र भागवत तिवारी नागपुरात राहतात. एम.एच. तिवारी यांचे निधन १६ नोव्हेंबर १९९९ रोजी नागपुरातच झाला. २२ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आणि आज जर ते असते तर २२ एप्रिल २०२० रोजी ते ९८ वषार्चे असते. एम.एच. तिवारी भुसावळ येथील बी.के. नाईक एण्ड सन्स होर्डिंग अडव्हर्टायझर्स येथे नोकरीला होते. त्यावर तिवारी वर्धा येथे वास्तव्याला असत. १९३६-३७ मध्ये नाईक यांनी तिवारी यांना भुसावळला नेते. त्यानंतर कंपनीचा विस्तार झाला आणि नाईक पुणे येथे वास्तव्याला गेले आणि कंपनीचे मुख्य कार्यालयही पुणे येथेच हलविले गेले. त्या काळात ही कंपनी जाहीरात क्षेत्रात अग्रगण्य होती. दरम्यान मुंबईचे एम.डी. पिटीट नावाच्या पारसी इसमाने आपली पुणे-मुंबई येथील जागा विकण्याचे निश्चित केले होते. ही जागा ज्या ठिकाणी होती तेथे ग्रेट इंडियन पेनिनसुला (जीआयपी) रेल्वेचे रिव्हर्सिंग स्टेशन होते. हे स्टेशन म्हणजे आता ज्या ठिकाणी पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील सह्याद्रीचा विशाल डोंगर आडवा येतो, ते स्थान. पुढे हे स्टेशन बंद पाडून इंग्रजांनी तेथे रस्ता वाहतूकींसाठी बोगदा खणला. त्याच बोगद्यावरून आताचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जातो आणि तो पूल आहे. पुल क्रॉस केल्यानंतर येणाऱ्या वळणावर नाईक यांनी पिटीट यांच्याकडून जागा विकत घेतली होती. तेथे नाईक आणि तिवारी यांनी विभिन्न कंपन्यांच्या जाहिरातींचे होर्डिंग्ज लावण्याचे निश्चित केले. पहिलीच ऑर्डर अमृतांजन बामकडून प्राप्त झाली. तेव्हा तिवारी यांनी अमृतांजन बामचे भव्य असे कटआऊट तेथे लावले. हे भारतातील पहिले शंभर बाय २० फुटाचे होर्डिंग होते. त्या पुलाजवळ अमृतांजनचे पहिले कटआऊट लागल्याने आणि बराच काळ ते होर्डिंग तेथे असल्याने जवळच असलेल्या पुलाचे नामकरण जनसामान्यांनी 'अमृतांजन पूल' असे करून टाकले आणि वषोर्नुवर्षे हा पूल संबंध देशभरात अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. आता हा पूल नष्ट करण्यात आला असला तरी त्या पुलाच्या आठवणी वडिलांच्या आठवणींसह स्मरणात असल्याचे भागवत तिवारी यांनी सांगितले.भागवत तिवारी यांनी शेअर केल्या आठवणी एम.एच. तिवारी यांचे पुत्र भागवत तिवारी यांनी लोकमतकडे वडिल आणि अमृतांजन पुलासंदर्भात आठवणींना उजाळा दिला. ५ एप्रिल २०२० रोजी हा पुल पाडण्यात आला आणि २२ एप्रिल रोजी वडीलांची जयंती असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्या पुलाचे जुने फोटो, तेव्हा लावण्यात आलेले कटआऊट होर्डिंग शेअर केले. त्या पुलाच्या नामकरणात बाबांचा हातभार असल्याने त्याबद्दल आम्हा कुटूंबीयांना अभिमान वाटत असल्याचे भागवत तिवारी म्हणाले.

टॅग्स :SocialसामाजिकAmrutanjan Bridgeअमृतांजन घाट