शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप

By योगेश पांडे | Updated: March 16, 2024 00:27 IST

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

नागपूर : पंजाबमधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जोरदार टीका करण्यात आली आहे. पंजाबमध्ये फुटीरवादी तत्त्व व दहशतवादी मानसिकतेचे लोक परत सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकांअगोदर दोन महिन्यांअगोदर पंजाबमधील शेतकरी आंदोलन पुकारण्यात आले व त्याच्याआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न सुरू असल्याची भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. शुक्रवारी नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. यावेळी देशातील वर्तमान स्थितीवर भाष्य करताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

सरकार्यवाहांतर्फे प्रतिवेदनातून वर्षभरातील एकूण सामाजिक स्थिती व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशात सकारात्मक वातावरण आहे; मात्र फुटीरवादी तत्त्वांना ही गोष्ट पचनी पडलेली नाही. त्यामुळे अशांतता निर्माण करणे व त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करणे अशी कार्यप्रणाली आहे. मणिपूरमध्ये मैतेई व कुकी या दोन समाजांमध्ये याच तत्त्वांमुळे हिंसा वाढली. सीमेवरील राज्यांना यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. समाजात अशा प्रकारे मनोवैज्ञानिक भेदभाव निर्माण करणे ही अतिशय धोकादायक बाब असल्याचे सरकार्यवाहांनी नमूद केले.

-पश्चिम बंगाल सरकारकडून संदेशखालीतील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्नयावेळी संघाकडून पश्चिम बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट प्रहार करण्यात आला आहे. संदेशखाली येथे शेकडो माता-भगिनींवर अत्याचाराच्या घटनेने समाजमन आक्रंदित झाले; मात्र तेथील शासनाकडून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून महिला सुरक्षा व सन्मानाच्या विषयावर एकत्र यायला हवे, अशी भूमिका सरकार्यवाहांनी मांडली.

-अनुसूचित जातीच्या लोकांवर होणारे अत्याचार अमानवीयदेशाच्या विविध भागांतून अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय-अत्याचार होत असल्याच्या बातम्या येतात. अशा घटनांमुळे जे मतभेद उत्पन्न होतात त्याचे परिणाम व घाव दीर्घकाळ राहतात. अशा घटना अमानवीयच आहेत, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे.

-जातिआधारित जनगणनेचा राजकीय खेळदक्षिण भारताला देशापासून वेगळे करणे किंवा जातिआधारित जनगणनेसारख्या संवेदनशील मुद्यावर राजकीय खेळ करणे अयोग्य आहे. या सर्व बाबींना विकृत स्वरूप देऊन देशाचे विभाजन करण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघाकडून लावण्यात आला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर