शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप

By योगेश पांडे | Updated: March 16, 2024 00:27 IST

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

नागपूर : पंजाबमधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जोरदार टीका करण्यात आली आहे. पंजाबमध्ये फुटीरवादी तत्त्व व दहशतवादी मानसिकतेचे लोक परत सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकांअगोदर दोन महिन्यांअगोदर पंजाबमधील शेतकरी आंदोलन पुकारण्यात आले व त्याच्याआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न सुरू असल्याची भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. शुक्रवारी नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. यावेळी देशातील वर्तमान स्थितीवर भाष्य करताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

सरकार्यवाहांतर्फे प्रतिवेदनातून वर्षभरातील एकूण सामाजिक स्थिती व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशात सकारात्मक वातावरण आहे; मात्र फुटीरवादी तत्त्वांना ही गोष्ट पचनी पडलेली नाही. त्यामुळे अशांतता निर्माण करणे व त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करणे अशी कार्यप्रणाली आहे. मणिपूरमध्ये मैतेई व कुकी या दोन समाजांमध्ये याच तत्त्वांमुळे हिंसा वाढली. सीमेवरील राज्यांना यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. समाजात अशा प्रकारे मनोवैज्ञानिक भेदभाव निर्माण करणे ही अतिशय धोकादायक बाब असल्याचे सरकार्यवाहांनी नमूद केले.

-पश्चिम बंगाल सरकारकडून संदेशखालीतील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्नयावेळी संघाकडून पश्चिम बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट प्रहार करण्यात आला आहे. संदेशखाली येथे शेकडो माता-भगिनींवर अत्याचाराच्या घटनेने समाजमन आक्रंदित झाले; मात्र तेथील शासनाकडून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून महिला सुरक्षा व सन्मानाच्या विषयावर एकत्र यायला हवे, अशी भूमिका सरकार्यवाहांनी मांडली.

-अनुसूचित जातीच्या लोकांवर होणारे अत्याचार अमानवीयदेशाच्या विविध भागांतून अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय-अत्याचार होत असल्याच्या बातम्या येतात. अशा घटनांमुळे जे मतभेद उत्पन्न होतात त्याचे परिणाम व घाव दीर्घकाळ राहतात. अशा घटना अमानवीयच आहेत, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे.

-जातिआधारित जनगणनेचा राजकीय खेळदक्षिण भारताला देशापासून वेगळे करणे किंवा जातिआधारित जनगणनेसारख्या संवेदनशील मुद्यावर राजकीय खेळ करणे अयोग्य आहे. या सर्व बाबींना विकृत स्वरूप देऊन देशाचे विभाजन करण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघाकडून लावण्यात आला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर