शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

पंजाबमधील शेतकरी आंदोलनाआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न; RSSचा आरोप

By योगेश पांडे | Updated: March 16, 2024 00:27 IST

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

नागपूर : पंजाबमधील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जोरदार टीका करण्यात आली आहे. पंजाबमध्ये फुटीरवादी तत्त्व व दहशतवादी मानसिकतेचे लोक परत सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकांअगोदर दोन महिन्यांअगोदर पंजाबमधील शेतकरी आंदोलन पुकारण्यात आले व त्याच्याआड अराजकता पसरविण्याचाच प्रयत्न सुरू असल्याची भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे. शुक्रवारी नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. यावेळी देशातील वर्तमान स्थितीवर भाष्य करताना सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सर्व प्रतिनिधींसमोर ही भूमिका मांडली.

सरकार्यवाहांतर्फे प्रतिवेदनातून वर्षभरातील एकूण सामाजिक स्थिती व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशात सकारात्मक वातावरण आहे; मात्र फुटीरवादी तत्त्वांना ही गोष्ट पचनी पडलेली नाही. त्यामुळे अशांतता निर्माण करणे व त्याचा राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करणे अशी कार्यप्रणाली आहे. मणिपूरमध्ये मैतेई व कुकी या दोन समाजांमध्ये याच तत्त्वांमुळे हिंसा वाढली. सीमेवरील राज्यांना यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला. समाजात अशा प्रकारे मनोवैज्ञानिक भेदभाव निर्माण करणे ही अतिशय धोकादायक बाब असल्याचे सरकार्यवाहांनी नमूद केले.

-पश्चिम बंगाल सरकारकडून संदेशखालीतील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्नयावेळी संघाकडून पश्चिम बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर थेट प्रहार करण्यात आला आहे. संदेशखाली येथे शेकडो माता-भगिनींवर अत्याचाराच्या घटनेने समाजमन आक्रंदित झाले; मात्र तेथील शासनाकडून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून महिला सुरक्षा व सन्मानाच्या विषयावर एकत्र यायला हवे, अशी भूमिका सरकार्यवाहांनी मांडली.

-अनुसूचित जातीच्या लोकांवर होणारे अत्याचार अमानवीयदेशाच्या विविध भागांतून अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय-अत्याचार होत असल्याच्या बातम्या येतात. अशा घटनांमुळे जे मतभेद उत्पन्न होतात त्याचे परिणाम व घाव दीर्घकाळ राहतात. अशा घटना अमानवीयच आहेत, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली आहे.

-जातिआधारित जनगणनेचा राजकीय खेळदक्षिण भारताला देशापासून वेगळे करणे किंवा जातिआधारित जनगणनेसारख्या संवेदनशील मुद्यावर राजकीय खेळ करणे अयोग्य आहे. या सर्व बाबींना विकृत स्वरूप देऊन देशाचे विभाजन करण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघाकडून लावण्यात आला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर