शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

Nagpur: महिलाशक्तीला मते मागण्याचे आवाहन, पण मंचावर एकच महिला, महायुतीच्या मेळाव्यातील वास्तव

By योगेश पांडे | Updated: January 14, 2024 23:39 IST

Nagpur: महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता.

- योगेश पांडेनागपूर : महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील त्यांच्या भाषणात महिलाशक्तीचाच नारा दिला. मात्र, प्रत्यक्षात मंचावर ४५ हून जास्त पदाधिकारी बसले असता त्यात केवळ एकच महिला असल्याचे चित्र होते. सभागृहात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये याचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

मेळाव्यात १४ पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), पिरिपा, आरपीआय (आठवले), ब.वि.आ., जे.एस.एस., आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरिएमं, शिवसंग्राम यांचा प्रामुख्याने समावेश होता. मंचावर विद्यमान आमदार, माजी खासदार-आमदारांसह सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंचावर ४५ हून अधिक नेते-पदाधिकारी बसले होते. मात्र, प्रत्यक्षात यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनिता जाधव या एकच महिला उपस्थित होत्या. चित्रा वाघ यांनी भाषणादरम्यान महिला अत्याचाराच्या आरोपींची वाढविलेली शिक्षा, कठोर कायदे, महिला सक्षमीकरण, महिलांपर्यंत योजनांचे महत्त्व पोहोचले, तर त्या जुळतील हे मुद्दे मांडले. महिला आघाडीची किती जास्त जबाबदारी आहे हेदेखील पटविण्याचा प्रयत्न केला. ५० टक्के मतदार महिला आहेत असे बोलत त्यांनी महिला मतदान वाढविण्याचे आवाहनदेखील केले. इतकेच काय तर छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशच्या विजयात महिला योजना व महिला मतदानाचा कसा फायदा झाला यावरदेखील प्रकाश टाकला. मात्र, वाघ असे बोलत असताना प्रत्यक्षात मंचावर मात्र त्यांच्याव्यतिरिक्त आणखी एकच महिला उपस्थित असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत होते.

-पक्षातील नेत्यांनी आता तरी विचार करावायाबाबत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वांनीच नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवरच भावना व्यक्त केल्या. महिला मतदारांची निवडणुकीत मौलिक भूमिका राहणार आहे. महिला सक्षमीकरण होत असून, राजकारणातदेखील अनेक महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. अशा स्थितीत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच संघटनेतील निर्णयप्रक्रियेतदेखील महिलांना स्थान देण्याबाबत नेत्यांनी विचार केला पाहिजे, असा महिला पदाधिकाऱ्यांचा सूर होता.

टॅग्स :nagpurनागपूर