शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Nagpur: महिलाशक्तीला मते मागण्याचे आवाहन, पण मंचावर एकच महिला, महायुतीच्या मेळाव्यातील वास्तव

By योगेश पांडे | Updated: January 14, 2024 23:39 IST

Nagpur: महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता.

- योगेश पांडेनागपूर : महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील त्यांच्या भाषणात महिलाशक्तीचाच नारा दिला. मात्र, प्रत्यक्षात मंचावर ४५ हून जास्त पदाधिकारी बसले असता त्यात केवळ एकच महिला असल्याचे चित्र होते. सभागृहात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये याचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

मेळाव्यात १४ पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), पिरिपा, आरपीआय (आठवले), ब.वि.आ., जे.एस.एस., आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरिएमं, शिवसंग्राम यांचा प्रामुख्याने समावेश होता. मंचावर विद्यमान आमदार, माजी खासदार-आमदारांसह सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंचावर ४५ हून अधिक नेते-पदाधिकारी बसले होते. मात्र, प्रत्यक्षात यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनिता जाधव या एकच महिला उपस्थित होत्या. चित्रा वाघ यांनी भाषणादरम्यान महिला अत्याचाराच्या आरोपींची वाढविलेली शिक्षा, कठोर कायदे, महिला सक्षमीकरण, महिलांपर्यंत योजनांचे महत्त्व पोहोचले, तर त्या जुळतील हे मुद्दे मांडले. महिला आघाडीची किती जास्त जबाबदारी आहे हेदेखील पटविण्याचा प्रयत्न केला. ५० टक्के मतदार महिला आहेत असे बोलत त्यांनी महिला मतदान वाढविण्याचे आवाहनदेखील केले. इतकेच काय तर छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशच्या विजयात महिला योजना व महिला मतदानाचा कसा फायदा झाला यावरदेखील प्रकाश टाकला. मात्र, वाघ असे बोलत असताना प्रत्यक्षात मंचावर मात्र त्यांच्याव्यतिरिक्त आणखी एकच महिला उपस्थित असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत होते.

-पक्षातील नेत्यांनी आता तरी विचार करावायाबाबत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वांनीच नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवरच भावना व्यक्त केल्या. महिला मतदारांची निवडणुकीत मौलिक भूमिका राहणार आहे. महिला सक्षमीकरण होत असून, राजकारणातदेखील अनेक महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. अशा स्थितीत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच संघटनेतील निर्णयप्रक्रियेतदेखील महिलांना स्थान देण्याबाबत नेत्यांनी विचार केला पाहिजे, असा महिला पदाधिकाऱ्यांचा सूर होता.

टॅग्स :nagpurनागपूर