शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: महिलाशक्तीला मते मागण्याचे आवाहन, पण मंचावर एकच महिला, महायुतीच्या मेळाव्यातील वास्तव

By योगेश पांडे | Updated: January 14, 2024 23:39 IST

Nagpur: महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता.

- योगेश पांडेनागपूर : महायुतीत सहभागी असलेल्या १४ पक्षांचे नेते-पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून एकत्रित आले व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. निवडणूक जिंकायची असेल, तर महिला आघाडीला जबाबदारी घेत पुढाकार घ्यावा लागेल व समाजातील जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावे लागेल, असा नेत्यांचा सूर होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील त्यांच्या भाषणात महिलाशक्तीचाच नारा दिला. मात्र, प्रत्यक्षात मंचावर ४५ हून जास्त पदाधिकारी बसले असता त्यात केवळ एकच महिला असल्याचे चित्र होते. सभागृहात उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये याचीच दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

मेळाव्यात १४ पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), पिरिपा, आरपीआय (आठवले), ब.वि.आ., जे.एस.एस., आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, बरिएमं, शिवसंग्राम यांचा प्रामुख्याने समावेश होता. मंचावर विद्यमान आमदार, माजी खासदार-आमदारांसह सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मंचावर ४५ हून अधिक नेते-पदाधिकारी बसले होते. मात्र, प्रत्यक्षात यात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अनिता जाधव या एकच महिला उपस्थित होत्या. चित्रा वाघ यांनी भाषणादरम्यान महिला अत्याचाराच्या आरोपींची वाढविलेली शिक्षा, कठोर कायदे, महिला सक्षमीकरण, महिलांपर्यंत योजनांचे महत्त्व पोहोचले, तर त्या जुळतील हे मुद्दे मांडले. महिला आघाडीची किती जास्त जबाबदारी आहे हेदेखील पटविण्याचा प्रयत्न केला. ५० टक्के मतदार महिला आहेत असे बोलत त्यांनी महिला मतदान वाढविण्याचे आवाहनदेखील केले. इतकेच काय तर छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशच्या विजयात महिला योजना व महिला मतदानाचा कसा फायदा झाला यावरदेखील प्रकाश टाकला. मात्र, वाघ असे बोलत असताना प्रत्यक्षात मंचावर मात्र त्यांच्याव्यतिरिक्त आणखी एकच महिला उपस्थित असल्याने विविध प्रश्न उपस्थित होत होते.

-पक्षातील नेत्यांनी आता तरी विचार करावायाबाबत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वांनीच नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवरच भावना व्यक्त केल्या. महिला मतदारांची निवडणुकीत मौलिक भूमिका राहणार आहे. महिला सक्षमीकरण होत असून, राजकारणातदेखील अनेक महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखविले आहे. अशा स्थितीत लोकसभा, विधानसभा निवडणुकांसोबतच संघटनेतील निर्णयप्रक्रियेतदेखील महिलांना स्थान देण्याबाबत नेत्यांनी विचार केला पाहिजे, असा महिला पदाधिकाऱ्यांचा सूर होता.

टॅग्स :nagpurनागपूर