शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के

By admin | Updated: June 13, 2017 16:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला.

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के लागला आहे. गतवर्षी अमरावती विभागाचा निकाल ८४.९९ टक्के लागला होता. यावेळी निकाल ०.६६ टक्क्यांनी माघारला आहे. ९ विभागीय मंडळांपैकी अमरावती विभागाने निकालांच्या टक्केवारीत सातवा क्रमांक पटकावला आहे. बुलडाणा जिल्ह्याने निकालात आघाडी घेतली असून यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलडाण्याची टक्केवारी ८८.४९ टक्के, वाशिम ८७.३७, अमरावती ८५.१५, यवतमाळ ७८.०३ तर अकोला जिल्ह्याची टक्केवारी ८४.०२ आहे. अमरावती विभागातील २,५२४ शाळांमधून एकूण १ लाख ७४ हजार ८१० विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ०४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४६,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ७६,९५६ मुले, तर ६९,८४६ मुली आहेत. निकालात यंदाही मुलींचा वरचष्मा असून विभागातून ८८.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्के वारी ८१.२४ इतकी आहे. यंदा गैरमार्गाचा अवलंब केल्याची ११६ प्रकरणे अमरावती विभागात निदर्शनास आलीत. यात ११४ विद्यार्थी दोषी सिद्ध झाले असून २ प्रकरणे निर्दोष ठरविण्यात आले आहेत. अकोल्यातील ३५ प्रकरणांपैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहे. अमरावती २५ पैकी शून्य निर्दोष, बुलडाणा ३० पैकी एक निर्दोष, यवतमाळ १५ पैकी एक निर्दोष, वाशिम ११ पैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान ५६ आक्षेपार्ह प्रकरणे निदर्शनास आले होती. त्यापैकी ४३ विद्यार्थी निर्दोष ठरले आहेत तर १३ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. यावेळी चित्रकला ४,८९६, शास्त्रीय कला २११, लोककला ६, तर क्रीडा प्रकारातून ४७४ विद्यार्थ्यांनी गुणांची सवलत घेतली आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसेच मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.काही तांत्रिक अडचणींमुळे निकाल लांबणीवर पडला. बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झालेला निकाल अधिकृत असून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. बुधवारपासून पुनर्मूल्यांकनास सुरूवात होईल. पुरवणी परीक्षा जुलै, आॅगस्टमध्ये घेतली जातील.- संजय गणोरकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती.