शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

कोरोनावर ‘प्राणायाम’ची मात्रा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:08 IST

नागपूर : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात जनता प्रचंड नैराश्यात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखी स्थिती आहे. लाखो रुपयांचा खर्च ...

नागपूर : सध्या कोरोना संक्रमणाच्या काळात जनता प्रचंड नैराश्यात आहे. घरोघरी कोरोनाचे रुग्ण असल्यासारखी स्थिती आहे. लाखो रुपयांचा खर्च आणि मनात भयगंड अशा स्थितीमध्ये कोरोनावर प्राणायामाची मात्रा अत्यंत उपयुक्त असल्याचे मत योग अभ्यासक आणि योग प्रशिक्षकांनी व्यक्त केले आहे.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळामध्ये व्यायाम, योग, प्राणायाम याकडे अनेकांचा कल वाढला आहे. कधी नव्हे ती मंडळीही सकाळी नियमित व्यायाम आणि योग करताना दिसत आहे. कोरोनाच्या काळामध्ये भारतातील योगविद्या आणि प्राणायामाचे महत्त्व लोकांना पटायला लागल्याचे एकूण स्थितीवरून दिसत आहे. कपालभाती, अनुलोम विलोम, भस्रिका या मुख्य प्राणायामासोबतच उजैयी प्राणायाम, भ्रामरी, उद्गित, प्रणव हे प्रकारही महत्त्वाचे मानले जात आहेत. रुग्णालयामधून सुटी झाल्यावर डॉक्टर मंडळीसुद्धा फिरण्याचा आणि व्यायामाचा सल्ला देतात, यामागील कारण शारीरिक क्षमता वाढविणे हेच असते.

....

नियमित प्राणायाम केल्याचे फायदे

१. सध्याच्या कोरोना संकटकाळात ऑक्सिजनची पातळी कायम राखणे आणि रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भस्रिका प्राणायामामुळे शरिरातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. सर्वांनी तो सतत करत राहिल्यास फायदा होतो. हा व्यायाम केव्हाही करता येतो.

२. सकाळी लवकर उठण्याची सवय शरीराला लागते. यामुळे आहार, विहार उत्तम राहतो. खानपानही नियंत्रणात राहून आयुष्याला चांगले वळण लागते. कपालभाती, अनुलोम विलोम केल्याने चेहऱ्याचे तेज वाढते, ओज वाढते.

३. नियमित व्यायामामुळे संपूर्ण शरीर अनेक वर्षे चांगले आणि सुदृढ राहते. किडनी, हार्ट, लिव्हर मजबूत होते. लवकर थकवा येत नाही. दिवसभर मन प्रसन्न राहते. शरीरात उत्साह कायम भरून राहतो. सकारात्मकपणे विचार करण्याची सवय लागते. यामुळे कौटुंबिक वातावरणही चांगले राहते.

....

प्राणायाम तज्ज्ञ म्हणतात....

योग, प्राणायाम आणि व्यायाम या तिन्ही बाबी मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्राणायामाचा संबंध मनाशी आहे. व्यायामाचा संबंध शरीराशी आहे, तर योगाचा संबंध शारीरिक आंतरक्रियेशी आहे. कोरोना काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे आवर्जून करायलाच हवे.

- विठ्ठलराव जीभकाटे, ज्येष्ठ योगतज्ज्ञ

...

आयुष्य वाढवायचे असेल आणि निरोगी जगायचे असले तर सर्वांनी योग, प्राणायामाची सवय लावून घ्यायला हवी. यामुळे शरीराला कोणताच अपाय नाही, उलट फायदाच आहे. भारतीय योगशास्त्र महान आहे. व्याधी, रोगनिवारणाची शक्ती यात असून ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

- योगरत्न माया हाडे, पश्चिम नागपूर पतंजली प्रमुख

...

नियमित योग करणारे म्हणतात

कोरोना संक्रणाला परतवून लावण्यासाठी योग-प्राणायाम उत्तम शस्त्र आहे. मला स्वत:ला संसर्ग झाला होता, मात्र १५ वर्षांच्या नियमित योग प्राणायामामुळे कोणताही त्रास झाला नाही. मागील कितीतरी वर्षात मला ताप आलेला नाही.

- माधुरी ठाकरे, नागपूर

...

मागील १५ वर्षांपासून मी नियमित योग, प्राणायाम करतो. यामुळे माझी दिनचर्या बदलली. स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारशक्ती वाढली. शारीरीक क्षमताही वाढली आहे. डाॅक्टरांकडे जाण्याचा खर्च वाचला आहे.

- प्रदीप काटेकर, नागपूर

...