शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आंबेडकरवादी व कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज

By admin | Updated: July 19, 2015 03:09 IST

देशात आज ‘फॅसिस्टां’चा अधिक बोलबाला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांमध्येच त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता असून फॅसिस्टांचा मुकाबला करण्यासाठी ...

नेताजी राजगडकर प्रथम स्मृतिदिन : उपस्थित वक्त्यांचा सूर नागपूर : देशात आज ‘फॅसिस्टां’चा अधिक बोलबाला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांमध्येच त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता असून फॅसिस्टांचा मुकाबला करण्यासाठी फुले-शाहू- आंबेडकर आणि कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सूर हिंदी मोरभवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी काढला. आदिवासी साहित्य परिषद व समतेसाठी बहुजन संघर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिंदी मोरभवन येथील सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विचारवंत प्रा. या.व. वडस्कर हे अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, कम्युनिस्ट नेते डॉ. रतिनाथ मिश्रा आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे प्रमुख वक्ते होते. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, नेताजी यांनी राजकारणाला समाजकारणाचे एक माध्यम मानले. त्यामुळेच ते कुठल्याच एका पक्षात अडकून राहू शकले नाही. त्यांनी अनेक पक्षात काम केले असले तरी त्यांची शेवटपर्यंत कम्युनिस्ट विचारांशीच बांधिलकी होती. आदिवासी साहित्याच्या संकल्पनेचे ते जनक होते. नेताजी एक कृतिशील योद्धा होते. त्यांनी अनेक आयुधांचा वापर करून लढा दिला. देशात राज्यघटना संपविण्याचे षड्यंत्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर व मार्क्सवादी विचारांची गरज आहे. नागेश चौधरी म्हणाले, जातीव्यवस्था व वर्गव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय या देशात समता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे कम्युनिस्ट व फुले-आंबेडकरवादी यांना एकत्र आणण्यासाठी नेताजी राजगडकरांनी अभियान राबविले होते. आज त्याची अधिक गरज आहे.डॉ. रतिनाथ मिश्रा म्हणाले, कम्युनिस्ट हे जसे भरकटले तसेच फुले आणि आंबेडकरवादीसुद्धा भरकटले; परंतु आता त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. शैलेश पांडे यांनी नेताजी राजगडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत छेट्या छोट्या परिवर्तनातूनच परिवर्तनाची चळवळ पुढे जात राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले. वडस्कर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, देशात आज सर्वत्र निराशाचे वातावरण दिसून येत असले तरी आपण प्रचंड आशावादी आहोत. कारण प्रत्येक समाजाची विकासाची एक गती असते. त्या गतीने तो विकास करतो. आज आदिवासी बहुजन समाज शिक्षण घेत असल्याने त्याला आपल्या अधिकारांची अधिक जाणीव आहे. त्यामुळे तो उद्या आपल्या अधिकारांची मागणी करणे आणि त्यानंतर ते हिसकावण्याची क्षमतासुद्धा विकसित करेल, असा विश्वास व्यक्त केला. अशोक पळवेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र मरसकोल्हे यांनी संचालन केले. चंद्रकांत मुगले, उषाकिरण आत्राम, बाळासाहेब नागदेवते, रमेश गेडाम, प्रभू राजगडकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)