शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकजूट व्हावे

By admin | Updated: November 17, 2014 00:57 IST

देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना

दलित हत्याकांड निषेध परिषद : श्यामदादा गायकवाड यांचे प्रतिपादन नागपूर : देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना संपविण्याचे घाट घातला जात आहे. तेव्हा या भीषण परिस्थितीतून दलित, शोषित, कष्टकरी, मजुरांना वाचविण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांनी आज येथे केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर) च्यावतीने आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (यू), बोल्शेविक पक्ष, युडीएफ, शेकाप, समता सैनिक दल आदी विविध संघटनांच्या सहयोगाने रविवारी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे ‘जवखेडे दलित हत्याकांड निषेध परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांच्या हस्ते मशाल पेटवून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्यामदादा गायकवाड म्हणाले, जवखेडे हत्याकांड हा केवळ योगायोग नाही तर ही जातीयवादी व्यवस्था पुन्हा देशात लागू करण्याची सुरुवात आहे. कारण या हत्याकांडातील दोषींना अजूनही अटक झालेली नाही. आरोपी कोण आहेत, हे सत्ताधाऱ्यांपासून तर विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. तरी आरोपीला अटक होत नाही, याला आणखी काय म्हणावे. आंबेडकरी संघटना आज कमकुवत झाल्या आहेत, आमचे नेते लाचार झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर प्रतिकार करणारी संघटना आपण निर्माण करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ही व्यवस्था केवळ दलितांच्या विरोधातच आहे असे नाही तर श्रमिक, कष्टकरी यांना संपविण्याचे घाट सुद्धा घातला जात आहे.या जातीयवादी आणि भांडवलशाहीविरुद्ध केवळ आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनीच लढा दिलेला आहे. आज या दोन्ही संघटनांची शक्ती कमकुवत झाली असली तरी ती संपलेली नाही. त्यामुळे नव्या दमाने पुन्हा लढण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रणजित मेश्राम आणि प्रदीप गायकवाड यांनीही जवखेडे हत्याकांडावर प्रकाश टाकला. भाऊराव बादसे यांनी क्रांतिगीत सादर केले. अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक मांडले. दिनेश अंडरसहारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)