शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकजूट व्हावे

By admin | Updated: November 17, 2014 00:57 IST

देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना

दलित हत्याकांड निषेध परिषद : श्यामदादा गायकवाड यांचे प्रतिपादन नागपूर : देशात पुन्हा एकदा धर्मसत्ता आणून सामाजिक गुलामगिरी थोपविण्याचे कटकारस्थान सुरू झाले आहे. एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढले आहेत तर दुसरीकडे नवभांडवलशाहीच्या माध्यमातून श्रमिक-मजुरांना संपविण्याचे घाट घातला जात आहे. तेव्हा या भीषण परिस्थितीतून दलित, शोषित, कष्टकरी, मजुरांना वाचविण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)चे अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांनी आज येथे केले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर) च्यावतीने आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी, सीपीएम, फॉरवर्ड ब्लॉक, जनता दल (यू), बोल्शेविक पक्ष, युडीएफ, शेकाप, समता सैनिक दल आदी विविध संघटनांच्या सहयोगाने रविवारी हिंदी मोरभवन सीताबर्डी येथे ‘जवखेडे दलित हत्याकांड निषेध परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांच्या हस्ते मशाल पेटवून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. श्यामदादा गायकवाड म्हणाले, जवखेडे हत्याकांड हा केवळ योगायोग नाही तर ही जातीयवादी व्यवस्था पुन्हा देशात लागू करण्याची सुरुवात आहे. कारण या हत्याकांडातील दोषींना अजूनही अटक झालेली नाही. आरोपी कोण आहेत, हे सत्ताधाऱ्यांपासून तर विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे. तरी आरोपीला अटक होत नाही, याला आणखी काय म्हणावे. आंबेडकरी संघटना आज कमकुवत झाल्या आहेत, आमचे नेते लाचार झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानंतर प्रतिकार करणारी संघटना आपण निर्माण करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ही व्यवस्था केवळ दलितांच्या विरोधातच आहे असे नाही तर श्रमिक, कष्टकरी यांना संपविण्याचे घाट सुद्धा घातला जात आहे.या जातीयवादी आणि भांडवलशाहीविरुद्ध केवळ आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनीच लढा दिलेला आहे. आज या दोन्ही संघटनांची शक्ती कमकुवत झाली असली तरी ती संपलेली नाही. त्यामुळे नव्या दमाने पुन्हा लढण्यासाठी आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. रणजित मेश्राम आणि प्रदीप गायकवाड यांनीही जवखेडे हत्याकांडावर प्रकाश टाकला. भाऊराव बादसे यांनी क्रांतिगीत सादर केले. अशोक सरस्वती यांनी प्रास्ताविक मांडले. दिनेश अंडरसहारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)