शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

आंबेडकरी चळवळीचे आधारवड एल. आर. बाली यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 22:08 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सेनानी, आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये याेद्धा व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कमांडर एल. आर. बाली यांचे गुरुवारी निधन झाले.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सेनानी, आंबेडकरी चळवळीचे लढवय्ये याेद्धा व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कमांडर एल. आर. बाली यांचे गुरुवारी निधन झाले. जालंधर, पंजाब येथे निवासस्थानी त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे हाेते.

२० जुलै १९३० ला पाकिस्तान भागात जन्मलेले बाली फाळणीनंतर दिल्लीला आले. १९३५ ते १९४६ दरम्यान लाहाेरच्या जात-पात ताेडक मंडळाच्या क्रांती या मासिकामुळे बाली बाबासाहेबांच्या विचार-कार्याने प्रभावित झाले हाेते. दिल्लीला आल्यानंतर बाली यांनी बाबासाहेबांच्या कार्यात सक्रियता वाढविली. १९५० पासून ते महामानवासाेबत काम करीत हाेते. डाॅ. बाबासाहेबांच्या निधनानंतर सरकारी नाेकरीचा राजीनामा देत बाली यांनी पूर्णपणे महामानवाच्या विचार प्रसारात स्वत:ला समर्पित केले. सप्टेंबर १९५९ मध्ये त्यांनी ‘भीम पत्रिका’चे प्रकाशन सुरू केले. या पत्रिकेतून ५० वर्षे महामानवाचे विचार देशभर व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले.

त्या काळात डाॅ. बाबासाहेबांचे विचार कार्य मराठी भाषेत उपलब्ध हाेते. त्यांच्या कार्याचा, विचारांचा प्रसार देशभरात व विदेशातही व्हावा यासाठी बाली यांनी हिंदीत लेखनाला सुरुवात केली. पत्रिकेतून अमर्याद लेखन करतानाच बाबासाहेबांचे विचार, कार्य, संविधान, त्यांच्या जीवनातील बारीकसारीक गाेष्टींचा सखाेल आढावा घेणाऱ्या ३५ च्यावर पुस्तकांचे लेखन, संपादन व प्रकाशन बाली यांनी केले. समता सैनिक दलाच्या माध्यमातून देशभरात बहुजन समाजाला त्यांनी एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा साेहळ्यापासून बाली यांचा नागपूरशी घनिष्ठ संबंध राहिला आहे. एकदा नागपूरला झालेल्या कार्यक्रमात बाेलताना, ‘महामानवाचा सच्चा सेनानी म्हणवणे नाेबेल पुरस्कारासारखे आहे’, अशी भावना बाली यांनी व्यक्त केली हाेती. महामानवाच्या महापरिनिर्वाणानंतर ६७ वर्षांपर्यंत त्यांच्या विचारांचा प्रकाश सतत तेवत ठेवणाऱ्या बाली यांना आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले.

टॅग्स :Deathमृत्यू