शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

आंबेडकरी समाजाने काँग्रेस-भाजपमागे फरफटत जाऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:53 IST

काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला.

ठळक मुद्देलॉर्ड बुद्धा टीव्हीच्या चर्चासत्रातील सूर : स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस आणि भाजप हे दोघेही सारखेच आहेत. त्यांच्यासोबत जाऊन आंबेडकरी समाजाचे भले होणार नाही. त्यामुळे काँग्रेस-भाजपमागे समाजाने फरफटत न जाता स्वत:ची स्वतंत्र ताकद दाखविण्याची गरज आहे, असा सूर संविधान चौकात आयोजित चर्चासत्रात निघाला.लॉर्ड बुद्धा टीव्हीतर्फे शनिवारी संविधान चौकात चर्चासत्र आयोजित केले होते. ‘लोकसभा निवडणूक २०१९ आणि आंबेडकरी समाज’ हा या चर्चासत्राचा विषय होता. यासाठी विविध पक्षाच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण करण्यत आले होते. यात काँग्रेसकडून संजय मेश्राम, भाजपकडून धर्मपाल मेश्राम, बसपाकडून उत्तम शेवडे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे रवी शेंडे उपस्थित होते. यासोबतच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम हेही व्यासपीठावर होते.लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर यांनी भूमिका विशद केली. ते म्हणाले, नागपूर हा बौद्ध आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु या बालेकिल्ल्याची ताकद अलीकडे निवडणुकीत दिसत नाही. तेव्हा या लोकसभा निवडणुकामध्ये आंबेडकरी समाजाची नेमकी भूमिका काय असावी, यासंदर्भात ही चर्चा घडवून आणली जात असल्याचे स्पष्ट केले.यावेळी विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापल्या पक्षाची भूूमिका विशद केली. अनेक विषयांवर नागरिकांनी आपली तीव्र प्रतिक्रियाही दिली. उदाहरणार्थ खैरलांजी विषयावर नागरिकांनी काँग्रेसला धारेवर धरले. खैरलांजी प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी का दिली, असा प्रश्न विचारण्यात आला तर आरक्षण व संविधानाच्या विषयावर लोकांनी भाजपला घेरले.एक खासदार व एक आमदार मिळविण्यासाठी इतर पक्षांशी युती होऊ नये.आरक्षण, रोस्टर, पाली भाषेचा विषय, पदोन्नतीतील आरक्षण, शिष्यवृत्ती आदींसह समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन इतर पक्षांसोबत आघाडी व्हावी, असा सूरही या चर्चासत्रात निघाला.लॉर्ड टीव्हीचे संचालक सचिन मून यांच्यासह राजू मून, महेश नागपुरे, दत्ताजी गजभिये, अजय डोंगरे, दिनेश सोमकुंवर, कुणाल कांबळे, सिद्धार्थ सोनारे आदी उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रोखण्याचे काम काँग्रेसने सुरुवातीपासूनच केले आहे. बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करण्याचे आणि समाजाला शासक बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावर चिंतन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.उत्तम शेवडेबसपाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले. परंतु त्या संविधानातील अधिकार समाजाला सहजासहजी मिळाले नाही. इतकी वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने ते मिळू दिले नाही. प्रत्येक अधिकारासाठी आंदोलन करावे लागले. रस्त्यावर यावे लागले. त्यामुळे आता आपल्यालाच आपली लढाई लढावी लागेल.रवी शेंडेवंचित बहुजन आघाडीकाँग्रेसवर आरोप केले जातात. परंतु काँग्रेस जर खरंच बहुजन समाजाच्या विरोधात असती तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याचा अधिकार दिला असता का? आजच्या परिस्थितीचे आकलन करा. आज काय सुरू आहे, त्याचा विचार करा.संजय मेश्रामकाँग्रेसकेवळ निवडणुकीचा विचार न करता सामाजिक विषयावरही चिंतन होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समता, स्वातंत्र्य व बंधूता ही त्रिसूत्री संविधानात सांगितली आहे. तेव्हा सर्व विचारधारेमध्ये आपासात द्वंद्व न होता, सर्व विचारधारांच्या लोकांनी हातात हात घालून मानव कल्याणाचा विचार करता येऊ शकतो.धर्मपाल मेश्रामभाजपडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्रिसूत्री दिली आहे. ती म्हणजे रिपब्लिकन पक्ष, संविधान आणि बौद्ध धर्म. या तिघांचीही स्थिती आज काय आहे, यावर चिंतन करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळीतील काही नेते किंवा कार्यकर्ते विविध पक्षात असले तरी, त्यांचे साामजिक कार्य कमी लेखता येणार नाही. चळवळीच्या एकजुटीसाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे.डॉ. पूरणचंद्र मेश्रामआंबेडकरी विचारवंत

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019