शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ट्रान्समिशन लाईनसाठी बदलला अंबाझरीचा दर्जा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:07 IST

Nagpur News Ambazari अंबाझरी जैवविविधता उद्यानातून जाणाऱ्या उच्चदाबाच्या ट्रान्समिशन वीज वाहिनीवरून वन विभागाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. मुख्य वनसंरक्षकांनी उपवनसंरक्षकांना लिहिलेल्या पत्रातून हे दिसत आहे.

ठळक मुद्देअंबाझरीचा नेमका दर्जा कोणता? वन विभागाला पर्यावरण क्लिअरन्सची आवश्यकता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानातून जाणाऱ्या उच्चदाबाच्या ट्रान्समिशन वीज वाहिनीवरून वन विभागाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. मुख्य वनसंरक्षकांनी उपवनसंरक्षकांना लिहिलेल्या पत्रातून हे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार,‘अ’ दर्जात येणाऱ्या वन उद्यानात कोणत्याही प्रकल्पासाठी पर्यावरण क्लिअरन्स (ईसी) अनिवार्य असते. मात्र वन विभागाच्या रेकॉर्डवर अंबाझरी उद्यान ‘ब’ दर्जात असल्याने ईसीची आवश्यक्ता नाही. यामुळे ट्रान्समिशन लाईनचे काम थांबविण्यासाठी वन विभागाने नकार दिला आहे.

अंबाझरी उद्यानातून जाणाऱ्या उच्चदाबाच्या ट्रान्समिशन लाईनला ईसी अनिवार्य नाही का, असा प्रश्न माजी वन्यजीव संरक्षक जयदीप दास यांनी विचारला होता. त्यावर मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख दास यांनी केला आहे. ते म्हणाले, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ तसेच २००६ च्या पर्यावरण परिणाम मूल्यांकनाच्या परिपत्रकात आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान मंत्रालयाच्या दिशानिर्देशामध्ये ‘ब’ दर्जाच्या उद्यानात कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पासाठी ईसी घेणे आवश्यक नाही. मात्र तलाव, संरक्षित वन किंवा प्रवासी पक्ष्यांचा अधिवास असलेली ठिकाणे ‘अ’ दर्जाची मानली जातील. हा विचार करता अंबाझरी जैवविविधता उद्यान ‘अ’ दर्जात येते. तरीही वन विभाग आपली जबाबदारी झटकत आहे.

विशेषज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना

एमएसटीसीएलने ट्रान्समिशन लाईनसाठी ९०० वृक्ष कापण्याची परवानगी मागितली होती. ऑगस्ट २०१३ मध्ये यासाठी पर्यावरण मंत्रालयाने परवानगीही दिली होती. त्यामुळे ट्रान्समिशनचे काम थांबविण्याचा प्रश्न येत नाही. परंतु झाडांचे कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी याच परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून येथील विशेषज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे तसेच एफडीसीएम अथवा ट्रॉपिकल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (टीएफआरआय), जबलपूर येथील विशेषज्ञांसोबत चर्चा केल्यानंतरच काम सुरू करण्याचे निर्देश एमएसटीसीएलला देण्यात आले आहे.

-----

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव