शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:10 IST

राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.

ठळक मुद्देआठवणीतील गीतांनी व्याख्यान मोहरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.प्रेस क्लबमध्ये ग्रंथप्रेमी मुकुंदराव नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. हिंदी चित्रपटातील गीतांबद्दल ते म्हणाले, अफाट असलेले हे गीतांचे साम्राज्य म्हणजे जणू स्वतंत्र गणराज्यच आहे. या गणराज्यात रसिक हे नागरिक तर रसिक व गाणी ही युती आहे. या साम्राज्यात जीएसटी नाही, सीएए नाही किंवा कसलाही टॅक्स नाही. केवळ निखळ आनंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हिंदी चित्रपटगीतांचा प्रवास त्यांनी उलगडला. १९६०-७० नंतरच्या दशकातील अनेक प्रसंगांचे साक्षीदार असलेल्या मिश्र यांंनी संगीतक्षेत्रातील अनेक प्रसंग आणि गमतीजमतीही श्रोत्यांना ऐकविल्या. ते म्हणाले, संगीतकार नौशाद हे लोकसंगीताचे उत्तम जाणकार होते. पाश्चात्त्य संगीताचा उपयोग त्यांनी आपल्या संगीतामधून केला. सुहानी रात ढल गयी, कोई सागर दिल को बहलाता नही यासारख्या अनेक गीतांमधून ते आठवणीत राहिले. नौशादांना मुंबईत जाऊन गाणी शिकायची होती, तर अनिल बिश्वास यांना क्रांतिकारी होऊन इंग्रज अधिकाऱ्याचा खून करायचा होता. मात्र पुढे बिश्वास संगीतात रमले. यशवंत देवांच्या अरुण दाते यांनी गायलेल्या गीतांवर तसेच अनिल खळे यांच्या संगीतावर बिश्वास यांचा प्रभाव होता. त्यांची गीते ऐकल्यावर संवेदनशील मनाला जाग आल्यासारखे वाटते, ही त्यांच्या स्वरांची शक्ती होती. नौशाद, अनिल बिश्वास, सी. रामचंद्रन यांनी हिंदी संगीताला आत्मसन्मान दिला. चितळकरांच्या ‘शोला जो भडके’ यासारख्या गाण्यांनी संगीताला नवा बाज दिला.संगीतकारांचे तेव्हा एकमेकांशी मैत्रीचे संबंध होते. एकमेकांच्या गीतांना चाली सुचविण्यापासून त्यांची सलगी असायची. तलत महमूद आणि नौशाद यांची घट्ट मैत्री होती. मुखर्जी आणि अशोककुमार यांचेही फार सख्य होते. बर्मन यांनी नंतरच्या काळात मोठी झेप घेतली.ओ.पी. नय्यर वेळेचे फार पक्के होते. एकदा मोहम्मद रफी वेळेवर पोहचले नाही म्हणून पुढची तीन वर्षे त्यांनी त्यांना गाणीच दिली नव्हती, अशी आठवण मिश्र यांनी सांगितली. नौशाद यांनी गझल चित्रपटात आणली आणि रूढ केली. गुलाम हैदर साहेबांनी लता मंगेशकरांना शब्दांचे वजन शिकविले. नय्यर यांनी आशादीदींच्या गळ्याचे सामर्थ्य ओळखले होते. मोहम्मद रफींना नौशाद यांनी शिकविले. अनेक संगीतकारांनी गायकांना घडविले.गीतकार शैलेंद्र सिंग, शकील बदायुनी, आझमी यांच्यासह अनेक नावाजलेल्यांचा उदय १९५० नंतर झाला. साहिर लुधियानी यांच्या आयुष्याचा प्रवास लाहोर ते दिल्ली व पुढे मुंबई असा झाला. या सर्वांनी संगीताला उच्चस्थानावर पोहचविले. म्हणूनच हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा अवीट आणि अमीट आहे.संगीतकारांचा ब्लॉक अन् लतादीदींची चालबरेचदा संगीतकारांना ब्लॉक आलेला असतो. अशा वेळी गायकही स्वत:च्या कल्पकतेतून चाल सुचवितात आणि गीत अजरामर कसे होते, याचा किस्सा अंबरिश मिश्र यांनी ऐकविला. एकदा नौशाद आणि मदनमोहन यांना एका गीताला चाल लावायची होती. बराच प्रयत्न करूनही मनासारखी चाल लागेना. तेव्हा मनाचा हिय्या करून लता मंगेशकरांनी गीताचा कागद मागितला. काहीशा त्रोटकपणे नौशादांनी तो त्यांना दिला. सुमारे १५ मिनिटांनी लतादीदींनी नंद रागातील चाल सुचविली. ते गीत होते ‘तू जहां जहां जहां चलेगा’! नौशादांनी दिवसभर नोटेशन घातले आणि पुढे ते गीत अजरामर झाले.

टॅग्स :musicसंगीतliteratureसाहित्यnagpurनागपूर