शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

सत्याचा नेहमीच विजय

By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST

नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित

नागपूर : नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला. मुनीश्रींनी याप्रसंगी श्रावकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, परिस्थिती कशीही असो, कुठलेही युग असो, नेहमीच सत्याची विजय झाला आहे आणि पुढेही होत राहील. आपल्या प्रवचनात त्यांनी एका पौराणिक कथेचा दृष्टांत दिला. यात सत्य हेच सर्वात मोठे धन आहे. सत्याचा मार्गावर आपण चालत असाल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्याजवळ येईल. ते म्हणाले की, दिंगबर संतांच्या शरीरावर कुठलेही वस्त्र नसतात. जिथे कपडे असतात, तिथे लफडेही असतात. जसे चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच चरित्र स्वच्छ ठेवण्यासाठी संतांच्या वाणीची आवश्यकता असते. मी विचार नाही, संस्कार घेऊन आलो आहे. सत्य हे देवाचे दुसरे नाव आहे. मानवात सत्याची भावना नसल्यामुळे शेजाऱ्या-शेजाऱ्यात भांडणे आहे. कुणाचा कुणावरही विश्वास राहिला नाही. जीवनात एखादी हरविलेली वस्तू मिळू शकते. मात्र हरविलेला विश्वास परत मिळविणे शक्य नाही. त्यामुळे मानवाने ‘सत्यमेव जयते’ समजणे आवश्यक आहे. प्रवचनापूर्वी मंडपाचे उद्घाटन राजेश सरावगी यांनी केले. मंगल कलशाची स्थापना रमेशचंद्र जैन गोंदियावाले यांनी केली. प्रवचनमालेचे दीपप्रज्वलन महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद,अतुल लोंढे, अतुल कोटेचा, दिलीप जैन, विवेक सोईतकर, संतोष पेंढारी, नितीन महाजन, महेश नाईक, प्रकाश मारवडकर, पंकज बोहरा, प्रवीण भेलांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)