शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सत्याचा नेहमीच विजय

By admin | Updated: September 17, 2014 00:55 IST

नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित

नागपूर : नागपूर सकल जैन समाजातर्फे आर्यनंदजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला मंगळवारपासून चिटणीस पार्कवर प्रारंभ झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या प्रवचनाचा लाभ घेतला. मुनीश्रींनी याप्रसंगी श्रावकांना संबोधित करताना स्पष्ट केले की, परिस्थिती कशीही असो, कुठलेही युग असो, नेहमीच सत्याची विजय झाला आहे आणि पुढेही होत राहील. आपल्या प्रवचनात त्यांनी एका पौराणिक कथेचा दृष्टांत दिला. यात सत्य हेच सर्वात मोठे धन आहे. सत्याचा मार्गावर आपण चालत असाल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्याजवळ येईल. ते म्हणाले की, दिंगबर संतांच्या शरीरावर कुठलेही वस्त्र नसतात. जिथे कपडे असतात, तिथे लफडेही असतात. जसे चेहरा स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच चरित्र स्वच्छ ठेवण्यासाठी संतांच्या वाणीची आवश्यकता असते. मी विचार नाही, संस्कार घेऊन आलो आहे. सत्य हे देवाचे दुसरे नाव आहे. मानवात सत्याची भावना नसल्यामुळे शेजाऱ्या-शेजाऱ्यात भांडणे आहे. कुणाचा कुणावरही विश्वास राहिला नाही. जीवनात एखादी हरविलेली वस्तू मिळू शकते. मात्र हरविलेला विश्वास परत मिळविणे शक्य नाही. त्यामुळे मानवाने ‘सत्यमेव जयते’ समजणे आवश्यक आहे. प्रवचनापूर्वी मंडपाचे उद्घाटन राजेश सरावगी यांनी केले. मंगल कलशाची स्थापना रमेशचंद्र जैन गोंदियावाले यांनी केली. प्रवचनमालेचे दीपप्रज्वलन महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. विकास कुंभारे, माजी मंत्री अनिस अहमद,अतुल लोंढे, अतुल कोटेचा, दिलीप जैन, विवेक सोईतकर, संतोष पेंढारी, नितीन महाजन, महेश नाईक, प्रकाश मारवडकर, पंकज बोहरा, प्रवीण भेलांडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)