शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने राहील एक दिवसाआड पाणी : नागपुरात पाण्याची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:28 IST

जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून डेड स्टॉक फक्त शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मनपा, जि.प., जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देफक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणीपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : फक्त पाणीटंचाईकडेच लक्ष केंद्रित करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या जलाशयातील पाण्याचा साठा जवळजवळ संपला असून डेड स्टॉक फक्त शिल्लक आहे. तोतलाडोहमध्ये ५६ दशलक्ष घनमीटर तर नवेगाव खैरीला ३३ दशलक्ष घनमीटर (वापरण्यायोग्य) पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. फक्त ३५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून, अधिकाऱ्यांनी अन्य सर्व कामे बाजूला ठेवून पाणीटंचाईशी यशस्वी सामना कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मनपा, जि.प., जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.नासुप्रच्या सभागृहात पाणी आरक्षणाबद्दल एक बैठक पालकमंत्री बावनकुळे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.शहराला फक्त ३५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असून, नुकताच सुरू केलेला एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती चार महिन्यापर्यंत राहू शकते, असा अंदाज या बैठकीत अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. तोतलाडोह जलाशयातून मनपा जलप्रदाय विभागाचे पंप तलावातील पाण्याची पातळी ३१८ मीटरपर्यंत असताना पाणी खेचू शकतात. पण आता पातळी ३१४ मीटरपर्यंत आली आहे. पाणी खेचणाºया पंपाच्या हेडमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून ३११ मीटर पाण्याच्या पातळीपासून या पंपांनी पाणी खेचावे, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे. नवेगाव खैरीत मात्र ३३ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यायोग्य उपलब्ध असून, ते शहराला पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे.आतापर्यंत दररोज मनपा ६४० दशलक्ष घनमीटर पाणी शहराला पुरवीत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे तलावातील पाण्याची पातळी १५ दिवसात वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील चौराई जलाशयात ९४ दशलक्ष घनमीटर पाणी असून, आवश्यकता भासल्यास दोन्ही शासनाच्या स्तरावर बैठक घेऊन त्यातील १०-१५ दशलक्ष घनमीटर पाणी नागपूरसाठी घ्यावे लागणार आहे. ही सर्व वस्तुस्थिती शासनाला कळविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या असलेले पाणी फक्त पिण्यासाठी शिल्लक ठेवावे लागणार आहे.पाण्याच्या योग्य वापरासाठी झोननुसार दक्षता समित्यामहानगरपालिकेने कमी पाणी वापरासाठी काय उपाययोजना केल्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याचा पिण्याशिवाय अन्य कारणांसाठी वापर होऊ नये. उदाहरणार्थ बांधकाम, वाहने धुणे आदी यासाठी झोननुसार दक्षता समित्या गठित करण्यात येणार असून या समित्या पाणीवापरावर नियंत्रण ठेवणार आहेत. मनपाच्या पाणीपुरवठ्यापैकी ३० टक्के पाणी व्यावसायिक वापरासाठी दिले जाते. त्यातही कपात करण्यात येणार आहे. हॉटेल, बारमालक यांच्या पाणीवापरावर बंधने येणार आहेत. याशिवाय पाण्याची अजिबात गळती होणार नाही, यासाठी मनपाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.महानिर्मितीच्या पाण्यातही कपातमहानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना लागणाऱ्या पाण्यातही काही प्रमाणात कपात करण्यात येईल. कोराडीचे केंद्र सिवरेज ट्रीटमेंट प्लँटच्या पाण्यावरच सुरु आहे. फक्त पिण्यासाठीच महानगरपालिकेच्या पाण्याचा वापर केला जातो. कोराडीला २४.६९ तर खापरखेडाला २८ दशलक्ष घनमीटर पाणी लागते. या दोन्ही केंद्रांची मागणी ५२ दलघमीची असताना त्यांना ४५ दलघमी पाणी मिळत आहे.वेकोलिचे पाणीवेस्टर्न कोल फिल्ड्सच्या कोळसा खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठे आहेत. १५ दिवसात हे पाणी वापरण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. हे पाणी आपल्या पाईपलाईनमध्ये कसे आणता येईल, तसेच नैसर्गिक स्रोतांमधील पाणी पाण्याच्या टाक्यांमध्ये कसे आणता येईल याचे नियोजन करून ते टाक्यांमध्ये आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरासाठी लघुनळ योजना करा, शहरात ६६० विहिरी आहेत. ५ हजार बोअरवेल्स आहेत. या सर्व जिवंत करा. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत राहून या बोअरवेल जिवंत करण्यास मदत करावी.कळमेश्वर पाणीपुरवठा योजनेवरही या बैठकीत चर्चा झाली. शहरातील दूषित विहिरी आणि बोअरवेलच्या जवळ आर ओ प्लँट लावा. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचे पाणी शुध्द आणि स्वच्छ पिण्यासाठ़ी उपलब्ध होईल. प्रत्येक झोनमध्ये ५-५ आरओ प्लँट लावण्याचे सूचित करण्यात आले. जिल्हा परिषदेने पाच हजार लोकवस्तीच्या गावात आर.ओ. प्लँट लावावे. जोपर्यंत आवश्यक आहे, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले.रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारकमहानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महानिर्मिती व एनएमआरडीएने रेनवॉटर हार्वेस्टिग बंधनकारक करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. सर्व शासकीय इमारती, मनपा क्षेत्रातील घरे, मोठ्या इमारती, जिल्हा परिषदेने सर्व गावांमध्ये लोकांना रेनवॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करावे. सर्व नगर परिषदांनी गावातील इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय इमारतींचे आराखडे मंजूर करू नयेत, असेही सूचित करण्यात आले.

 

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका