शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

मला स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:36 IST

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असताना सुनील माणिकराव शहाणे यांचा २२ वर्षांपूर्वी कामावर असताना अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. दीड वर्षाच्या उपचारात तीन ते चार लाखांचा खर्च झाला. त्यांना पेन्शन नाही, अपघाती रजा, वैद्यकीय खर्च व अपंगत्वाची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आजवर अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या. पायपीट करूनही न्याय मिळत नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा परिस्थितीत मी व माझ्या कुटुंबीयांनी जगायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मला न्याय द्या, नाहीतर स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या अशा आशयाचे पत्र सुनील शहाणे यांनी मुख्यमंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देमाजी कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्रकामावर असताना अपघातात दोन्ही पाय गेलेन्यायासाठी अपंगाची २२ वर्षांपासून भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असताना सुनील माणिकराव शहाणे यांचा २२ वर्षांपूर्वी कामावर असताना अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. दीड वर्षाच्या उपचारात तीन ते चार लाखांचा खर्च झाला. त्यांना पेन्शन नाही, अपघाती रजा, वैद्यकीय खर्च व अपंगत्वाची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आजवर अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या. पायपीट करूनही न्याय मिळत नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा परिस्थितीत मी व माझ्या कुटुंबीयांनी जगायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मला न्याय द्या, नाहीतर स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या अशा आशयाचे पत्र सुनील शहाणे यांनी मुख्यमंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.२९ एप्रिल १९७७ साली शहाणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात रुजू झाले. कामावर असताना १ डिसेंबर १९९६ रोजी अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. दीड वर्ष रुग्णालयात उपचार घेतले. २९ मार्च १९९८ रोजी कामावर रुजू झाले. तत्कालीन मुख्यअभियंता यांना भेटून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह नुकसानभरपाईसाठी वेळोवेळी अर्ज केले. परंतु आश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. ३० जून २०१२ रोजी शहाणे सेवानिवृत्त झाले. परंतु अजूनही अपघाती रजा, उपचाराचा खर्च व नुकसानभरपाई मिळालेली नाही.तत्कालीन मुख्यअभियंत्यापासून विद्यमान महाजनकोचे मुख्यअभियंता, महानिर्मितीचे संचालक, ऊर्जा मंत्री, विभागीय आयुक्त, पालकमंत्री यांच्यासह संबंधितांना वेळोवेळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटू घेऊन न्यायाची मागणी केली. परंतु आजवर आश्वासनाशिवाय दुसरे काही मिळाले नाही, यामुळे मी व माझे कुटुंबीय मानसिक व आर्थिक तणावात जीवन जगत असल्याची व्यथा सुनील शहाणे यांनी मांडली.कार्यालयातून कागदपत्रे गहाळ क शी झाली?सुनील शहाणे यांनी वीज निर्मिती कार्यालयाला नुकसानभरपाई, अपघाती रजा व वैद्यकीय खर्च मिळण्याबाबत अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे सादर केलेली होती. परंतु ही कागदपत्रे कार्यालयातून गहाळ झालेली आहेत. याला जबाबदार असणाºयांना विचारणा करण्याऐवजी शहाणे यांनाच कामाच्या ठिकाणाचा पंचनामा, पोलीस पंचनामा व अपघातासंबंधित कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने कळविले आहे.अपंग व्यक्ती पायपीट कशी करणारसुनील शहाणे यांचे दोन्ही पाय अपंग आहेत. त्यांना चालता येत नाही. कुबडीच्या साह्याने थोडेफार चालतात. असे असतानाही ते मागील २२ वर्षांपासून न्यायासाठी भटकंती करीत आहेत. महानिर्मितीच्या कार्यालयातून गहाळ असलेली कागपत्रे पुन्हा गोळा करण्यासाठी ते पायपीट कशी करणार असा विचारही संबंधित अधिकाºयांच्या डोक्यात येत नाही. कार्यालयाच्या अनागोंदीत शहाणे यांना न्यायापासून राहावे लागत आहे. शासनाने या प्रकरणाची दखल घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस