शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

मला स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:36 IST

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असताना सुनील माणिकराव शहाणे यांचा २२ वर्षांपूर्वी कामावर असताना अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. दीड वर्षाच्या उपचारात तीन ते चार लाखांचा खर्च झाला. त्यांना पेन्शन नाही, अपघाती रजा, वैद्यकीय खर्च व अपंगत्वाची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आजवर अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या. पायपीट करूनही न्याय मिळत नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा परिस्थितीत मी व माझ्या कुटुंबीयांनी जगायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मला न्याय द्या, नाहीतर स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या अशा आशयाचे पत्र सुनील शहाणे यांनी मुख्यमंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देमाजी कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्रकामावर असताना अपघातात दोन्ही पाय गेलेन्यायासाठी अपंगाची २२ वर्षांपासून भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असताना सुनील माणिकराव शहाणे यांचा २२ वर्षांपूर्वी कामावर असताना अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय अपंग झाले. दीड वर्षाच्या उपचारात तीन ते चार लाखांचा खर्च झाला. त्यांना पेन्शन नाही, अपघाती रजा, वैद्यकीय खर्च व अपंगत्वाची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. आजवर अनेकदा अर्ज, विनंत्या केल्या. पायपीट करूनही न्याय मिळत नाही. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. अशा परिस्थितीत मी व माझ्या कुटुंबीयांनी जगायचं कसं असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मला न्याय द्या, नाहीतर स्वेच्छा मृत्यूची परवानगी द्या अशा आशयाचे पत्र सुनील शहाणे यांनी मुख्यमंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे.२९ एप्रिल १९७७ साली शहाणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात रुजू झाले. कामावर असताना १ डिसेंबर १९९६ रोजी अपघात झाला. यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. दीड वर्ष रुग्णालयात उपचार घेतले. २९ मार्च १९९८ रोजी कामावर रुजू झाले. तत्कालीन मुख्यअभियंता यांना भेटून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासह नुकसानभरपाईसाठी वेळोवेळी अर्ज केले. परंतु आश्वासनाशिवाय दुसरे काहीही मिळाले नाही. ३० जून २०१२ रोजी शहाणे सेवानिवृत्त झाले. परंतु अजूनही अपघाती रजा, उपचाराचा खर्च व नुकसानभरपाई मिळालेली नाही.तत्कालीन मुख्यअभियंत्यापासून विद्यमान महाजनकोचे मुख्यअभियंता, महानिर्मितीचे संचालक, ऊर्जा मंत्री, विभागीय आयुक्त, पालकमंत्री यांच्यासह संबंधितांना वेळोवेळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटू घेऊन न्यायाची मागणी केली. परंतु आजवर आश्वासनाशिवाय दुसरे काही मिळाले नाही, यामुळे मी व माझे कुटुंबीय मानसिक व आर्थिक तणावात जीवन जगत असल्याची व्यथा सुनील शहाणे यांनी मांडली.कार्यालयातून कागदपत्रे गहाळ क शी झाली?सुनील शहाणे यांनी वीज निर्मिती कार्यालयाला नुकसानभरपाई, अपघाती रजा व वैद्यकीय खर्च मिळण्याबाबत अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे सादर केलेली होती. परंतु ही कागदपत्रे कार्यालयातून गहाळ झालेली आहेत. याला जबाबदार असणाºयांना विचारणा करण्याऐवजी शहाणे यांनाच कामाच्या ठिकाणाचा पंचनामा, पोलीस पंचनामा व अपघातासंबंधित कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने कळविले आहे.अपंग व्यक्ती पायपीट कशी करणारसुनील शहाणे यांचे दोन्ही पाय अपंग आहेत. त्यांना चालता येत नाही. कुबडीच्या साह्याने थोडेफार चालतात. असे असतानाही ते मागील २२ वर्षांपासून न्यायासाठी भटकंती करीत आहेत. महानिर्मितीच्या कार्यालयातून गहाळ असलेली कागपत्रे पुन्हा गोळा करण्यासाठी ते पायपीट कशी करणार असा विचारही संबंधित अधिकाºयांच्या डोक्यात येत नाही. कार्यालयाच्या अनागोंदीत शहाणे यांना न्यायापासून राहावे लागत आहे. शासनाने या प्रकरणाची दखल घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस