शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

युती, आघाडी तोडण्यामागे शरद पवार -राज ठाकरे

By admin | Updated: October 1, 2014 12:55 IST

अनेक वर्षांपासून एकत्र असणारी युती आणि आघाडी तोडण्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

 ऑनलाइन लोकमत

वणी, दि. १ - अनेक वर्षांपासून एकत्र असणारी युती आणि आघाडी  तोडण्यामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. वणी येथील सभेत ते बोलत होते.

युती तोडल्यास काही वेळातच आघाडीही तोडतो असे शरद पवारांनी भाजपा नेत्यांना फोनवरून  सांगितल्यानेच इतके वर्ष अभेद्य असलेली युती संपुष्टात आली असे राज ठाकरे यांनी सांगितले. आत्ता वेगवेगळे लढणा-या पक्षांचे, सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांशी सेंटिग असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील विरोधी पक्ष नाकाम असून त्यांच्या अपयशामुळेच गेल्या १५ वर्षांपासून आघाडी सरकार सत्तेवर असल्याचेही ते म्हणाले.

मी शेतक-यांचा मुलगा आहे, मला निवडून द्या असे सांगणा-या या नेत्यांना महाराष्ट्रातील शेतक-यांची दु:ख का दिसत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, जनता पाण्याच्या अभावी कष्टी आहे, असे असताना त्यांची मदत करण्याचे सोडून अजित पवारांसारखा नेता त्यांची खिल्ली उडवतो, ही चीड आणणारी बाब असल्याचे सांगत अशा नेत्यांना निवडून देण्याचे काम जनताच करत आहे, असे ते म्हणाले. 

यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावरही टीका केली. सध्या नवरात सुरू आहे, थोड्याच दिवसांनंतर दिवाळी आहे, निवडणूक आयोगाला राज्यात निवडणूक घेण्यासाठी हेच दिवस मिळाले का? असा सवाल त्यांनी केला. हीच परिस्थिती जर पश्चिम बंगालमध्ये असती तर तेथील सर्व पक्षांनी सणासुदीच्या दिवसांत निवडणूक घेण्यास ठाम विरोध केला असता, मात्र आपल्या राजकारण्यांना कसलीही पर्वा नाही, असेही ते म्हणाले.