शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधील उंटांना तेलंगणातील कत्तलखान्याकडे नेले जात असल्याचा आरोप

By नरेश डोंगरे | Updated: January 25, 2024 23:48 IST

५० ते ६० उंटांची विदर्भात एन्ट्री : बचावासाठी सरसावले सेवाभागी नागरिक

नागपूर : वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जाणाऱ्या उंटांना (कॅमल) कत्तल करण्यासाठी तेलंगणाकडे नेले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चार दिवसांपूर्वी उंटांचा हा कळप घेऊन संबंधित मंडळी खानदेशातून विदर्भात आल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे. या संबंधाने पोलीस यंत्रणांनी शोधाशोध चालविली आहे. निसर्गाने राजबिंडे रूप प्रदान केलेल्या उंटांची भारतीय सैन्यात स्वतंत्र तुकडी आहे. विदेशी सिमेवर ही तुकडी लष्करांसोबत देशाच्या रक्षणाचे काम करते, त्यामुळे उंटाला एक वेगळा मान आहे. उंटाला राजस्थानचा राज्य प्राणी (स्टेट एनिमल) म्हणूनही मान्यता आहे.

दरवर्षी उंटांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे त्याला राजस्थानबाहेर नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असून देखिल दरवर्षी थकलेल्या उंटांचा मोठा कळप पद्धतशिरपणे राजस्थानबाहेर काढून काही उंटांना रस्त्यात विकले जाते तर काही उंट कत्तलीसाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये नेले जातात. उंटांच्या देखभालीचे काम करणारी महावीर कॅमल सेंचुरी नामक एक संस्था असून या संस्थेचे सचिव सुरेंद्र भंडारी यांनी आज रात्री लोकमला दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी राजस्थानमधून मोठ्या प्रमाणावर उंटांचा कळप काही जणांनी कत्तलीला तेलंगणात नेण्यासाठी पद्धतशिर बाहेर काढला. त्यातील काही उंटांना रस्त्यात विकण्यात आले तर ५० ते ६० उंटांचा कळप चार दिवसांपूर्वी विदर्भात पोहचला. बडनेरा, चांदूर मार्गे तो बुधवारी रात्री वर्धा जिल्ह्यात दाखल झाला.

संबंधितांच्या माहितीनुसार, आज दुपारी पुलगाव जवळच्या रसुलाबाद येथे अनेकांनी हा उंटांचा कळप बघितला. त्यानंतर सायंकाळी हा कळप जंगल मार्गाने वर्धा नजिकच्या भूगांव येथे पोहचला. रात्री तो आष्टा - अल्लीपूरकडे निघाला होता. ही माहिती कळताच सेंचूरीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याकडे गुरुवारी धाव घेतली. या उंटांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांनी अमरावती जिल्हा पोलीस यंत्रणेशीही संपर्क केला आहे.

पोलिसांकडून शोधाशोध

लोकमतला या प्रकराची कुणकुण लागताच प्रस्तूत प्रतिनिधीने अमरावती आणि वर्धा पोलीस यंत्रणेशी या संबंधाने संपर्क साधला. अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी दोन दिवसांपूर्वी चांदूरजवळ उंटांचा कळप दिसला होता. त्याची आम्ही संबंधितांकडून माहिती घेतल्यानंतर चाैकशी केल्याचे सांगितले. तर, वर्धा येथील पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी या संबंधाने पोलिसांची दोन पथके शोधाशोध करीत असल्याची माहिती दिली.

कोणत्याही परिस्थिती त्यांचा जीव वाचावाभंडारी आणि सहकाऱ्यांची सेवाभावी संस्था असून राजस्थानमध्ये ती उंटांच्या संवंर्धनासाठी काम करते. गाैशाळेच्या धर्तिवर त्यांची तेथे उंटशाळाही आहे. गेल्या वर्षी नाशिकमध्ये अशाच प्रकारे त्यांनी राजस्थानमधून बाहेर नेला जात असलेला उंटांचा मोठा कळप पोलिसांच्या मदतीने पकडला होता. याही वेळेसाठी त्यांचे सहकारी वर्धेकडे धावले आहेत. कोणत्याही स्थितीत या उंटांचा जीव वाचवावा, अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेशी संपर्क चालविला आहे.