शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सोमवारपासून सर्व दुकाने ४ वाजेपर्यंतच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 22:22 IST

Corona Virus, again restriction २१ जून पासून निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणावर मिळालेली सूट कायम राहू शकली नाही. नागपुरात सोमवारी २८ जूनपासून नवीन नियम लागू केले जातील. याअंतर्गत आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत नव्हे तर दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.

ठळक मुद्दे२१ जूनपासून मिळालेली सूट समाप्त होणार : निर्बंध वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २१ जून पासून निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणावर मिळालेली सूट कायम राहू शकली नाही. नागपुरात सोमवारी २८ जूनपासून नवीन नियम लागू केले जातील. याअंतर्गत आता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत नव्हे तर दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.

राज्य सरकारने ‘कोविड डेल्टा प्लस वेरियंट’ प्रकरणे आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता पूर्ण राज्यालाच लेव्हल ३मध्ये टाकले आहे. याचा परिणाम नागपुरात विशेषत्वाने दिसून येईल. कोरोना संक्रमण कमी होत असल्याने आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढल्याने नागपुरात लेव्हल १ चे नियम लागू करण्यात आले होते. बाजारही रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहू लागले. बाजार आणि मॉलमधील उत्साह पुन्हा वाढला होता. परंतु ही सूट केवळ एक आठवडाही कायम राहू शकली नाही. राज्य सरकारने राज्यभरात लेव्हल ३ लागू करण्याची घोषणा केली. राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक बोलावून राज्य सरकारच्या नवीन निर्णयावर चर्चा झाली. यावेळी सरकारने नवे आदेश नागपुरात सोमवारपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लागू होणार नवीन नियम : पालकमंत्री

पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, नवीन नियम सोमवारपासून लागू करण्यात येतील. यासंदर्भात शनिवार किंवा रविवारी उच्च स्तरीय बैठक होईल. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन इतरही निर्णय घेतले जातील. जिल्हा प्रशासन राज्य सरकारचे नियम काटेकोरपणे लागू करण्यास कटिबद्ध आहे.

नियमांचे काटेकोरपणे पालन होणार : मनपा

मनपााचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, सरकारच्या दिशा-निर्देशांचे पालन केले जाईल. शनिवारी यासंदर्भात चर्चा करून नवीन रणनिती ठरविली जाईल.

सोमवारपासून नवीन नियम : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या नवीन दिशा-निर्देशानुसार नागपुरात सोमवारपासून नवे निर्बंध लागू केले जातील. सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच उघडी ठेवता येतील. राज्य सरकारचे नवे निर्देश आल्यानंतर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात स्थानिक स्तरावरही आदेश जारी केले जातील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार