शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:30 IST

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन घटते, गढूळपणा वाढताेएक वाढली की पूर्ण तलावात फाेफावते

नागपूर : सध्याच्या ग्लाेबल वाॅर्मिंगच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी झाडांसारखे महत्त्वाचे काहीच नाही. मात्र काही वनस्पती पर्यावरणासाठी हानिकारकही असतात. शेतातील तण पिकांना नुकसानकारकच असतात. तशीच एक तण गटातील वनस्पती आहे, जी नागपूर शहरातील तलावांना खराब करीत आहे. ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

अंबाझरी तलावाचे परितंत्र सध्या जलपर्णी वनस्पतीने धाेक्यात आणले आहे. अंबाझरी हा शहरातील पाेहणाऱ्यांना पाेहण्याचा नैसर्गिक अनुभव देणारा तलाव आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या तलावावर पाेहणाऱ्यांची गर्दी असते. एक दिवस पाेहणाऱ्यांना काही जलपर्णी तलावात दिसल्या. त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संपूर्ण परिसर या वनस्पतीने व्यापला हाेता. लाेकांनी हे तण काढण्याचा प्रयत्न केला; पण ती आणखी फाेफावत जात आहे. त्यामुळे पाेहणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागताे आहे.

- या वनस्पतीने ऐतिहासिक फुटाळा तलावाची एक बाजू अशीच प्रदूषित केली आहे.

- लाेकांच्या घरातील सांडपाणी व वाढलेल्या या वनस्पतीमुळे नाईक तलाव पूर्ण प्रदूषित हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.

- शिवाय जलपर्णी फाेफावल्यामुळे सक्करदरा तलावाचीही विदारक अवस्था झाली आहे.

- त्यामुळे या वनस्पतीने तलावांची जैवविविधता प्रदूषित केली आहे.

 

का हानिकारक आहे ईकाॅर्निया ?

- ईकाॅर्निया ही तण गटातील वनस्पती आहे. शुद्ध पाण्यातून मिळणाऱ्या पाेषक द्रव्यामुळे या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- एक राेपटे जरी तलावात वाढले तर अल्पावधीत संपूर्ण तलाव व्यापून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे, इतक्या वेगाने तिची वाढ हाेते. ही वनस्पती काेणत्याच प्राण्याचे खाद्य नाही, म्हणून तिचा उपयाेग शून्य आहे.

- या वनस्पतीची पाने थाेडी पसरट व स्पाँजी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाला पाण्यात जाण्यापासून राेखतात.

- त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींची वाढ हाेत नाही. त्या मरतात व नष्टही हाेतात.

- ईकाॅर्नियामुळे तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नाही.

- काही दिवसांनी पाने सडतात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे तलावाचे पाणी वेगाने गढूळ हाेते व पीएच स्तरही वाढताे.

 

पाण्यातील ऑक्सिजन घटवून गढूळपणा वाढविणारी ही वनस्पती आहे. ईकाॅर्निया काेणत्याच प्राण्यासाठी उपयाेगाची नसून तलावांची जैवविविधता प्रदूषित करणारी आहे. सक्करदरा, नाईक तलाव, काेराडी तलाव या वनस्पतीने खराब केला आहे. त्यामुळे तलावातून पूर्णपणे काढून नष्ट करणे, हा एकमेव उपाय आहे.

- डाॅ. उगेमुगे, वनस्पती तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण