शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:30 IST

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन घटते, गढूळपणा वाढताेएक वाढली की पूर्ण तलावात फाेफावते

नागपूर : सध्याच्या ग्लाेबल वाॅर्मिंगच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी झाडांसारखे महत्त्वाचे काहीच नाही. मात्र काही वनस्पती पर्यावरणासाठी हानिकारकही असतात. शेतातील तण पिकांना नुकसानकारकच असतात. तशीच एक तण गटातील वनस्पती आहे, जी नागपूर शहरातील तलावांना खराब करीत आहे. ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

अंबाझरी तलावाचे परितंत्र सध्या जलपर्णी वनस्पतीने धाेक्यात आणले आहे. अंबाझरी हा शहरातील पाेहणाऱ्यांना पाेहण्याचा नैसर्गिक अनुभव देणारा तलाव आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या तलावावर पाेहणाऱ्यांची गर्दी असते. एक दिवस पाेहणाऱ्यांना काही जलपर्णी तलावात दिसल्या. त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संपूर्ण परिसर या वनस्पतीने व्यापला हाेता. लाेकांनी हे तण काढण्याचा प्रयत्न केला; पण ती आणखी फाेफावत जात आहे. त्यामुळे पाेहणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागताे आहे.

- या वनस्पतीने ऐतिहासिक फुटाळा तलावाची एक बाजू अशीच प्रदूषित केली आहे.

- लाेकांच्या घरातील सांडपाणी व वाढलेल्या या वनस्पतीमुळे नाईक तलाव पूर्ण प्रदूषित हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.

- शिवाय जलपर्णी फाेफावल्यामुळे सक्करदरा तलावाचीही विदारक अवस्था झाली आहे.

- त्यामुळे या वनस्पतीने तलावांची जैवविविधता प्रदूषित केली आहे.

 

का हानिकारक आहे ईकाॅर्निया ?

- ईकाॅर्निया ही तण गटातील वनस्पती आहे. शुद्ध पाण्यातून मिळणाऱ्या पाेषक द्रव्यामुळे या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- एक राेपटे जरी तलावात वाढले तर अल्पावधीत संपूर्ण तलाव व्यापून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे, इतक्या वेगाने तिची वाढ हाेते. ही वनस्पती काेणत्याच प्राण्याचे खाद्य नाही, म्हणून तिचा उपयाेग शून्य आहे.

- या वनस्पतीची पाने थाेडी पसरट व स्पाँजी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाला पाण्यात जाण्यापासून राेखतात.

- त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींची वाढ हाेत नाही. त्या मरतात व नष्टही हाेतात.

- ईकाॅर्नियामुळे तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नाही.

- काही दिवसांनी पाने सडतात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे तलावाचे पाणी वेगाने गढूळ हाेते व पीएच स्तरही वाढताे.

 

पाण्यातील ऑक्सिजन घटवून गढूळपणा वाढविणारी ही वनस्पती आहे. ईकाॅर्निया काेणत्याच प्राण्यासाठी उपयाेगाची नसून तलावांची जैवविविधता प्रदूषित करणारी आहे. सक्करदरा, नाईक तलाव, काेराडी तलाव या वनस्पतीने खराब केला आहे. त्यामुळे तलावातून पूर्णपणे काढून नष्ट करणे, हा एकमेव उपाय आहे.

- डाॅ. उगेमुगे, वनस्पती तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण