शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:30 IST

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन घटते, गढूळपणा वाढताेएक वाढली की पूर्ण तलावात फाेफावते

नागपूर : सध्याच्या ग्लाेबल वाॅर्मिंगच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी झाडांसारखे महत्त्वाचे काहीच नाही. मात्र काही वनस्पती पर्यावरणासाठी हानिकारकही असतात. शेतातील तण पिकांना नुकसानकारकच असतात. तशीच एक तण गटातील वनस्पती आहे, जी नागपूर शहरातील तलावांना खराब करीत आहे. ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

अंबाझरी तलावाचे परितंत्र सध्या जलपर्णी वनस्पतीने धाेक्यात आणले आहे. अंबाझरी हा शहरातील पाेहणाऱ्यांना पाेहण्याचा नैसर्गिक अनुभव देणारा तलाव आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या तलावावर पाेहणाऱ्यांची गर्दी असते. एक दिवस पाेहणाऱ्यांना काही जलपर्णी तलावात दिसल्या. त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संपूर्ण परिसर या वनस्पतीने व्यापला हाेता. लाेकांनी हे तण काढण्याचा प्रयत्न केला; पण ती आणखी फाेफावत जात आहे. त्यामुळे पाेहणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागताे आहे.

- या वनस्पतीने ऐतिहासिक फुटाळा तलावाची एक बाजू अशीच प्रदूषित केली आहे.

- लाेकांच्या घरातील सांडपाणी व वाढलेल्या या वनस्पतीमुळे नाईक तलाव पूर्ण प्रदूषित हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.

- शिवाय जलपर्णी फाेफावल्यामुळे सक्करदरा तलावाचीही विदारक अवस्था झाली आहे.

- त्यामुळे या वनस्पतीने तलावांची जैवविविधता प्रदूषित केली आहे.

 

का हानिकारक आहे ईकाॅर्निया ?

- ईकाॅर्निया ही तण गटातील वनस्पती आहे. शुद्ध पाण्यातून मिळणाऱ्या पाेषक द्रव्यामुळे या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- एक राेपटे जरी तलावात वाढले तर अल्पावधीत संपूर्ण तलाव व्यापून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे, इतक्या वेगाने तिची वाढ हाेते. ही वनस्पती काेणत्याच प्राण्याचे खाद्य नाही, म्हणून तिचा उपयाेग शून्य आहे.

- या वनस्पतीची पाने थाेडी पसरट व स्पाँजी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाला पाण्यात जाण्यापासून राेखतात.

- त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींची वाढ हाेत नाही. त्या मरतात व नष्टही हाेतात.

- ईकाॅर्नियामुळे तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नाही.

- काही दिवसांनी पाने सडतात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे तलावाचे पाणी वेगाने गढूळ हाेते व पीएच स्तरही वाढताे.

 

पाण्यातील ऑक्सिजन घटवून गढूळपणा वाढविणारी ही वनस्पती आहे. ईकाॅर्निया काेणत्याच प्राण्यासाठी उपयाेगाची नसून तलावांची जैवविविधता प्रदूषित करणारी आहे. सक्करदरा, नाईक तलाव, काेराडी तलाव या वनस्पतीने खराब केला आहे. त्यामुळे तलावातून पूर्णपणे काढून नष्ट करणे, हा एकमेव उपाय आहे.

- डाॅ. उगेमुगे, वनस्पती तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण