शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
3
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
4
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
5
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
6
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
8
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
9
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
10
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
11
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
12
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
13
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
14
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
15
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
16
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
17
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
18
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
19
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
20
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
Daily Top 2Weekly Top 5

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2023 20:30 IST

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

ठळक मुद्देऑक्सिजन घटते, गढूळपणा वाढताेएक वाढली की पूर्ण तलावात फाेफावते

नागपूर : सध्याच्या ग्लाेबल वाॅर्मिंगच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी झाडांसारखे महत्त्वाचे काहीच नाही. मात्र काही वनस्पती पर्यावरणासाठी हानिकारकही असतात. शेतातील तण पिकांना नुकसानकारकच असतात. तशीच एक तण गटातील वनस्पती आहे, जी नागपूर शहरातील तलावांना खराब करीत आहे. ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

अंबाझरी तलावाचे परितंत्र सध्या जलपर्णी वनस्पतीने धाेक्यात आणले आहे. अंबाझरी हा शहरातील पाेहणाऱ्यांना पाेहण्याचा नैसर्गिक अनुभव देणारा तलाव आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या तलावावर पाेहणाऱ्यांची गर्दी असते. एक दिवस पाेहणाऱ्यांना काही जलपर्णी तलावात दिसल्या. त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संपूर्ण परिसर या वनस्पतीने व्यापला हाेता. लाेकांनी हे तण काढण्याचा प्रयत्न केला; पण ती आणखी फाेफावत जात आहे. त्यामुळे पाेहणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागताे आहे.

- या वनस्पतीने ऐतिहासिक फुटाळा तलावाची एक बाजू अशीच प्रदूषित केली आहे.

- लाेकांच्या घरातील सांडपाणी व वाढलेल्या या वनस्पतीमुळे नाईक तलाव पूर्ण प्रदूषित हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.

- शिवाय जलपर्णी फाेफावल्यामुळे सक्करदरा तलावाचीही विदारक अवस्था झाली आहे.

- त्यामुळे या वनस्पतीने तलावांची जैवविविधता प्रदूषित केली आहे.

 

का हानिकारक आहे ईकाॅर्निया ?

- ईकाॅर्निया ही तण गटातील वनस्पती आहे. शुद्ध पाण्यातून मिळणाऱ्या पाेषक द्रव्यामुळे या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- एक राेपटे जरी तलावात वाढले तर अल्पावधीत संपूर्ण तलाव व्यापून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे, इतक्या वेगाने तिची वाढ हाेते. ही वनस्पती काेणत्याच प्राण्याचे खाद्य नाही, म्हणून तिचा उपयाेग शून्य आहे.

- या वनस्पतीची पाने थाेडी पसरट व स्पाँजी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाला पाण्यात जाण्यापासून राेखतात.

- त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींची वाढ हाेत नाही. त्या मरतात व नष्टही हाेतात.

- ईकाॅर्नियामुळे तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नाही.

- काही दिवसांनी पाने सडतात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे तलावाचे पाणी वेगाने गढूळ हाेते व पीएच स्तरही वाढताे.

 

पाण्यातील ऑक्सिजन घटवून गढूळपणा वाढविणारी ही वनस्पती आहे. ईकाॅर्निया काेणत्याच प्राण्यासाठी उपयाेगाची नसून तलावांची जैवविविधता प्रदूषित करणारी आहे. सक्करदरा, नाईक तलाव, काेराडी तलाव या वनस्पतीने खराब केला आहे. त्यामुळे तलावातून पूर्णपणे काढून नष्ट करणे, हा एकमेव उपाय आहे.

- डाॅ. उगेमुगे, वनस्पती तज्ज्ञ

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण