शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रुपेश काळे खून प्रकरणात पाचही आरोपींना जन्मठेपच, उच्च न्यायालयाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 29, 2023 15:42 IST

आरोपींचे अपील फेटाळून लावले

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने जरीपटका येथील बहुचर्चित रुपेश ऊर्फ पप्पू काळे खून प्रकरणातील पाचही आरोपींची जन्मठेपेसह इतर शिक्षा कायम ठेवली आणि आरोपींचे या शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळून लावले. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वृषाली जोशी यांनी निर्णय दिला.

आरोपींमध्ये आकाश ऊर्फ बिट्टू जयकुमार सरोजकर (२५), कुणाल भारत गोस्वामी (२८), कामेश रवींद्र जांभुळकर (३८), शेखर प्रकाश आंबुलकर (३०) व संदेश ऊर्फ गोलू वेणू नाईक (३१) यांचा समावेश आहे. सरोजकर, गोस्वामी व आंबुलकर इंदिरानगर झोपडपट्टी, जांभुळकर कौशल्यानगर तर, नाईक हुडको कॉलनी येथील रहिवासी आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी सत्र न्यायालयाने सातपैकी या पाच आरोपींना जन्मठेप व इतर विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यावर आरोपींचा आक्षेप होता.

अशी घडली घटना

१४ जानेवारी २०१४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींनी काळेला घेरले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर फेकून चाकू व तलवारीने हल्ला केला. दरम्यान, काळेने आरोपींच्या तावडीतून कशीतरी सुटका करून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी पाठलाग करून त्याला ठार मारले. काळेच्या शरीरावर २७ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या.

काळेच्या आईचे अपीलही नामंजूर

सत्र न्यायालयाने राजेश ॲंथोनी हरीतस्वामी (३९, रा. संत मार्टीननगर) व शैलेश विजय मुखर्जी (३५, रा. कौशल्यानगर) या आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडल्यामुळे काळेची आई ज्योती यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपीलही नामंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर