शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’त जावे : कुलगुरु काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ दोन महाविद्यालये ही ‘बाटू’शी (बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) संलग्नित आहेत. मात्र विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी ‘बाटू’मध्ये जावे व तीच काळाची गरज आहे, असे वक्तव्य नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे विद्यापीठ महसूलवाढीसाठी चालत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ दोन महाविद्यालये ही ‘बाटू’शी (बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) संलग्नित आहेत. मात्र विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांनी ‘बाटू’मध्ये जावे व तीच काळाची गरज आहे, असे वक्तव्य नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले आहे.अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी राज्य शासनाने ‘बाटू’ची निर्मिती केली होती. मात्र राज्यातील फारच कमी महाविद्यालये त्या विद्यापीठाशी संलग्नित झाली. प्रत्यक्षात महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठात राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये समाविष्ट झाली. त्याप्रमाणे ‘बाटू’लादेखील प्रतिसाद मिळायला हवा होता. नागपूर विद्यापीठातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी तेथे जायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जर महाविद्यालये तेथे संलग्नित होत नसतील तर मुळात ‘बाटू’ची निर्मितीच का झाली, असा प्रश्न डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी उपस्थित केला. ‘बाटू’मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांनी समाविष्ट होणे अनिवार्य केले पाहिजे. यामुळे नागपूरसारख्या मोठ्या विद्यापीठांवरील भार कमी होईल. काही प्रमाणात महसूल नक्कीच कमी होईल. मात्र विद्यापीठे ही महसूलवाढीसाठी कार्य करत नाहीत, असेदेखील ते म्हणाले.महाविद्यालयांना विद्यापीठाचे ‘ब्रॅन्डनेम’ महत्त्वाचेपर्याय उपलब्ध असतानादेखील अभियांत्रिकी महाविद्यालये ‘बाटू’कडे वळली नाहीत. याची कारणे शोधण्याची गरज आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाचे ‘ब्रॅन्डनेम’ जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच ते ‘बाटू’कडे जाणार नाहीत. ‘बाटू’लादेखील हा पसारा कितपत पेलता येईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.विद्यापीठांचे ओझे कमी होईलमोठ्या विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कामाचा ताण जास्त असतो. तेथील विद्यार्थीसंख्यादेखील जास्त असते. अशा स्थितीत जर ही महाविद्यालये ‘बाटू’मध्ये गेली तर विद्यापीठांचे ओेझे कमी होईल. विद्यापीठांमध्ये पारंपरिकशिवाय कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांवर जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल, असे डॉ.काणे यांनी सांगितले.राजकारण व व्यापाराने शिक्षणक्षेत्र नासवलेशिक्षणक्षेत्रात गेल्या काही काळापासून राजकारण व व्यापारी मनोवृत्तीचा प्रभाव जास्त जाणवत आहे. या दोन्ही गोष्टींनी शिक्षणक्षेत्र अक्षरश: नासवले आहे. या गोष्टी दूर केल्या तरच शिक्षणक्षेत्राचा सर्वार्थाने व विद्यार्थीहिताच्या दिशेने विकास होऊ शकेल, असा दावा डॉ.काणे यांनी केला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर