शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:39 IST

सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.

ठळक मुद्देमार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंदच : पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची अडतियांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मोरोणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. अडतियांची मागणी आणि बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणारे ८२ अडतिये आहेत. उर्वरित अडतिये कळमन्यात स्थलांतरित झाले आहेत. मनपाने व्यवसायासाठी यादी तयार केली तेव्हा कळमन्यातील अडतिये आणि कॉटन मार्केटलगतचे आलू-कांद्याच्या चिल्लर व्यापाऱ्यांना समाविष्ट केले. मनपाने २४० जणांची यादी केली आणि ४० जणांना एका दिवशी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारी व्यवसाय करणाऱ्याचा नंबर दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी लागणार होता. पूर्वीच बाजार ५० दिवस बंद राहिल्याने अडतिया आणि व्यापाऱ्यां ना आर्थिक फटका बसला आहे. मनपाच्या या नियमामुळे येथील व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याचा निषेध म्हणून मार्केट बंद केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.भाज्याच्या गाड्या आत नेण्यास मनाईमार्केटच्या आत भाज्याच्या गाड्या नेण्याचे सर्व मार्ग बुधवारी टिनांनी बंद केले आहेत. त्यामुळे बाजाराबाहेर गाड्या उभ्या करून भाज्यांचे प्रत्येक पोते आत नेणे शक्य नाही. अडतिया, व्यापाऱ्यां नी व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी भाज्यांची विक्री करू नये, असे धोरण मनपाने अवलंबविले आहे. या पद्धतीने व्यवसाय होणार नाही. गर्दी होऊ नये, याकरिता असोसिएशन सज्ज आहे. त्याच प्रमाणात मनपाच्या कर्मचाऱ्यां नाही दक्ष राहावे. शहरात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मनपाचे हेच धोरण राहिले तर शेतकरी नागपुरात भाज्या आणणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापत्या उन्हाळ्यात जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होणार आहे. पूर्वीप्रमाणे मार्केट सुरू ठेवण्यास शहराला भाज्यांचा सुरळीत पुरवठा होईल आणि याकरिता मनपा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे महाजन यांनी सांगितले.