शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:39 IST

सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.

ठळक मुद्देमार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंदच : पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची अडतियांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मोरोणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. अडतियांची मागणी आणि बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणारे ८२ अडतिये आहेत. उर्वरित अडतिये कळमन्यात स्थलांतरित झाले आहेत. मनपाने व्यवसायासाठी यादी तयार केली तेव्हा कळमन्यातील अडतिये आणि कॉटन मार्केटलगतचे आलू-कांद्याच्या चिल्लर व्यापाऱ्यांना समाविष्ट केले. मनपाने २४० जणांची यादी केली आणि ४० जणांना एका दिवशी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारी व्यवसाय करणाऱ्याचा नंबर दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी लागणार होता. पूर्वीच बाजार ५० दिवस बंद राहिल्याने अडतिया आणि व्यापाऱ्यां ना आर्थिक फटका बसला आहे. मनपाच्या या नियमामुळे येथील व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याचा निषेध म्हणून मार्केट बंद केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.भाज्याच्या गाड्या आत नेण्यास मनाईमार्केटच्या आत भाज्याच्या गाड्या नेण्याचे सर्व मार्ग बुधवारी टिनांनी बंद केले आहेत. त्यामुळे बाजाराबाहेर गाड्या उभ्या करून भाज्यांचे प्रत्येक पोते आत नेणे शक्य नाही. अडतिया, व्यापाऱ्यां नी व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी भाज्यांची विक्री करू नये, असे धोरण मनपाने अवलंबविले आहे. या पद्धतीने व्यवसाय होणार नाही. गर्दी होऊ नये, याकरिता असोसिएशन सज्ज आहे. त्याच प्रमाणात मनपाच्या कर्मचाऱ्यां नाही दक्ष राहावे. शहरात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मनपाचे हेच धोरण राहिले तर शेतकरी नागपुरात भाज्या आणणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापत्या उन्हाळ्यात जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होणार आहे. पूर्वीप्रमाणे मार्केट सुरू ठेवण्यास शहराला भाज्यांचा सुरळीत पुरवठा होईल आणि याकरिता मनपा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे महाजन यांनी सांगितले.