शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:39 IST

सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.

ठळक मुद्देमार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंदच : पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची अडतियांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मोरोणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. अडतियांची मागणी आणि बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणारे ८२ अडतिये आहेत. उर्वरित अडतिये कळमन्यात स्थलांतरित झाले आहेत. मनपाने व्यवसायासाठी यादी तयार केली तेव्हा कळमन्यातील अडतिये आणि कॉटन मार्केटलगतचे आलू-कांद्याच्या चिल्लर व्यापाऱ्यांना समाविष्ट केले. मनपाने २४० जणांची यादी केली आणि ४० जणांना एका दिवशी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारी व्यवसाय करणाऱ्याचा नंबर दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी लागणार होता. पूर्वीच बाजार ५० दिवस बंद राहिल्याने अडतिया आणि व्यापाऱ्यां ना आर्थिक फटका बसला आहे. मनपाच्या या नियमामुळे येथील व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याचा निषेध म्हणून मार्केट बंद केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.भाज्याच्या गाड्या आत नेण्यास मनाईमार्केटच्या आत भाज्याच्या गाड्या नेण्याचे सर्व मार्ग बुधवारी टिनांनी बंद केले आहेत. त्यामुळे बाजाराबाहेर गाड्या उभ्या करून भाज्यांचे प्रत्येक पोते आत नेणे शक्य नाही. अडतिया, व्यापाऱ्यां नी व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी भाज्यांची विक्री करू नये, असे धोरण मनपाने अवलंबविले आहे. या पद्धतीने व्यवसाय होणार नाही. गर्दी होऊ नये, याकरिता असोसिएशन सज्ज आहे. त्याच प्रमाणात मनपाच्या कर्मचाऱ्यां नाही दक्ष राहावे. शहरात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मनपाचे हेच धोरण राहिले तर शेतकरी नागपुरात भाज्या आणणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापत्या उन्हाळ्यात जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होणार आहे. पूर्वीप्रमाणे मार्केट सुरू ठेवण्यास शहराला भाज्यांचा सुरळीत पुरवठा होईल आणि याकरिता मनपा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे महाजन यांनी सांगितले.