शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कमी पटसंख्येच्या शाळेसाठी धोक्याची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 12:30 IST

राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे शैक्षणिक सत्र ढवळून निघत आहे. शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

ठळक मुद्देराज्यात १० पेक्षा कमी पट असलेल्या ४६९० शाळा

मंगेश व्यवहारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे शैक्षणिक सत्र ढवळून निघत आहे. शाळा कधी सुरू होणार यासंदर्भात कुठलेही स्पष्ट निर्देश नाहीत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने राज्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या ४६९० शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, शिक्षण क्षेत्रावर खर्च होणारे बजेट लक्षात घेता कमी पटसंख्येच्या शाळांसाठी ही धोक्याची घंटा आहे.मिळालेल्या माहितीनुसार कमी पटसंख्येच्या नावावर राज्यातील तब्बल ४६९० शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडून तयार करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्य शासनाच्या बजेटमधून शिक्षणावर ४६ हजार कोटी रुपये खर्च होतात. यातील शिक्षकांच्या वेतनावर मोठा निधी खर्च होतो. त्यामुळे शासन १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा गुंडाळण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे. पण दुसरी एक बाजू म्हणजे यातील बहुतेक शाळा या दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. ज्यामध्ये शिकणारे विद्यार्थी हे गोरगरीब पालकांची मुले आहेत. तेथील विद्यार्थ्यांकरिता जवळपासच्या परिसरात शिक्षणाची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. अशा गावात आजही ना पक्के रस्ते आहेत ना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांची उपलब्धता आहे. बालकांच्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार इयत्ता १ ते ५ मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक बालकाला १ कि.मी. अंतराच्या आत आणि इयत्ता ६ ते ८ मध्ये शिकणाºया बालकांना ३ कि.मी.च्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असून प्रत्येक बालकाचा तो मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांना गाव व गावाच्या परिसरातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे सरकारला बंधनकारक ठरते. त्यामुळे शासनाचे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर लोटण्याचे आहे, अशी भीती शिक्षक संघटना व्यक्त करीत आहे.- या सर्व शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागातील असून तेथे शिकणारे विद्यार्थी हे गोरगरीब कुटुंबातील आहे. परिसरातील शाळा मोडित निघाली तर दुसरीकडे शिकायला जाणे ही बाब या मुलांना भौगोलिक, भौतिक, सामाजिक व आर्थिक कोणत्याच दृष्टीने सोयीची नाही. अशावेळी या शाळा बंद करणे म्हणजे मुलांचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेणे आहे.- लीलाधर ठाकरे,जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत काहीही निर्णय नाहीकमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का? यासंदर्भात शिक्षण विभागात विचारणा केली असता, यासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. शासनाने जिल्ह्यातील १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागितली होती ती आम्ही दिली आहे. समायोजनासंदर्भात कुठलाही निर्णय नाही.

- विविध जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळानागपूर जिल्ह्यातील १२८, अहमदनगर- ९२, अकोला- ५५, अमरावती - १२१, औरंगाबाद - ६२, भंडारा- २९, बीड - १०२, बुलडाणा -२४, चंद्रपूर -१३३, धुळे -१२, गडचिरोली -३८४, गोंदिया - ६३, हिंगोली -३०, जळगाव - २१, जालना -२६, कोल्हापूर - १४१, लातूर -५४, नांदेड -१३३, नंदूरबार -३३, नाशिक - ९४, उस्मानाबाद -२७, परभणी -२८, पालघर -६०, पुणे -३७८, रायगड -५७३, रत्नागिरी -७००, सांगली -७७, सातारा -३७०, सिंधुदुर्ग -४४१, सोलापूर -४४, ठाणे - ७२, वर्धा -७३, वाशिम -२८, यवतमाळ -७९

 

टॅग्स :Schoolशाळा