शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात उत्साह : दागिन्यांची विक्रमी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:02 IST

हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही खरेदीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा अधिक उत्साह दिसून येत आहे. या दिवशी शक्यतो एक ग्रॅम तरी सोने खरेदी करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सकाळपासून लोकांची गर्दी होती व ही रेलचेल दिवसभर सुरू होती. ग्राहकांनी यावेळी चांगली खरेदी केली. शिवाय लग्नसराई सुरू असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला लोकांची पसंती अधिक असते. या लग्नसराईचा उत्साह बाजारात होता. शहरात तीन हजाराहून अधिक सराफा दुकाने आहेत. लग्नसराईनिमित्त नव्या आणि आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांचे कलेक्शन सराफा व्यावसायिकांनी आणले होते. या नव्या डिझाईनच्या दागिने खरेदीवर ग्राहकांचा कल अधिक होता व व्यापाऱ्यांना अक्षयतृतीया मुहूर्ताचा चांगला लाभ मिळाला. निश्चित आकडा सांगता येत नसला तरी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीसाठीही लोकांचा कल अधिक होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व वाहनांच्या शोरू ममध्येही दिवसभर ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून आली. येथे आधीच बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलीव्हरी करण्यात आली. नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली. याशिवाय इतवारीतील भांडेओळ आणि सीताबर्डीच्या मोबाईल मार्केटमध्येही लोकांची रेलचेल दिसून आली. व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी या दिवशी नवीन भूखंड व घरे खरेदीला प्राधान्य दिले. ज्यांना शक्य आहे अशांचा रोख फ्लॅट किंवा भूखंड खरेदीच्या व्यवहाराकडे होता.त्यासाठी बिल्डर्स व प्लॉट व्यावसायिकांनी यानिमित्त आकर्षक ऑफर्स देऊ केल्या होत्या. गारमेंट्स खरेदीवरही लोकांचा भर होता. लग्नसमारंभांचा उत्साह पाहता लग्नाची शेरवानी, वधूचा लेहंगा, सुट आदींची जोरदार विक्री झाली. एकूणच विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी अक्षयतृतीयेचा दिवस उत्साह वाढविणारा ठरला.

  क्रेडिट कार्ड, एटीएम व चेकने खरेदी दरम्यान गेल्या काही महिन्यात कॅशलेस व्यवहार करण्याकडे ग्राहकांचे प्राधान्य वाढले आहे. शिवाय एटीएममध्ये वेळेवर कॅश मिळत नसल्यानेही ग्राहकांना अडचण होत होती. त्यामुळे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा चेकद्वारे दागिने व वाहनांचे पैसे चुकते करण्यावर ग्राहकांचा अधिक भर दिसून आला. कुठल्याही व्यवहाराने असो, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस चांदी करणाराच होता.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाbusinessव्यवसाय