शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात उत्साह : दागिन्यांची विक्रमी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:02 IST

हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही खरेदीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा अधिक उत्साह दिसून येत आहे. या दिवशी शक्यतो एक ग्रॅम तरी सोने खरेदी करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सकाळपासून लोकांची गर्दी होती व ही रेलचेल दिवसभर सुरू होती. ग्राहकांनी यावेळी चांगली खरेदी केली. शिवाय लग्नसराई सुरू असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला लोकांची पसंती अधिक असते. या लग्नसराईचा उत्साह बाजारात होता. शहरात तीन हजाराहून अधिक सराफा दुकाने आहेत. लग्नसराईनिमित्त नव्या आणि आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांचे कलेक्शन सराफा व्यावसायिकांनी आणले होते. या नव्या डिझाईनच्या दागिने खरेदीवर ग्राहकांचा कल अधिक होता व व्यापाऱ्यांना अक्षयतृतीया मुहूर्ताचा चांगला लाभ मिळाला. निश्चित आकडा सांगता येत नसला तरी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीसाठीही लोकांचा कल अधिक होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व वाहनांच्या शोरू ममध्येही दिवसभर ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून आली. येथे आधीच बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलीव्हरी करण्यात आली. नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली. याशिवाय इतवारीतील भांडेओळ आणि सीताबर्डीच्या मोबाईल मार्केटमध्येही लोकांची रेलचेल दिसून आली. व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी या दिवशी नवीन भूखंड व घरे खरेदीला प्राधान्य दिले. ज्यांना शक्य आहे अशांचा रोख फ्लॅट किंवा भूखंड खरेदीच्या व्यवहाराकडे होता.त्यासाठी बिल्डर्स व प्लॉट व्यावसायिकांनी यानिमित्त आकर्षक ऑफर्स देऊ केल्या होत्या. गारमेंट्स खरेदीवरही लोकांचा भर होता. लग्नसमारंभांचा उत्साह पाहता लग्नाची शेरवानी, वधूचा लेहंगा, सुट आदींची जोरदार विक्री झाली. एकूणच विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी अक्षयतृतीयेचा दिवस उत्साह वाढविणारा ठरला.

  क्रेडिट कार्ड, एटीएम व चेकने खरेदी दरम्यान गेल्या काही महिन्यात कॅशलेस व्यवहार करण्याकडे ग्राहकांचे प्राधान्य वाढले आहे. शिवाय एटीएममध्ये वेळेवर कॅश मिळत नसल्यानेही ग्राहकांना अडचण होत होती. त्यामुळे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा चेकद्वारे दागिने व वाहनांचे पैसे चुकते करण्यावर ग्राहकांचा अधिक भर दिसून आला. कुठल्याही व्यवहाराने असो, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस चांदी करणाराच होता.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाbusinessव्यवसाय