शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात उत्साह : दागिन्यांची विक्रमी विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:02 IST

हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाईल्स व इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही खरेदीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून अक्षयतृतीया या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणत्याही गोष्टींची खरेदी शुभ मानली जाते. नवीन भूखंड, घर, दुचाकी किंवा चारचाकी वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. या शुभ मुहूर्ताचा उत्साह मंगळवारी उपराजधानीच्या बाजारात दिसून आला. यानिमित्त सराफा बाजारात सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी चांगलीच रेलचेल होती. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व नवीन वाहन खरेदीसाठीही लोकांनी गर्दी केली. त्यामुळे व्यापारामध्ये चांगली धनवर्षा झाल्याचे बोलले जात आहे.शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यावसायिक रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, यावर्षी अक्षयतृतीयेला अपेक्षेपेक्षा अधिक उत्साह दिसून येत आहे. या दिवशी शक्यतो एक ग्रॅम तरी सोने खरेदी करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे मंगळवारी सराफा बाजारात सकाळपासून लोकांची गर्दी होती व ही रेलचेल दिवसभर सुरू होती. ग्राहकांनी यावेळी चांगली खरेदी केली. शिवाय लग्नसराई सुरू असल्याने या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीला लोकांची पसंती अधिक असते. या लग्नसराईचा उत्साह बाजारात होता. शहरात तीन हजाराहून अधिक सराफा दुकाने आहेत. लग्नसराईनिमित्त नव्या आणि आकर्षक डिझाईनच्या दागिन्यांचे कलेक्शन सराफा व्यावसायिकांनी आणले होते. या नव्या डिझाईनच्या दागिने खरेदीवर ग्राहकांचा कल अधिक होता व व्यापाऱ्यांना अक्षयतृतीया मुहूर्ताचा चांगला लाभ मिळाला. निश्चित आकडा सांगता येत नसला तरी सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहनांच्या खरेदीसाठीही लोकांचा कल अधिक होता. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मार्केट व वाहनांच्या शोरू ममध्येही दिवसभर ग्राहकांची चांगलीच गर्दी दिसून आली. येथे आधीच बुक केलेल्या वाहनांची अक्षयतृतीयेला डिलीव्हरी करण्यात आली. नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली. याशिवाय इतवारीतील भांडेओळ आणि सीताबर्डीच्या मोबाईल मार्केटमध्येही लोकांची रेलचेल दिसून आली. व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या होत्या. काहींनी या दिवशी नवीन भूखंड व घरे खरेदीला प्राधान्य दिले. ज्यांना शक्य आहे अशांचा रोख फ्लॅट किंवा भूखंड खरेदीच्या व्यवहाराकडे होता.त्यासाठी बिल्डर्स व प्लॉट व्यावसायिकांनी यानिमित्त आकर्षक ऑफर्स देऊ केल्या होत्या. गारमेंट्स खरेदीवरही लोकांचा भर होता. लग्नसमारंभांचा उत्साह पाहता लग्नाची शेरवानी, वधूचा लेहंगा, सुट आदींची जोरदार विक्री झाली. एकूणच विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी अक्षयतृतीयेचा दिवस उत्साह वाढविणारा ठरला.

  क्रेडिट कार्ड, एटीएम व चेकने खरेदी दरम्यान गेल्या काही महिन्यात कॅशलेस व्यवहार करण्याकडे ग्राहकांचे प्राधान्य वाढले आहे. शिवाय एटीएममध्ये वेळेवर कॅश मिळत नसल्यानेही ग्राहकांना अडचण होत होती. त्यामुळे एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा चेकद्वारे दागिने व वाहनांचे पैसे चुकते करण्यावर ग्राहकांचा अधिक भर दिसून आला. कुठल्याही व्यवहाराने असो, व्यापाऱ्यांसाठी हा दिवस चांदी करणाराच होता.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाbusinessव्यवसाय