शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

अक्षय्यतृतीयेला नागपुरातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प : व्यावसायिकांना आर्थिक चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 01:19 IST

साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत.

ठळक मुद्दे गुढीपाडवाही कोरडाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेला अक्षय्यतृतीया सण यंदा खरेदीविना जाणार आहे. स्टॉकमध्ये असलेल्या मालाची विक्री कशी करायची, यावर सर्व व्यावसायिक चिंतेत आहेत. त्यांना लॉकडाऊन हटल्यानंतरच दुकाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुढीपाडवा आणि अक्षय्यतृतीयेला होणारी कोट्यवधींची विक्री ठप्प झाली असली तरीही लॉकडाऊननंतर नव्याने व्यवसाय करू, असा विश्वास व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.अक्षय्यतृतीया रविवारी आहे. भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे तीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीयेचा अर्धा मुहूर्त असतो. या दिवशी नवीन वस्तू आणि सोन्याची खरेदी तसेच गृहप्रवेश शुभ समजला जातो. या दिवशी पूर्वजांचे पूजन करण्यात येते. पण यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच सणांवर संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा सणही मुहूर्ताविना गेला.श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीकांत भांडारकर म्हणाले, तसे पाहता संपूर्ण वर्षातील ३० ते ४० टक्के व्यवसाय हा गुढीपाडवा ते १५ जूनपर्यंत होतो. पण यावर्षी गुढीपाडवा सण व्यवसायाविना गेला. तेव्हापासूनच चिंतेचे सावट व्यवसायावर आले आहे. अक्षय्यतृतीया या शुभदिनी बहुतांश लोक नवीन वस्तूची खरेदी करतात. पण शोरूम बंद असल्याने कुठलीही खरेदी-विक्री होणार नाही. भांडारकर म्हणाले, कोरोनामुळे सर्व इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक संकटात आहेत. बँकांचे कर्जावरील व्याज वाढत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासह बँकेच्या कर्जाचे व्याज व हप्ते वाढत आहेत. चोहोबाजूने आलेल्या संकटावर मात करण्याची आमची तयारी आहे. पुढील महिन्यात शुभसंकेताची अपेक्षा आहे.क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला म्हणाले, अक्षय्यतृतीयेला लोक घराचे बुकिंग करतात. शिवाय अनेकजण गृहप्रवेश याच दिवशी करतात. त्या निमित्ताने साजरा होणाºया कार्यक्रमात येणाºया लोकांकडून घराची विचारणा होत असल्याने बिल्डर्सला बुकिंगची अपेक्षा असते. यावर्षी गुढीपाडवा उत्सवाविना गेला, त्याप्रमाणेच अक्षय्यतृतीयाही जाणार आहे. या दिवशी बुकिंगची अपेक्षा करणे शक्य नाही. नवीन प्रकल्पही रखडले आहेत. बिल्डर्स आर्थिक संकटात आहे. शासनाने दिलासा द्यावा, अशी क्रेडाईची मागणी आहे.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाcorona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूरMarketबाजार