शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.चा आखाडा आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:17 IST

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

ठळक मुद्दे३७४ ग्रा.पं.मध्ये मतदान७३०३ उमेदवार रिंगणातभाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची अग्निपरीक्षाएकूण मतदार - ५,९९,६६एकूण मतदान केंद्र - १३५९

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतीमध्ये बुधवारी, दि.२६ रोजी सरपंच आणि सदस्यपदासाठी मतदान होईल. यात ५ लाख ९९ हजार ६६६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यातील १३५९ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल.राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्राम पंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात ६ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी थेट निवडणूक होईल. यात एकूण २९४० जागांसाठी मतदान होईल. जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच ३७४ ग्रा.पं.च्या विविध संवर्गातील सदस्य पदासाठी ५९९४ उमेदवार रिंगणात आहेत.१५ सप्टेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटपानंतर जिल्ह्यात ग्रा.पं.निवडणुकींचा गागोगावी फड रगंला होता. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.मध्ये सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यात ग्रा.पं.च्या प्रचारात उडी घेतल्याचे दिसून आहे.राजकीयदृष्ट्या विचार केल्यास नागपूर जिल्ह्यावर भाजपचे प्रभृत्त्व आहे. मात्र अजूनही ग्रा.पं.पातळीवर काँग्रेसची पांरपरिक पकड आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजप आणि काँग्रेसप्रणीत पॅनेलमध्ये काट्याची टक्कर असल्याचे चित्र आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बसपाने आपले पॅनेल या निवडणुकीत लढविले आहे. काही तालुक्यात या पक्षांचे उमेदवार काँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनेलच्या उमेदवारांना घाम फोडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ग्रा.पं.मध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहे.तगडा पोलीस बंदोबस्तग्रा.पं.निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्यानंतर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कुठेही गोंधळ होणार नाही. त्यादृष्टीने अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी ग्रा.पं. निवडणुकीत मोठ्या संख्येने भाग घेत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक