शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळांजवळ कृषी निर्यात केंद्र हवे

By admin | Updated: November 13, 2016 02:56 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी

विजय रुपानी यांचे प्रतिपादन : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकरी कार्यशाळांचे उद्घाटननागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी कृषी निर्यात केंद्र आवश्यक आहे. गुजरातमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात वाढली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचा माल शेतातच उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले. रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळांच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यमउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह हे उपस्थित होते. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषक किसान सेलचे अजय वीर जाखड, सी.डी.मायी, टी.नंदकुमार, अमूलचे आर.एस.सोढी, संयोजक गिरीश गांधी,‘वेद’चे अध्यक्ष देवेन पारख, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गुजरातमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचा विकास जास्त कसा होईल, यावर भर देण्यात येत आहे. कृषी कर्ज १८ ऐवजी केवळ १ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे १ लाख ११ हजार कोटी रुपयांनी उत्पादनात वाढ झाली आहे व कृषी विकासाचा दर १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शेतकऱ्यांना शेतातच ‘ई-गाव’ व ‘ई-पोर्टल’च्या माध्यमातून जगातील सर्व कृषी उत्पादनाचे भाव उपलब्ध होत आहेत.शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे होईल, यासाठी गुजरात सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रुपानी यांनी दिली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. येत्या काळात ‘वेस्ट इन टू बेस्ट’ या प्रणालीवर काम करण्यात येणार आहे. गुजरातमध्येदेखील ‘बायोटेक्नॉलॉजी’ व ‘मिथेनॉल’ निर्मितीचा प्रयोग राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी गडकरी यांनी कृषीक्षेत्रातील ‘गुजरात मॉडेल’ची प्रशंसा केली. महाराष्ट्रातदेखील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इत्यादी विमानतळाजवळील ५ एकर जमिनीवर शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रकल्प सुरू झाले पाहिजे. तसेच सिंचनासाठी ४० हजार कोटींची तरतूद झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी कृषी कल्याणच्या ‘ऊस’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी.मायी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर रवी बोरटकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दूध उत्पादनात वाढ हवीयावेळी नितीन गडकरी यांनी दूध उत्पादन वाढीसंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान आणि गुजरातमध्ये दूध उत्पादनाचे प्रमाण दुप्पट आहे. दूध उत्पादनात गुजरातचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ‘एनडीटीबी’ च्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. गडकरी माझे गुरू : गिरीराज सिंहयावेळी गिरीराज सिंह यांनी नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. नितीन गडकरी हे माझे गुरूच आहेत. त्यांच्यापासून मी नेहमीच मार्गदर्शन घेतो, असे सिंह म्हणाले. देशात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक पिकांसाठी शेकडो लिटर पाणी लागते. मात्र पाण्याची कमतरता लक्षात घेता योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.