शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

विमानतळावर मद्य विकल्या जाते, संत्रा का नाही ?  गडकरींचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 20:33 IST

एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.

ठळक मुद्दे ‘नर्सरी’ना संशोधनात सहभागी करून घ्या

ऑनलाईन लोकमत नागपूर : एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केला.विमानतळावर ‘महाआॅरेंज’च्या माध्यमातून संत्राविक्रीची परवानगी द्यावी, अशी आठ महिन्यांअगोदर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली होती. यासंदर्भात केंद्रीय कृषी सचिवांनाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काहीच पावले उचलण्यात आली नाही. अखेर कठोर भूमिका घेतल्यानंतर ही परवानगी मिळाली, असे सांगत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली.विमानतळ, रेल्वेस्थानक येथे संत्रा विक्रीला आला तर त्याला जास्त बाजारपेठ मिळेल व त्याची चव जगापर्यंत जाईल. यासंदर्भात परवानगी मिळाली आहे. आता या मालाचे योग्य व दर्जेदार ‘पॅकेजिंग’ कसे होईल, यासंदर्भात पुढाकार घेण्यासंदर्भात कृषी मंत्रालयातील सचिवांना निर्देश द्या, अशी सूचना त्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना केली. मदर डेअरीसोबत महाआॅरेंजचा करार करण्यात आला असून, आता नागपूरचा संत्रा दिल्लीत मदर डेअरीच्या सर्व स्टॉलवर विकल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले.गडकरी म्हणाले, पतंजलीसारखे उद्योग समूह विदर्भात येत असल्याने संत्र्याची मागणी वाढणार आहे. दररोज त्यांना ८०० टन संत्रा उपलब्ध करून देणे हे आव्हानच राहणार आहे. यासाठी संत्र्याचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी संत्र्याच्या चाांगल्या कलमा लागतील. वरुड, मोर्शी या भागात चांगल्या ‘नर्सरी’ आहेत. त्यांचे अपग्रेडेशन करून त्यांना संशोधनात सहभागी करून घ्या. त्यांना मार्गदर्शन करून नवीन कलमांवर प्रयोग करा, अशी सूचना ‘सीसीआरआय’ला केली होती. अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली.ठिबक सिंचनाबद्दल केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान खूप उशिरा मिळते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती ते अनुदान पोहोचेपर्यंत भ्रष्टाचारामुळे ते शिल्लकच राहत नाही. अनुदान उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांना महाग साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे या योजनेतील ‘लक्ष्मीदर्शन’ बंद झाले पाहिजे, असे म्हणत त्यांनी कृषी विभागातील गैरप्रकार केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.जलमार्गाने संत्रा बांगलादेश, म्यानमारपर्यंत येथील संत्रा ड्रायपोर्टवरून रेल्वेने साहीबगंजला पोहोचविला जाईल. तेथून जलमार्गाने जहाजाद्वारे कोलकाता, बांगलादेश, म्यानमार व दक्षिण-पूर्व आशियापर्यंत पोहोचविला जाईल. यामुळे वाहतुकीवर येणारा खर्च कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले. राज्य सरकारने फळ निर्यातीचे धोरण आखले आहे. प्री- कुलिंग प्लांट व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी राज्य सरकार मदत करीत आहे. या कामासाठी गुंतवणूकदारांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरNitin Gadkariनितीन गडकरी