शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सणांच्या दिवसातही विमान कंपन्यांची नवी उड्डाणे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 10:49 IST

Nagpur News flight सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही.

ठळक मुद्दे विमानतळावरून केवळ ५० टक्केच उड्डाणे प्रवासी वाढल्यास उड्डाणे सामान्य होणार

श्रेयस होले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळी सण जवळ येत असतानाच बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना लॉकडाऊननंतर हवाई क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या अनेक व्यावसायिक शहरात परत येत आहेत, त्यानंतरही सणांच्या दिवसात हवाई क्षेत्रात फारसा उत्साह नाही. प्रवासी वाढल्यास उड्डाणे पूर्वीप्रमाणेच सामान्य होतील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रूही म्हणाले, सध्या नागपूर विमानतळावरून दररोज १३ ते १७ विमाने उड्डाण घेत आहेत. कोरोना लॉकडाऊनपूर्वी ही संख्या ३१ ते ३४ होती. सणांच्या दिवसात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन पूर्वीप्रमाणेच विमानतळावरून उड्डाणांच्या संख्येत वाढ होऊन उड्डाणे सामान्य होतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. इतकेच नव्हे तर प्रवासी संख्या कमी असल्याने नियोजित उड्डाणेदेखील रद्द केली जात आहेत. परिणामी विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.

रूही म्हणाले, हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील काही मुख्य सण आणि उत्सवांमुळे विमान कंपन्या नागपुरात व जाण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यासाठी सहसा अर्ज करतात. परंतु यावर्षी कोणत्याही विमान कंपनीने जादा उड्डाणांची मागणी केली नाही. विमानतळाच्या वाढीव उड्डाणांव्यतिरिक्त विमानतळ हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मान्यवरांची चार्टर्ड उड्डाणेदेखील हाताळते. त्यामुळे विमानतळाला अतिरिक्त महसूल मिळते. परंतु, यावर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता असल्याने विमानतळाच्या उत्पन्नात आणखी एक मोठे नुकसान होणार आहे.

उल्लेखनीय असे की, दररोजच्या विमानांची संख्या जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला यंदा ५० कोटींचा नफा झाला आहे.

विमानतळावर प्रवासी सुरक्षित राहावेत म्हणून विमानतळ व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. विमानतळवर सर्व आवश्यक कोरोना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी सुरक्षित हवाई प्रवास करावा, यासाठी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे रूही यांनी सांगितले.

टॅग्स :airplaneविमान