शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

सणांच्या दिवसातही विमान कंपन्यांची नवी उड्डाणे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 10:49 IST

Nagpur News flight सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही.

ठळक मुद्दे विमानतळावरून केवळ ५० टक्केच उड्डाणे प्रवासी वाढल्यास उड्डाणे सामान्य होणार

श्रेयस होले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळी सण जवळ येत असतानाच बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना लॉकडाऊननंतर हवाई क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या अनेक व्यावसायिक शहरात परत येत आहेत, त्यानंतरही सणांच्या दिवसात हवाई क्षेत्रात फारसा उत्साह नाही. प्रवासी वाढल्यास उड्डाणे पूर्वीप्रमाणेच सामान्य होतील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रूही म्हणाले, सध्या नागपूर विमानतळावरून दररोज १३ ते १७ विमाने उड्डाण घेत आहेत. कोरोना लॉकडाऊनपूर्वी ही संख्या ३१ ते ३४ होती. सणांच्या दिवसात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन पूर्वीप्रमाणेच विमानतळावरून उड्डाणांच्या संख्येत वाढ होऊन उड्डाणे सामान्य होतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. इतकेच नव्हे तर प्रवासी संख्या कमी असल्याने नियोजित उड्डाणेदेखील रद्द केली जात आहेत. परिणामी विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.

रूही म्हणाले, हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील काही मुख्य सण आणि उत्सवांमुळे विमान कंपन्या नागपुरात व जाण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यासाठी सहसा अर्ज करतात. परंतु यावर्षी कोणत्याही विमान कंपनीने जादा उड्डाणांची मागणी केली नाही. विमानतळाच्या वाढीव उड्डाणांव्यतिरिक्त विमानतळ हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मान्यवरांची चार्टर्ड उड्डाणेदेखील हाताळते. त्यामुळे विमानतळाला अतिरिक्त महसूल मिळते. परंतु, यावर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता असल्याने विमानतळाच्या उत्पन्नात आणखी एक मोठे नुकसान होणार आहे.

उल्लेखनीय असे की, दररोजच्या विमानांची संख्या जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला यंदा ५० कोटींचा नफा झाला आहे.

विमानतळावर प्रवासी सुरक्षित राहावेत म्हणून विमानतळ व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. विमानतळवर सर्व आवश्यक कोरोना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी सुरक्षित हवाई प्रवास करावा, यासाठी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे रूही यांनी सांगितले.

टॅग्स :airplaneविमान