शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सणांच्या दिवसातही विमान कंपन्यांची नवी उड्डाणे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 10:49 IST

Nagpur News flight सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही.

ठळक मुद्दे विमानतळावरून केवळ ५० टक्केच उड्डाणे प्रवासी वाढल्यास उड्डाणे सामान्य होणार

श्रेयस होले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिवाळी सण जवळ येत असतानाच बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना लॉकडाऊननंतर हवाई क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या अनेक व्यावसायिक शहरात परत येत आहेत, त्यानंतरही सणांच्या दिवसात हवाई क्षेत्रात फारसा उत्साह नाही. प्रवासी वाढल्यास उड्डाणे पूर्वीप्रमाणेच सामान्य होतील, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सामान्यत: उत्सवाच्या हंगामात विमान कंपन्या अधिक प्रवाशांच्या अपेक्षेने अतिरिक्त उड्डाणे सुरू करतात. पण यंदा कोणत्याही विमान कंपनीने तसे केले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रूही म्हणाले, सध्या नागपूर विमानतळावरून दररोज १३ ते १७ विमाने उड्डाण घेत आहेत. कोरोना लॉकडाऊनपूर्वी ही संख्या ३१ ते ३४ होती. सणांच्या दिवसात हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन पूर्वीप्रमाणेच विमानतळावरून उड्डाणांच्या संख्येत वाढ होऊन उड्डाणे सामान्य होतील, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. इतकेच नव्हे तर प्रवासी संख्या कमी असल्याने नियोजित उड्डाणेदेखील रद्द केली जात आहेत. परिणामी विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.

रूही म्हणाले, हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातील काही मुख्य सण आणि उत्सवांमुळे विमान कंपन्या नागपुरात व जाण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे सुरू करण्यासाठी सहसा अर्ज करतात. परंतु यावर्षी कोणत्याही विमान कंपनीने जादा उड्डाणांची मागणी केली नाही. विमानतळाच्या वाढीव उड्डाणांव्यतिरिक्त विमानतळ हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मान्यवरांची चार्टर्ड उड्डाणेदेखील हाताळते. त्यामुळे विमानतळाला अतिरिक्त महसूल मिळते. परंतु, यावर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता असल्याने विमानतळाच्या उत्पन्नात आणखी एक मोठे नुकसान होणार आहे.

उल्लेखनीय असे की, दररोजच्या विमानांची संख्या जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला यंदा ५० कोटींचा नफा झाला आहे.

विमानतळावर प्रवासी सुरक्षित राहावेत म्हणून विमानतळ व्यवस्थापन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. विमानतळवर सर्व आवश्यक कोरोना सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी सुरक्षित हवाई प्रवास करावा, यासाठी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे रूही यांनी सांगितले.

टॅग्स :airplaneविमान