शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त

By योगेश पांडे | Updated: June 14, 2025 08:31 IST

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

- योगेश पांडेनागपूर - अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ‘डीजीसीए’सह (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) विविध संस्था कार्यरत असतात. मात्र, या संस्थांमधील सरासरी ३५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. डीजीसीएमध्ये तर हा आकडा ४८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे विद्यमान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. या ताणामुळे हवाई प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या रिक्त जागा कायमस्वरूपी भरण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याचेच आकडेवारीतून समोर येत आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)  ही नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील नियामक संस्था आहे. ‘डीजीसीए’चे काम प्रामुख्याने सुरक्षिततेच्या मुद्द्यांशी संबंधित आहे.

‘डीजीसीए’कडून भारतातील हवाई वाहतूक सेवांचे नियमन करण्याची आणि नागरी हवाई नियम, हवाई सुरक्षा आणि विमान वाहतुकीच्या योग्यतेच्या मानकांची अंमलबजावणी करण्याची प्रामुख्याने जबाबदारी असते.  ‘डीजीसीए’कडून आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेशी सर्व नियामक कार्यांचे समन्वय करण्यात येते. ‘डीजीसीए’मध्ये १ हजार ६९२ मंजूर पदे होती. परंतु, यातील ८७८ जागांवरच अधिकारी कार्यरत आहेत.

आकडेवारी काय सांगते?‘डीजीसीए’वर्ष    मंजूर पदे    रिक्त पदे२०२४    १,६९२    ८११२०२५ (मार्चपर्यंत)    १,६९२    ८१४‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’२०२४    ५९८    १८७२०२५ ( मार्चपर्यंत)    ५९८    २२४एएआय२०२४    २४,८८२    ८,८०४२०२५ ( मार्चपर्यंत)    २५,७३०    ९,५०२

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळPlane Crashविमान दुर्घटना