शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:09 IST

Nagpur News एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे.

नागपूर : एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे. नागपुरातून मुंबईकडे दुपारी उड्डाण भरणाऱ्या विमानामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कंपनीचे नागपुरातून मुंबईला जाणारे दुसरे विमान राहणार आहे. 

गो-फर्स्ट विमानसेवा बंद झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीने मुंबई-नागपूर-मुंबई विमानाच्या तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविल्यानंतर लोकांची ओरड सुरू आहे. त्यातच एअर इंडियाने मुंबई-नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

एअर इंडियाचे एआय १६१३ हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात दुपारी १२.२० वाजता येणार येईल आणि हेच विमान एआय १६१४ बनून नागपुरातून १२.५५ वाजता उड्डाण भरून मुंबईला २.४५ वाजता पोहोचणार आहे. कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त विमान म्हणून उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरणार आहे. त्यानंतर हे विमान नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपनीच्या तिकिट दरात निश्चितच घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे आधी सुरू असलेले विमान मुंबईहून नागपुरात ८.३५ वाजता येते आणि नागपुरातून ९.२० वाजता मुंबईला उड्डाण भरते. नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी कंपनीने पूर्ण केली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया