शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:09 IST

Nagpur News एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे.

नागपूर : एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे. नागपुरातून मुंबईकडे दुपारी उड्डाण भरणाऱ्या विमानामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कंपनीचे नागपुरातून मुंबईला जाणारे दुसरे विमान राहणार आहे. 

गो-फर्स्ट विमानसेवा बंद झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीने मुंबई-नागपूर-मुंबई विमानाच्या तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविल्यानंतर लोकांची ओरड सुरू आहे. त्यातच एअर इंडियाने मुंबई-नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

एअर इंडियाचे एआय १६१३ हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात दुपारी १२.२० वाजता येणार येईल आणि हेच विमान एआय १६१४ बनून नागपुरातून १२.५५ वाजता उड्डाण भरून मुंबईला २.४५ वाजता पोहोचणार आहे. कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त विमान म्हणून उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरणार आहे. त्यानंतर हे विमान नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपनीच्या तिकिट दरात निश्चितच घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे आधी सुरू असलेले विमान मुंबईहून नागपुरात ८.३५ वाजता येते आणि नागपुरातून ९.२० वाजता मुंबईला उड्डाण भरते. नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी कंपनीने पूर्ण केली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया