शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा २० मेपासून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 22:09 IST

Nagpur News एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे.

नागपूर : एअर इंडियाची अतिरिक्त मुंबई-नागपूर-मुंबई विमानेसवा २० मेपासून सुरू होणार असून २८ ऑक्टोबरपर्यंत आठवड्यात सातही दिवस उड्डाण भरणार आहे. नागपुरातून मुंबईकडे दुपारी उड्डाण भरणाऱ्या विमानामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कंपनीचे नागपुरातून मुंबईला जाणारे दुसरे विमान राहणार आहे. 

गो-फर्स्ट विमानसेवा बंद झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीने मुंबई-नागपूर-मुंबई विमानाच्या तिकिटाचे दर मोठ्या प्रमाणात वाढविल्यानंतर लोकांची ओरड सुरू आहे. त्यातच एअर इंडियाने मुंबई-नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

एअर इंडियाचे एआय १६१३ हे विमान २० मे रोजी सकाळी ११ वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात दुपारी १२.२० वाजता येणार येईल आणि हेच विमान एआय १६१४ बनून नागपुरातून १२.५५ वाजता उड्डाण भरून मुंबईला २.४५ वाजता पोहोचणार आहे. कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त विमान म्हणून उड्डाण भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान २० मे ते २८ ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरणार आहे. त्यानंतर हे विमान नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपनीच्या तिकिट दरात निश्चितच घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे आधी सुरू असलेले विमान मुंबईहून नागपुरात ८.३५ वाजता येते आणि नागपुरातून ९.२० वाजता मुंबईला उड्डाण भरते. नागपूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी कंपनीने पूर्ण केली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया