शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नागपूरात विमान प्रवासाचे दर आटोक्याबाहेर! तिकिटांच्या संख्येनुसार कंपन्या वाढवितात दर

By मोरेश्वर मानापुरे | Updated: June 18, 2023 19:55 IST

डीजीसीएह्चे दरावर नियंत्रण नाहीच.

नागपूर : गो फर्स्ट विमान कंपनीची उड्डाणे देशभरात ३ मेपासून अचानक बंद करण्यात आली आहेत. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्याचा फायदा घेत नागपुरात विमानाचे संचालन करणाऱ्या इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्या तिकिटांच्या संख्येनुसार दरदिवशी दरवाढ करीत आहेत. त्याचा फटका सामान्य प्रवाशाला बसत असून त्यांना नागपूर-मुंबईच्या ३ हजाराच्या तिकिटासाठी ८ ते ९ हजार रुपये मोजावे लागत आहेत. अर्थात नागपूरात विमान प्रवासाचे दर आटोक्याबाहेर गेले आहेत. 

कंपन्या वाढवितात तिकिटाच्या संख्येनुसार दर नागपुरातून इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, लखनौ, हैदराबाद, रायपूर या मार्गावर रवाना होतात. यात एक वा दोन महिन्यांपासून बुकिंग केलेल्या प्रवाशांना कमी दरात अर्थात २ ते २५०० रुपयांत तिकिट मिळते. त्यानंतर ९ च्या स्लॉटनुसार पीएनआरप्रमाणे तिकिटांचे दर असतात. विमानाची अर्धी तिकिटे बुक होईपर्यंत कंपन्या फारशी दरवाढ करीत नाहीत. त्यानंतरच्या तिकिटांना जास्त पैसे मोजावे लागतात. ही दरवाढ ५ ते ९ हजार आणि अखेरच्या टप्प्यात १० ते १२ हजारांपर्यंत असते.

तिकिट दरांवर नियंत्रण कोण ठेवणार?

विमानाच्या सध्याच्या तिकिट दरांना ह्यडायनामिक फेअरह्ण म्हटले जाते. अर्थात तिकिटांच्या संख्येनुसार होणाऱ्या दरवाढीनुसार नागरी विमान महासंचालनालयाचे (डीजीसीए) नियंत्रण नाही. ह्यडायनामिक फेअरह्ण हे तिकिट बुकिंग संख्या आणि सिझनवर अवलंबून असते. केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ६ जून रोजी एअरलाइन अ‍ॅडव्हायझरी ग्रुपची बैठक घेतली होती. यावर वाढत्या तिकिट दरावर चर्चा झाली. या बैठकीत त्यांनी विमान कंपन्यांना तिकिटांचे दर वाढवू नयेत, असे केवळ आवाहन केले. पण निर्देश दिले नाहीत. त्यामुळे वाढत्या तिकिट दरांवर नियंत्रण कोण ठेवणार? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपन्या आकारत असलेल्या मनमानी तिकिट दरांवर नागरी उड्डयण मंत्रालय नियंत्रण ठेवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.

कंपन्यांच्या ऑफरचा होतो फायदा

धनलक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक कार्तिक शेंडे म्हणाले, विमान कंपन्यांसाठी दिवाळी ते ख्रिसमस, एप्रिल ते जून हे महिने पीक पिरेड, जुलै ते ऑगस्ट मीड सिझनह समजले जातात. पीक पिरेडहमध्ये कंपन्या भरमसाठ शुल्क आकारात. तर अन्य महिन्यात कंपन्या कमी दराच्या ऑफर आणतात. नागपुरात दोनच विमान कंपन्या असल्यामुळे दरात स्पर्धा नाही. कमी दराच्या ट्रू जेट, स्पाईस जेट, एअर आशिया आणि गो-फर्स्ट कंपन्यांची विमान सेवा नागपुरातून सुरू झाल्यास कंपन्यांमध्ये स्पर्धा येईल आणि वाढीव तिकिट दरांवर नक्कीच नियंत्रण येईल, असे कार्तिक शेंडे म्हणाले.